शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

तोरणदारी व मरणदारी हवी खबरदारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:30 IST

चिखली : कडक लॉकडाऊनचा तडाखा सोसल्यानंतरही थोडी शिथिलता मिळताच धूमधडाक्यात पार पडलेले लग्नसमारंभ व इतर सोहळ्यांनी जमविलेल्या गर्दीतून कोरोनाचा ...

चिखली : कडक लॉकडाऊनचा तडाखा सोसल्यानंतरही थोडी शिथिलता मिळताच धूमधडाक्यात पार पडलेले लग्नसमारंभ व इतर सोहळ्यांनी जमविलेल्या गर्दीतून कोरोनाचा पुन्हा विस्फोट झाला आहे. आजही नागरिकांकडून कोरोना नियमांना पायदळी तुडविले जात आहे. याचे ताजे उदाहरण सैलानी बाबांच्या संदलदरम्यान पाहावयास मिळाले. तथापि, इतर सर्व समारंभ आणि अंत्यविधीच्या कार्यक्रमावर बंधने असूनही, अनेकांना याचे गांभीर्य दिसत नाही, ही वस्तुस्थिती आहे. नागरिकांनी यापुढे तरी किमान तोरणदारी व मरणदारी याबाबत काळजी घेणे गरजेचे झाले आहे. सार्वजनिक कार्यक्रमाला जमणाऱ्या गर्दीला 'मास्क'चा विसर पडल्याचे दिसून येते.

कोरोनाची दुसरी लाट फार भयंकर रूप घेऊन आली आहे. दिवसागणिक बाधितांचा आकडा प्रचंड प्रमाणात वाढत आहे. कोरोनाबाधितांचा मृत्युदर वाढला आहे. हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध नाहीत. रक्ताचा तुटवडा आहे. लसीकरणाबाबतही अनास्था आहे. अशा स्थितीत कोरोनाचा अटकाव होणार तरी कसा? प्रशासनात कोरोनायोद्धे म्हणून कार्यरत सर्वच जण जीवावर उदार होऊन काम करत असताना आणि जिल्हा प्रशासनाने निर्बंध लावलेले असताना नागरिकांच्या बेजबाबदारपणाचे पावलोपावली दर्शन घडत आहे. प्रामुख्याने लग्नसमारंभ व अंत्यविधीच्या कार्यक्रमात होणारी गर्दी अचंबित करणारी आहे. प्रशासनाने बंधने घातलेली असतानाही अंत्यविधीसाठी अनेक ठिकाणी हजारो नागरिकांची गर्दी जमते. एकमेकांच्या सुख-दु:खांत सहभागी होताना किमान तोंडाला मास्क व हाताला सॅनिटायझर तरी हवे, इतका साधा नियमदेखील पाळला जात नाही, ही बाब अत्यंत खेदाची आहे. 'बापरे, केवढी ही गर्दी, पोलिसांना हे दिसत नाही का?', असे म्हणून केवळ पोलीस अथवा इतर प्रशासनावर खापर फोडणेही उचित ठरणार नाही.

सामूहिक प्रयत्नांची गरज!

कोरोनाच्या पहिल्या लाटेत प्रत्येकाने उत्स्फूर्त योगदान दिले. मात्र, आता तसे होताना दिसत नाही. केवळ प्रशासनावर जबाबदारी थोपविण्यात आली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून तरून जाण्यासाठी प्रत्येकाने पहिल्याप्रमाणेच योगदान देणे गरजेचे आहे. अगदी ग्रा.पं. सदस्यांपासून सरपंच, पं.स. सदस्य, जि.प. सदस्य, शहरी भागात नगरसेवक आणि आमदार, खासदार या लोकप्रतिनिधींसह सामाजिक कार्यकर्ते, संस्था आदी सर्व क्षेत्रांतील नागरिकांनी या लढ्यात उतरायला हवे. वाॅर्ड, गाव, पं.स. गण, जि.प. सर्कल, तालुका, मतदारसंघ याप्रमाणे आपापल्या कार्यक्षेत्रात किमान प्रशासनाने सद्य:स्थितीत लावलेल्या निर्बंधांची काटेकोरपणे अंमलबजावणी होते किंवा नाही, यावर लक्ष देण्यासह उपाययोजनांची काय स्थिती आहे अथवा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही, या अनुषंगाने नेमके काय करता येईल, यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याची गरज आहे.