शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

हंगाम तोंडावर: हमीभावाने तूर खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत नियोजन नाही 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 15:41 IST

खामगाव: यंदाचा तुरीचा हंगाम तोंडावर आला असताना, हमीभावाने तूर खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत जिल्हयात अद्याप कोणतेही नियोजन करण्यात आले नसल्याचे दिसून येते.

देवेंद्र ठाकरेलोकमत न्युज नेटवर्कखामगाव: यंदाचा तुरीचा हंगाम तोंडावर आला असताना, हमीभावाने तूर खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत जिल्हयात अद्याप कोणतेही नियोजन करण्यात आले नसल्याचे दिसून येते. शेतकºयांकडून मात्र तूर खरेदीसाठी आॅनलाईन नोंदणीची मागणी जोर धरत आहे.शेतकºयांना शेतमालाचा योग्य मोबदला मिळावा, यासाठी शासनाकडून प्रत्येक तालुक्यात हमीभावाने शासकीय खरेदी केंद्र सुरू करून शेतमाल हमीभावाने खरेदी करण्याचा प्रयत्न गेल्या दोन वषार्पासुन प्रयत्न सुरू आहे. असे असताना, खरेदीचे नियोजन वेळेवर होत नसल्याने हंगाम निघून गेल्यानंतर खरेदी केंद्र सुरू होते व याचा लाभ शेतकºयांऐवजी व्यापाºयांनाच जास्त होताना दिसून येत आहे. त्यामुळे शेतमालाची शासकीय खरेदी वेळेत सुरू करावी, अशी मागणी शेतकºयांकडून करण्यात येत आहे. यावर्षी उडीद, मुग, सोयाबिन उत्पादक शेतकºयांना खरेदी वेळेत सुरू न झाल्याने आपला शेतमाल कवडीमोल भावाने विकावा लागला. हीच परिस्थीती तूर उत्पादक शेतकºयांची होऊ नये, यासाठी तूर खरेदी साठी आॅनलाईन नोंदणी सुरू करावी, अशी मागणी संपुर्ण जिल्ह्यात जोर धरू लागली आहे. येत्या पंधरा दिवसात तुरीचा हंगाम सुरू होणार असल्याने शेतकºयांकडून मागणी जोर धरत असताना, संबंधित विभागाकडून मात्र याबाबत कोणतेही नियोजन करण्यात आले नसल्याचे दिसून येत आहे. याबाबत जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तब्येत बरी नसल्याचे सांगून त्यांनी या विषयावर बोलणे टाळले. 

वस्तुस्थिती पटवून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पाठविल्या शेंगा!तुरीचा हंगाम अगदी जवळ आला आहे, हे पटवून देण्यासाठी संग्रामपूर तालुक्यातील भारीप बहूजन महासंघाच्या पदाधिकाºयांनी शेतकºयांना सोबत घेत तुरीच्या पक्क्या झालेल्या शेंगा तहसीलदारांमार्फत मुख्यंमत्र्यांना पाठविल्या. सोबतच हमीभावाने तूर खरेदी करण्यासाठी आॅनलाईन नोंदणी लवकर सुरू करण्याची मागणी करणारे निवेदनही दिले. 

 मागील वर्षीच्या अनुदानाचा प्रश्न निकाली काढा!मागील वर्षी हमीभावाने तूर विक्रीसाठी शेतकºयांनी नोंदणी केलेल्या, परंतु मालाचे मोजमाप होऊ न शकलेल्या शेतकºयांना प्रतिक्विंटल १ हजार रूपये अनुदान जाहीर करण्यात आले होते. हे अनुदान अद्याप  अनेक शेतकºयांना मिळाले नाही. अनेकांच्या खात्यात केवळ पाचशे-सातशे रूपये जमा करण्यात आले. ही थट्टा थांबवावी, अशी मागणी स्वाभीमानीचे युवा जिल्हाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी केली आहे. यावर्षी तूर खरेदी वेळेत सुरू करण्यासाठी जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

  

सरकारला निवेदनाची भाषा समजत नाही. त्यामुळे यासंदर्भात लवकरच मोठे आंदोलन करण्यात येणार आहे. हमीभावाने खरेदी केंद्र सुरू करणे, ही मागणी महत्वाची आहेच; परंतु याचा सर्वाधिक लाभ व्यापाºयांनाच होतो. तेव्हा शेतकºयांनी इतरत्र विक्री केलेल्या मालावरही भावफरक अनुदान देण्यात यावे, अशी आमची मागणी राहणार आहे.- रविकांत तुपकरप्रदेशाध्यक्ष, स्वाभीमानी शेतकरी संघटना

टॅग्स :khamgaonखामगावbuldhanaबुलडाणाagricultureशेती