शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

कलिंगड रस्त्यावर टाकण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:27 IST

साखरखेर्डा परिसरातील शिंदी, सवडद, तांदूळवाडी, आंबेवाडी या चार गावांत बागायतदार शेतकरी जास्त आहेत. यापैकी अनेकांनी शेतातच घर करून राहणे ...

साखरखेर्डा परिसरातील शिंदी, सवडद, तांदूळवाडी, आंबेवाडी या चार गावांत बागायतदार शेतकरी जास्त आहेत. यापैकी अनेकांनी शेतातच घर करून राहणे पसंत केले आहे. बागायती शेती कसायची असेल, तर सकाळीच फवारणी, पाणी देणे, शेतीची मशागत ही कामे करावी लागतात. मजूर कामावर असले, तरी सर्व कामे त्यांच्यावर अवलंबून करायची म्हटलं तर नियमित होत नाही. स्वतः शेतकऱ्याला मेहनत घ्यावी लागते. शिंदी येथील विनोद खरात हे बागायती शेती करतात. आजही पारंपरिक पीक घेण्यापेक्षा त्यांनी कलिंगड, खरबूज, डाळिंब, पेरू, आंबा या फळबागा लावल्या आहेत. वादळी वाऱ्यामुळे आंब्याचे मोठे नुकसान झाले. डाळिंबाची फुले गळून पडली. कलिंगडाची लागवड यशस्वी झाली असताना व्यापाऱ्यांनी मालाची उचल केली नाही. गेल्या चार महिन्यांपासून बाजार बंद असल्याने नेमके कलिंगड न्यावे कोठे? हा प्रश्न पडला आहे. काढलेले कलिंगड व्यापाऱ्यांनी नेले नसल्याने विनोद खरात यांनी रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्यांना नेता येईल एवढे कलिंगड वाटण्याचा निर्णय घेतला. कारण फळ खराब होते, त्याची दुर्गंधी पसरते. यापेक्षा फुकट वाटलेले बरे ! असा निर्णय त्यांनी घेतला.

--पाच लाखांचा तोटा--

शेतकऱ्यांना यंदा मोठा तोटा सहन करावा लागला. कलिंगड विक्री न झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी कलिंगड रस्त्यावर फेकून दिले, तर काहींनी वाटप केले. यावर्षी शेतकरी विनोद खरात यांना पाच लाखांचा तोटा सहन करावा लागला. हीच अवस्था तांदूळवाडी, सवडद, आंबेवाडी येथील शेतकऱ्यांची आहे.