शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
3
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
4
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
5
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
6
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
7
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
8
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
9
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
10
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
11
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
12
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
13
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
14
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
15
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
16
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
17
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
18
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
19
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
20
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू

कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी आज शेवटचा दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 00:44 IST

बुलडाणा :  छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना  अंतर्गत शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्यात येत आहे. या योजनेंतर्गत अर्ज भरण्याचा २२ सप्टेंबर शेवटचा दिवस आहे.

ठळक मुद्देसर्व कर्जाची माहिती न दिल्यास अर्ज होणार अपात्रनव्याने अर्ज न भरताच जुन्या अर्जात एडीट ऑप्शनमधून माहिती द्यावीजिल्हा बँकेच्या कर्जाची नोंद ऑनलाइन अर्जामध्ये करावी

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा :  छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना  अंतर्गत शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्यात येत आहे. या योजनेंतर्गत अर्ज भरण्याचा २२ सप्टेंबर शेवटचा दिवस आहे.    अर्ज न भरलेल्या शेतकर्‍यांनी त्वरित आपले सरकार केंद्र, महा-ई सेवा केंद्र व सीएससी केंद्रावर जावून अर्ज भरावेत. तसेच  कर्जमाफी अर्जामध्ये सर्व बँकांकडील शेती कर्जाची माहिती द्यावी. ज्या शेतकर्‍यांनी विविध बँकांचे शेती कर्ज काढलेले आहे, त्यांनी सर्व बँक कर्ज खात्यांची माहिती अर्जात भरणे अत्यावश्यक आहे. यामध्ये जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचाही समावेश आहे. शेतकर्‍यांनी ज्या बँकेचे कर्ज घेतले आहे, त्या बँकेकडे आधार कार्ड व इतर माहिती सादर करावी. शेतकर्‍यांनी जिल्हा बँकेव्यतिरिक्त इतर बँकांकडून कर्ज घेतले असले तरी त्यांना एकूण दीड लक्ष रुपयांपयर्ंत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त कर्जमाफीचा लाभ मिळविण्यासाठी शेतकर्‍यांनी जिल्हा बँक व इतर बँकेकडे आधार कार्ड आणि के.वाय.सी कागदपत्रे देणे आवश्यक आहे.  सदर माहिती भरण्यासाठी शेतकर्‍यांना नव्याने अर्ज भरण्याची गरज नसून, त्याच अर्जामध्ये एडीट ऑप्शनद्वारे ही माहिती भरावी लागणार आहे. अर्ज सादर करताना सर्व थकीत खातेदारांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राष्ट्रीयीकृत बँक, खासगी बँक व ग्रामीण बँक अशा सर्व प्रकारच्या वित्तिय संस्थांकडून घेतलेल्या सर्व प्रकारच्या कर्जाची माहिती सादर केलेली नसल्यास ती सादर करावी. घेतलेल्या सर्व कर्जाची माहिती सादर केलेली नाही, असे आढळल्यास अशा खातेदारांवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे. अर्ज सादर करताना सर्व बँकांकडून घेतलेल्या संपूर्ण कर्जाची माहिती सादर करणे अनिवार्य आहे.  शेतकर्‍यांनी सर्व कर्ज खात्यांची माहिती ऑनलाइन अर्जात नमूद करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक खरात तसेच जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी केले आहे.