शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
4
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
5
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
6
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
7
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
8
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
9
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
10
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
11
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
12
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
13
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
14
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
15
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
16
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
17
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
18
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
19
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
20
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ

ढगाळ वातावरणामुळे तूर धोक्यात

By admin | Updated: October 29, 2014 00:12 IST

बुलडाणा तालुक्यातील पिकपरिस्थिती; सोयाबीन, कपाशी पाठोपाठ तुरीचे उत्पन्न घटण्याची शक्यता.

बुलडाणा : सोयाबीन, कपाशी हातची गेल्यानंतर शेतकर्‍यांना तुरीच्या पिकाकडून आशा होती; मात्र गेल्या तीन दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणाने तूरही संकटात आली आहे. अळ्यांचा प्रकोप आणि फुलोर गळत असल्याने तुरीचे उत्पन्नही घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बुलडाणा जिल्ह्यात काही भागात कमी, तर काही भागात जास्त पाऊस झाला. सुरुवातीपासून पावसाची शेतकर्‍यांना प्रतीक्षा करावी लागली. रोहिणी, मृग नक्षत्र कोरडे गेल्याने पेरण्या लांबल्या होत्या. अशा स्थितीत शेतकर्‍यांनी सोयाबीन आणि कपाशीची पेरणी केली. आंतरपीक म्हणून प्रत्येक शेतकर्‍याने सोयाबीन आणि कपाशीच्या पिकात तुरीची पेरणी केली; मात्र अपुर्‍या पावसाने आणि किडींच्या प्रकोपाने सोयाबीन उद्ध्वस्त झाले. त्या पाठोपाठ कपाशीनेही दगा दिला. अशा स्थितीत शेतात उभी असलेल्या हिरव्यागार तुरीकडून अपेक्षा होती. सध्या तूर फुलोर्‍यावर आली आहे; मात्र त्यावर आता ढगाळी वातावरणाचा परिणाम होत आहे. हिरव्या अळ्यांनी तुरीवर आक्रमण केले आहे. पाने कुरतडणार्‍या या अळीने शेतकर्‍यांना हैराण केले आहे. तुरीच्या झाडावर पिवळी फुले लागली आहे; परंतु ढगाळ वातावरणाने फुले गळून पडत आहे. त्यामुळे तुरीचे पीकही हाती येण्याची शक्यता कमी आहे. निसर्गाच्या अवकृपेचा फटका बसत असताना वन्यजीवांचाही त्रास शेतकर्‍यांना सहन करावा लागत आहे.