शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
3
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
4
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
5
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
6
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
7
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
8
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
9
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
10
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
11
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
12
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
13
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
15
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
16
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
17
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
18
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
19
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
20
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू

आज घटमांडणी, उद्या भविष्यवाणी

By admin | Updated: April 28, 2017 00:16 IST

जळगाव: बहुचर्चित भेंडवळची घटमांडणी उद्या, २८ एप्रिल रोजी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सायंकाळी सूर्यास्तासमयी पुंजाजी महाराज व सारंगधर महाराज करणार आहेत.

भेंडवळच्या भाकिताकडे शेतकऱ्यांचे लक्ष!जळगाव: बहुचर्चित भेंडवळची घटमांडणी उद्या, २८ एप्रिल रोजी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सायंकाळी सूर्यास्तासमयी पुंजाजी महाराज व सारंगधर महाराज करणार आहेत, तर घटामध्ये रात्रभरात झालेल्या बदलाचे अवलोकन करून २९ एप्रिलच्या पहाटे यंदाच्या घटमांडणीची भविष्यवाणी कथन करणार आहेत. या भाकिताकडे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.३०० वर्षांपूर्वी हवामान खाते, पाऊस पाण्याविषयी माहिती देणारी कुठलीही सुविधा उपलब्ध नसताना भेंडवळमधील वाघ वंशाचे पूर्वज चंद्रभान महाराज यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरलेल्या भेंडवळ घटमांडणीची सुरुवात केली आणि ती परंपरा या वाघ कुटुंबीयांनी आजही जपली आहे. या विधीसाठी नियमांचे काटेकोरपणे पालन करून चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आज संध्याकाळी गावाच्या पूर्वेस असलेल्या शेतात सूर्यास्ताच्यावेळी सारंगधर महाराज व आपल्या सहकार्यासह येवून चंद्रभान महाराजांचा जयजयकार करीत घटमांडणी करणार आहेत. घटमांडणीनंतर रात्रभर त्या परिसरात कुणीही फिरकत नाही. अशा परिस्थितीत रात्रीच्या पोटात घटामध्ये नैसर्गिकरीत्या जे काही बदल घडून येतात, त्याबाबत दुसऱ्या दिवशी उपस्थित हजारो शेतकऱ्यांच्या समक्ष येणाऱ्या हंगामाचे पीक पावसाचे तसेच देशाचे राजकीय तथा नैसर्गिक संकटांबाबत चाहूल देणारे भाकीत वर्तविण्यात येते. यावरून यंदा देशाचा राजा बदलणार काय? की तोच कायम राहणार, याचा उलगडा होणार आहे. अशी होणार घटमांडणीअक्षय्य तृतीयेला संध्याकाळी पुंजाजी महाराज, सारंगधर महाराज आपल्या अनुयायांसह चंद्रभान महाराजांचा जयजयकार करीत नियोजित शेतात येतात. त्याठिकाणी मातीचा गोल घट करून घटाच्या मधोमध खड्डा करतात. यामध्ये पावसाळ्याच्या चार महिन्याचे प्रतीक म्हणून चार मातीची ढेकळे ठेवतात. त्यावर घागर ठेवण्यात येते. या घागरीवर पापड, पुरी, सांडोळी, करंजी, भजा आणि वडा अशा प्रतीकात्मक खाद्य पदार्थांची मांडणी केली जाते, तर खड्ड्यात घागरीच्या बाजूला राजा व त्याची गादी म्हणजे पान-सुपारी ठेवली जाते, तर मातीच्या घटामध्ये गोलाकार पद्धतीने अंबाडी, गहू, ज्वारी, बाजरी, कपाशी, हिवाळी मूग, उडीद, करडी, तांदूळ, जवस, तीळ, मसुर, हरभरा, वाटाणा, भादली इत्यादी १८ प्रकारच्या धान्याची मांडणी करतात.धान्य आणि खाद्यपदार्थांचा वापर करून या घटमांडणीतून झालेल्या बदलाचे दुसऱ्या दिवशी पहाटे अतिशय सूक्ष्म पद्धतीने अवलोकन केले जाते आणि त्यावरून भाकिते वर्तविली जातात. मगच शेतकरी पेरणीची दिशा ठरतो.