शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
4
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
5
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
6
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
7
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
8
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
9
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
10
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
11
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
12
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
13
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
14
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
15
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
16
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
17
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
18
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
19
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर

तोरणदारी व मरणदारी हवी खबरदारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:30 IST

चिखली : कडक लॉकडाऊनचा तडाखा सोसल्यानंतरही थोडी शिथिलता मिळताच धूमधडाक्यात पार पडलेले लग्नसमारंभ व इतर सोहळ्यांनी जमविलेल्या गर्दीतून कोरोनाचा ...

चिखली : कडक लॉकडाऊनचा तडाखा सोसल्यानंतरही थोडी शिथिलता मिळताच धूमधडाक्यात पार पडलेले लग्नसमारंभ व इतर सोहळ्यांनी जमविलेल्या गर्दीतून कोरोनाचा पुन्हा विस्फोट झाला आहे. आजही नागरिकांकडून कोरोना नियमांना पायदळी तुडविले जात आहे. याचे ताजे उदाहरण सैलानी बाबांच्या संदलदरम्यान पाहावयास मिळाले. तथापि, इतर सर्व समारंभ आणि अंत्यविधीच्या कार्यक्रमावर बंधने असूनही, अनेकांना याचे गांभीर्य दिसत नाही, ही वस्तुस्थिती आहे. नागरिकांनी यापुढे तरी किमान तोरणदारी व मरणदारी याबाबत काळजी घेणे गरजेचे झाले आहे. सार्वजनिक कार्यक्रमाला जमणाऱ्या गर्दीला 'मास्क'चा विसर पडल्याचे दिसून येते.

कोरोनाची दुसरी लाट फार भयंकर रूप घेऊन आली आहे. दिवसागणिक बाधितांचा आकडा प्रचंड प्रमाणात वाढत आहे. कोरोनाबाधितांचा मृत्युदर वाढला आहे. हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध नाहीत. रक्ताचा तुटवडा आहे. लसीकरणाबाबतही अनास्था आहे. अशा स्थितीत कोरोनाचा अटकाव होणार तरी कसा? प्रशासनात कोरोनायोद्धे म्हणून कार्यरत सर्वच जण जीवावर उदार होऊन काम करत असताना आणि जिल्हा प्रशासनाने निर्बंध लावलेले असताना नागरिकांच्या बेजबाबदारपणाचे पावलोपावली दर्शन घडत आहे. प्रामुख्याने लग्नसमारंभ व अंत्यविधीच्या कार्यक्रमात होणारी गर्दी अचंबित करणारी आहे. प्रशासनाने बंधने घातलेली असतानाही अंत्यविधीसाठी अनेक ठिकाणी हजारो नागरिकांची गर्दी जमते. एकमेकांच्या सुख-दु:खांत सहभागी होताना किमान तोंडाला मास्क व हाताला सॅनिटायझर तरी हवे, इतका साधा नियमदेखील पाळला जात नाही, ही बाब अत्यंत खेदाची आहे. 'बापरे, केवढी ही गर्दी, पोलिसांना हे दिसत नाही का?', असे म्हणून केवळ पोलीस अथवा इतर प्रशासनावर खापर फोडणेही उचित ठरणार नाही.

सामूहिक प्रयत्नांची गरज!

कोरोनाच्या पहिल्या लाटेत प्रत्येकाने उत्स्फूर्त योगदान दिले. मात्र, आता तसे होताना दिसत नाही. केवळ प्रशासनावर जबाबदारी थोपविण्यात आली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून तरून जाण्यासाठी प्रत्येकाने पहिल्याप्रमाणेच योगदान देणे गरजेचे आहे. अगदी ग्रा.पं. सदस्यांपासून सरपंच, पं.स. सदस्य, जि.प. सदस्य, शहरी भागात नगरसेवक आणि आमदार, खासदार या लोकप्रतिनिधींसह सामाजिक कार्यकर्ते, संस्था आदी सर्व क्षेत्रांतील नागरिकांनी या लढ्यात उतरायला हवे. वाॅर्ड, गाव, पं.स. गण, जि.प. सर्कल, तालुका, मतदारसंघ याप्रमाणे आपापल्या कार्यक्षेत्रात किमान प्रशासनाने सद्य:स्थितीत लावलेल्या निर्बंधांची काटेकोरपणे अंमलबजावणी होते किंवा नाही, यावर लक्ष देण्यासह उपाययोजनांची काय स्थिती आहे अथवा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही, या अनुषंगाने नेमके काय करता येईल, यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याची गरज आहे.