शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
4
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
5
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
6
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
7
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
8
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
9
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
10
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
11
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
12
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
13
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
14
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
15
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
16
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
17
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
18
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
19
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
20
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

काँग्रेस-आघाडी नगरसेवकांचा साडेतीन तास ठिय्या

By admin | Updated: April 18, 2017 22:36 IST

खामगाव- काँग्रेसच्या गटनेत्या अर्चना टाले यांना पालिकेत तात्कळत ठेवल्याच्या निषेधार्थ मंगळवारी सायंकाळी काँग्रेस आघाडीच्या नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात साडेतीन तास ठिय्या आंदोलन केले.

सर्वसाधारण सभेतील ठरावाच्या प्रती देण्याची मागणीखामगाव : येथील नगर पालिकेच्या सर्व साधारण सभेच्या ठरावांच्या प्रती देण्यात टाळाटाळ करण्यासोबतच, काँग्रेसच्या गटनेत्या अर्चना टाले यांना पालिकेत तात्कळत ठेवल्याच्या निषेधार्थ मंगळवारी सायंकाळी काँग्रेस आघाडीच्या नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात साडेतीन तास ठिय्या आंदोलन केले. मुख्याधिकाऱ्यांच्या कृतीसह पालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या दुटप्पी धोरणाचा निषेधही यावेळी करण्यात आला. खामगाव नगर पालिकेत २८ फेब्रुवारी सर्वसाधारण सभा पार पडली. या सर्वसाधारण सभेत पारीत सर्व ठरावांच्या प्रती, सभेच्या मिनिटस् बुकच्या प्रती तसेच सभेची कार्यवृत्त प्रस्तिकेची प्रत मिळावी, यामागणीसाठी काँग्रेस नगरसेवक तसेच काँग्रेसच्या गटनेत्या सौ. अर्चना टाले यांनी ६ मार्च, १४ मार्च, १६ मार्च आणि २० मार्च रोजी तसेच १८ एप्रिल रोजी देखील पत्र देण्यात आले. मात्र, या ठरावाच्या प्रती उपलब्ध करून न देता, गटनेत्या अर्चना टाले यांना मंगळवारी तात्कळत ठेवण्यात आले. सायंकाळी साडेपाच वाजताच्या दरम्यान, काँग्रेस नगरसेवकांनी यासंदर्भात मुख्याधिकाऱ्यांना विचारणा केली. सोबतच २८ फेब्रुवारीच्या सभेच्या ठरावांच्या प्रतींची मागणी केली. त्यावेळी मुख्याधिकाऱ्यांनी कार्यालयीन कामकाज संपल्याचे सांगत, कार्यालय सोडले. मुख्याधिकाऱ्यांच्या या कृतीच्या निषेधार्थ काँग्रेस नगरसेवकांनी साडेपाच वाजतापासून सव्वा आठ वाजेपर्यंत मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. यावेळी सत्ताधाऱ्यांचाही निषेध करण्यात आला.या आंदोलनात काँग्रेस गटनेत्या सौ. अर्चना टाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक देवेंद्रदादा देशमुख, अमय सानंदा, प्रवीण कदम, भारिपचे नगरसेवक विजय वानखडे, शीतल माळवंदे, भूषण शिंदे, इब्राहिम खान, रेहाना बेगम, संगीता पाटील, अ. रशीद यांच्यासह काँग्रेस नगरसेवकांचा आणि कार्यकर्त्यांचा सहभाग होता. दरम्यान, यासंदर्भात मुख्याधिकाऱ्यांची प्रतिक्रीया जाणून घेण्यासाठी प्रयत्न केला असता, त्यांनी यासंदर्भात कोणतीही प्रतिक्रीया देण्यास नकार दिलाखामगाव पालिकेतील या घटनाक्रमाचा पाढा काँग्रेस नेते तथा माजी आ. दिलीपकुमार सानंदा यांनी साडेसात वाजता जिल्हाधिकाऱ्यांकडे वाचला. मुख्याधिकाऱ्यांसोबतच खामगाव पालिकेतील सत्ताधाऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे भ्रमण दूरध्वनीवरून तक्रार केली. जिल्हाधिकाऱ्यांनी रात्री आंदोलन करण्याऐवजी बुधवारी सकाळी बुलडाणा येथे जिल्हाधिकारी कार्यालयात आपले ग्राहाणे मांडण्याच्या सूचना केल्या. काँग्रेसनेते सानंदा यांनी पालिकेतील आंदोलन थांबविण्याचा निरोप पालिकेत दिला. त्यानंतर काँग्रेस-आघाडीच्या नगरसेवकांनी सव्वा आठ वाजता मुख्याधिकाऱ्यांच्या दालनातील आंदोलन थांबविले.