शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

काँग्रेस-आघाडी नगरसेवकांचा साडेतीन तास ठिय्या

By admin | Updated: April 18, 2017 22:36 IST

खामगाव- काँग्रेसच्या गटनेत्या अर्चना टाले यांना पालिकेत तात्कळत ठेवल्याच्या निषेधार्थ मंगळवारी सायंकाळी काँग्रेस आघाडीच्या नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात साडेतीन तास ठिय्या आंदोलन केले.

सर्वसाधारण सभेतील ठरावाच्या प्रती देण्याची मागणीखामगाव : येथील नगर पालिकेच्या सर्व साधारण सभेच्या ठरावांच्या प्रती देण्यात टाळाटाळ करण्यासोबतच, काँग्रेसच्या गटनेत्या अर्चना टाले यांना पालिकेत तात्कळत ठेवल्याच्या निषेधार्थ मंगळवारी सायंकाळी काँग्रेस आघाडीच्या नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात साडेतीन तास ठिय्या आंदोलन केले. मुख्याधिकाऱ्यांच्या कृतीसह पालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या दुटप्पी धोरणाचा निषेधही यावेळी करण्यात आला. खामगाव नगर पालिकेत २८ फेब्रुवारी सर्वसाधारण सभा पार पडली. या सर्वसाधारण सभेत पारीत सर्व ठरावांच्या प्रती, सभेच्या मिनिटस् बुकच्या प्रती तसेच सभेची कार्यवृत्त प्रस्तिकेची प्रत मिळावी, यामागणीसाठी काँग्रेस नगरसेवक तसेच काँग्रेसच्या गटनेत्या सौ. अर्चना टाले यांनी ६ मार्च, १४ मार्च, १६ मार्च आणि २० मार्च रोजी तसेच १८ एप्रिल रोजी देखील पत्र देण्यात आले. मात्र, या ठरावाच्या प्रती उपलब्ध करून न देता, गटनेत्या अर्चना टाले यांना मंगळवारी तात्कळत ठेवण्यात आले. सायंकाळी साडेपाच वाजताच्या दरम्यान, काँग्रेस नगरसेवकांनी यासंदर्भात मुख्याधिकाऱ्यांना विचारणा केली. सोबतच २८ फेब्रुवारीच्या सभेच्या ठरावांच्या प्रतींची मागणी केली. त्यावेळी मुख्याधिकाऱ्यांनी कार्यालयीन कामकाज संपल्याचे सांगत, कार्यालय सोडले. मुख्याधिकाऱ्यांच्या या कृतीच्या निषेधार्थ काँग्रेस नगरसेवकांनी साडेपाच वाजतापासून सव्वा आठ वाजेपर्यंत मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. यावेळी सत्ताधाऱ्यांचाही निषेध करण्यात आला.या आंदोलनात काँग्रेस गटनेत्या सौ. अर्चना टाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक देवेंद्रदादा देशमुख, अमय सानंदा, प्रवीण कदम, भारिपचे नगरसेवक विजय वानखडे, शीतल माळवंदे, भूषण शिंदे, इब्राहिम खान, रेहाना बेगम, संगीता पाटील, अ. रशीद यांच्यासह काँग्रेस नगरसेवकांचा आणि कार्यकर्त्यांचा सहभाग होता. दरम्यान, यासंदर्भात मुख्याधिकाऱ्यांची प्रतिक्रीया जाणून घेण्यासाठी प्रयत्न केला असता, त्यांनी यासंदर्भात कोणतीही प्रतिक्रीया देण्यास नकार दिलाखामगाव पालिकेतील या घटनाक्रमाचा पाढा काँग्रेस नेते तथा माजी आ. दिलीपकुमार सानंदा यांनी साडेसात वाजता जिल्हाधिकाऱ्यांकडे वाचला. मुख्याधिकाऱ्यांसोबतच खामगाव पालिकेतील सत्ताधाऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे भ्रमण दूरध्वनीवरून तक्रार केली. जिल्हाधिकाऱ्यांनी रात्री आंदोलन करण्याऐवजी बुधवारी सकाळी बुलडाणा येथे जिल्हाधिकारी कार्यालयात आपले ग्राहाणे मांडण्याच्या सूचना केल्या. काँग्रेसनेते सानंदा यांनी पालिकेतील आंदोलन थांबविण्याचा निरोप पालिकेत दिला. त्यानंतर काँग्रेस-आघाडीच्या नगरसेवकांनी सव्वा आठ वाजता मुख्याधिकाऱ्यांच्या दालनातील आंदोलन थांबविले.