शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील हजारो विद्यार्थी स्पर्धा परीक्षांच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:42 IST

एमपीएससीद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षा रखडल्या : विद्यार्थी संतप्त, आंदोलनाच्या पवित्र्यात बुलडाणा : कोरोनाचा प्रादुर्भाव, कधी मराठा आरक्षण तर कधी ...

एमपीएससीद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षा रखडल्या : विद्यार्थी संतप्त, आंदोलनाच्या पवित्र्यात

बुलडाणा : कोरोनाचा प्रादुर्भाव, कधी मराठा आरक्षण तर कधी अन्य तांत्रिक कारणांमुळे राज्य लोकसेवा आयोगाद्वारे करण्यात येणारी पदभरती, घेण्यात येणाऱ्या परीक्षा, नियुक्त्या रखडलेल्या आहेत. त्यामुळे राज्यातील जवळपास १५ लाख विद्यार्थी अस्वस्थ आहेत.

कोरोनामुळे गरीब सामान्य वर्गातील कुटुंबाची आर्थिक घडी विस्कटलेली आहे आणि त्यातच मागील २ ते ३ वर्षांपासून परीक्षा लांबणीवर जाणे, नियुक्त्या रखडणे, नवीन पदभरती न होणे हे विद्यार्थ्यांसाठी भयावय आहे. परिणामी विद्यार्थ्यांचे शारीरिक, आर्थिक तसेच मानसिक खच्चीकरण होत आहे. त्यामुळे विद्यार्थी संतप्त झाले आहेत. आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

एमपीएससीद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षेची स्थिती

राज्य सेवा परीक्षा चारवेळा पुढे ढकलण्यात आली. विद्यार्थ्यांच्या आक्रोशानंतर मार्च २०२१ मध्ये पूर्वपरीक्षा घेण्यात आली. आतापर्यंत निकाल लागलेला नाही. संयुक्त पूर्वपरीक्षा पाचवेळा पुढे ढकलण्यात आली. मागील १८ महिन्यांपासून परीक्षा झाली नाही. आरटीओची पूर्वपरीक्षा होऊन दीड वर्ष झाले. अजूनही निकाल लागलेला नाही. सहा. वनसंरक्षकाच्या परीक्षेचा अंतिम निकाल गेल्या वर्षभरापासून लागलेला नाही. वर्ग क च्या मंत्रालयीन पदांकरिता २ वर्षांपासून जाहिरात नाही. कर सहायक, महिला व बाल कल्याण अधिकारी या पदाकरिता तीन वर्षांपासून जाहिरात नाही. स्थापत्य अभियांत्रिकी परीक्षेत ३,६०० विद्यार्थ्यांच्या मुलाखती रखडलेल्या आहेत. कृषी विभागातील पदभरती रखडलेली आहे. पीएसआय पदासाठी, शारीरिक चाचणी दीड वर्षापासून झालेली नाही.

...............प्रतिक्रीया.........

विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य

गत २०१६ पासून एमपीएससीची तयारी सरू केली. दहा दहा तास अभ्यास केला आहे. यंदा नक्कीच मेन्स क्लिअर होईल याचा आत्मविश्वास आहे. परंतु एमपीएससीने परीक्षेची तारीख काही जाहीर केली नाही. परिश्रम घेऊनही परीक्षाच हाेत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य आले आहे.

-निकिता निरमल, विद्यार्थिनी

परीक्षा होत नसल्या तर मुलांचे वय निघून जात आहे. परीक्षेच्या तयारीसाठी ते दुसरे जॉब करीत नाही. यासाठी सरकार आणि एमपीएससीही जबाबदार आहे. एमपीएससी आपल्या निर्णयावर ठाम नाही. सरकारचा हस्तक्षेप वाढला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे.परीक्षांच्या तारखा जाहीर करण्याची गरज आहे.

- सागर अवातीरक, विद्यार्थी

................बॉक्स.............

राज्य लोकसेवा आयोगात सदस्यांच्या नियुक्त्या रखडल्या

मागील तीन वर्षांपासून राज्य लोकसेवा आयोगात सदस्यांची नियुक्ती केली नाही. सध्या ६ पैकी २ सदस्य कार्यरत आहेत. मागील सरकारने आणि आताच्याही सरकारने सुद्धा याकडे दुर्लक्षच केले आहे. दोनपैकी एक सदस्य लवकरच निवृत्त होणार आहे. त्याचा परिणाम एमपीएससीद्वारे आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षांवर होत आहे.

एमपीएससीच्या परीक्षाच हाेत नसल्याने अनेक विद्यार्थी निराश झाले आहेत़ काेराेनामुळे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र बंद आहेत. त्यामुळे स्पर्धा परीक्षा केंद्र संचालकांवर उपासमारीची वेळ सध्या आली आहे. या संचालकांच्या मार्गदर्शन केंद्रांचा व्यावसायिक प्रतिष्ठानमध्ये सामावेश करावा व व्यावसायिक दर्जा प्राप्त करून द्यावा.

प्रा. डॉ. नितीन रामप्रसाद जाधव

संचालक, स्पर्धा परीक्षा केंद्र

१६ महिन्यांपासून सर्व खासगी क्लासेस, अभ्यासिका, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, सरकारच्या नियमानुसार बंद आहे, आम्ही सर्व शिक्षकांनी क्लासेस अभ्यासिका करीता हॉल भाड्याने, घरभाडे, कर्जाचे हप्ते हे मात्र सर्व चालूच आहे. त्याला लाकडाऊन नाही, काही शिक्षकांनी आपले फर्निचर विकले, ८० टक्के शिक्षकांनी हाॅल सोडून दिले, काही शिक्षकांनी भाजीपाल्याची, शेतात मजुरी, इ. कामे करून आपलं कुटुंब जगवत आहेत.

प्रा. दीपक चाटे, केंद्रसंचालक