शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

आजची वारी पावसासाठीच!

By admin | Updated: July 10, 2014 01:33 IST

भिजव पांडुरंगा हे तहानलेले रान रे : वारकर्‍यांची मनोभावना

फहीम देशमुख / शेगावरोहिणी व मृग नक्षत्र कोरडे गेले. आद्रार्ने आशा दाखविली. प्रतीक्षेत असणार्‍या शेतकर्‍यांनी आलेल्या एका पावसावर पेरणीला सुरुवात केली अन पुन्हा वरूण राजा रुसला. पेरणीचा कालावधी संपत आहे, मागील पाच वर्षांत पहिल्यांदाच पाऊस कमी पडला. वास्तविक पेरण्या आटोपून शेतकरी, वारकरी हे पायी वारी करतात. यंदा मात्र याउलट झाले. वारकरी यंदा पाउस नसल्याने बहुतांष पेरण्या झालेल्या नाही.जोरदार पाउस पडावा, पेरण्या व्हाव्यात आणि शेतकर्‍यासांठी सुगीचे दिवस यावे यासाठी विठु मावली पर्यंत न पोहचलेल्या भाविकांनी प्रति पंढरपुर मानल्या जाणार्‍या शेगावीच्या गजाननाला साकडे घालण्यासाठी संत नगरीत आज दाखल झाले.आज शेगावात दाखल झालेल्या भाविकांशी चर्चा केली असता आज गजाननाशी पावसा शिवाय कुठलेही मागणे नाही.असे सर्वांनीच सांगीतले. पाऊस न पडल्याने पेरण्यांचा खोळंबा झाला आहे. त्यामुळे बहुसंख्य वारकर्‍यांची यंदा वारी चुकली आहे. पंढरपुरच्या वारीसाठी अनेकांना ईच्छा असुनही भेटीसाठी जाता येत नाही. अशी भाविक मंडळी नेहमीच प्रति पंढरपुर असलेल्या शेगावात गजाननाच्या भेटीसाठी पोहचतात. आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने अशाच लाखो भाविकांनी आज श्री चरणी माथा टेकवुन पावसा साठी आर्जव लागले.२0 ते २५ जूनदरम्यान खरिपाची पेरणी व्हायला पाहिजे, त्याची आता जेमतेम सुरुवात झाली आहे. शेतकरी पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहे.प्रत्येक वारकरी हा पावसाकडे आस लावुन बसलेला दिसुन आला.