शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

अपु-या पावसाअभावी सिंचन प्रकल्प तहानलेले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 01:37 IST

धाड : पावसाळा सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटत आहे; परंतु अद्यापही पुरेसा आणि जोरदार स्वरूपाचा पाऊस बुलडाणा तालुक्यात नसल्याने, या ठिकाणी सर्व सिंचन प्रकल्प तहानलेले आहेत.

ठळक मुद्देखरिपाच्या पिकांवर संकट : शेतकरी त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कधाड : पावसाळा सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटत आहे; परंतु अद्यापही पुरेसा आणि जोरदार स्वरूपाचा पाऊस बुलडाणा तालुक्यात नसल्याने, या ठिकाणी सर्व सिंचन प्रकल्प तहानलेले आहेत.सतत अवर्षणग्रस्त वातावरण, पिकांचे वारंवार पावसाअभवी होणारे हाल आणि कमी होणारे पर्जन्यमान, यामुळे पीक पेरणी क्षेत्रावर याचा विपरीत परिणाम होत आहे. सध्या बुलडाणा तालुक्यातील पेरणी क्षेत्रापैकी सोयाबीन पिकास फुले लागली असून, काही ठिकाणी सोयाबीनला वाद्या लागल्या आहे, तर गेल्या सप्ताहभरापासून पावसाचा थेंबही पडला नसल्याने फुले व वाद्याची गळती निश्चित होऊन सोयाबीनला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. सध्या सोयाबीन पीक फळधारणेकडे जात असताना पावसाची उघडीप जीवघेणी ठरत आहे. सोबतच कमी प्रमाणात असणाºया पावसाच्या प्रमाणामुळे खरिपाची सर्वच पिके धोक्यात सापडली आहेत. उघडीपने वरचेवर पिकांना पाण्याची मोठी गरज भासत आहे. पावसाचे पाण्यावर तग धरणारी पिकं विहिरीच्या पाण्यावर दम मारण्यास असमर्थ ठरत आहेत.५५ हजारांवर असणाºया पेरणीक्षम क्षेत्रावर मका, कपाशीचे क्षेत्र वाढले आहे, तर सोयाबीन त्याचे खालोखाल आहे. नगदी पीक असणाºया पिकांना पाण्याची ओढ सहन करावी लागत आहे. मागील वर्षी आतापर्यंत किमान तालुक्यातील सिंचन प्रकल्पांना पुरेसा जलसाठा आला होता, तर किमान पिकांना पाण्याची ओढ सहन करावी लागली नव्हती. सध्या वातावरण जरी ढगाळ असले, तरी वाºयासोबत वाहून जाणारे ढग कोरडेच ठरत आहे. विचित्र वातावरणाचा आभास हा दुष्काळाकडे वाटचाल करणारा ठरतो की काय, असा प्रश्न शेतकºयांना पडत आहे. शेतकºयांचे माथी सदैव नैसर्गिक संकटाची मालिका असल्याने तो याच्याशी अनेक वर्षांपासून लढा देत आहे; परंतु शासनाने कर्जमाफी घोषित करून अद्यापपर्यंत अंमलबजावणी न केल्याने हे सुलतानी संकट त्यांच्यावर आल्याने यामधून कसे सावरायचे हा प्रश्न त्यांना पडला आहे.