शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

सर्व शाळांचा दहावीचा निकाल शंभर टक्के !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:24 IST

सिम व्हेरिफिकेशनच्या नावावर फसवणूक बुलडाणा : तुमचे सिम कार्ड बंद होणार आहे. डेटा अपडेट करण्यासाठी हा कॉल आहे. त्यासाठी ...

सिम व्हेरिफिकेशनच्या नावावर फसवणूक

बुलडाणा : तुमचे सिम कार्ड बंद होणार आहे. डेटा अपडेट करण्यासाठी हा कॉल आहे. त्यासाठी तुमचा फोन काहीवेळ बंद ठेवा, असे सांगणारा कॉल जर तुमच्या मोबाइलवर आला, तर सावधान ! ही तुमची फसवणूक असू शकते. इतकेच नव्हे तर सिम कार्ड व्हेरिफिकेशनसाठी कॉल असल्याचे सांगूनही फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत.

जिल्ह्यात जनावरांचे लसीकरण रखडले !

बुलडाणा : कोरोना लसीकरण लांबलेले असतानाच, जनावरांच्या लसीकरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तोंडखुरी, पायखुरी, आदी आजारांपासून संरक्षण करण्यासाठी जनावरांना दरवर्षी नोव्हेंबर आणि मे महिन्यांत हे लसीकरण केले जाते.

शाळा सुरू हाेण्याची विद्यार्थ्यांना प्रतीक्षा

बुलडाणा : सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून रुग्णसंख्या कमी हाेत आहे़ लसीकरणाचा वेग वाढविल्यास शाळा सुरू करणे शक्य हाेणार आहे़ दाेन वर्षांपासून घरातच असलेल्या मुलांना शाळा सुरू हाेण्याची प्रतीक्षा आहे़

ग्रामीण भागात नालेसफाईला वेग

मेहकर : ग्रामपंचायतीच्या वतीने मान्सूनपूर्व नाल्यांच्या सफाईचे काम सध्या वेगाने पूर्ण करण्यात येत आहे. वॉर्डनिहाय कर्मचाऱ्यांवर जबाबदारी देण्यात आली असून, लवकरात लवकर काम पूर्ण करण्याचे नियोजन दिसून येत आहे.

सातबारावर बोजा असल्याने अडचणी

हिवरा आश्रम : पीक कर्जदार शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर इतर खासगी वित्तीय संस्थांचा बोजा असल्याचे कारण सांगून त्यांना पीक कर्जापासून रोखण्यात येेते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

खंडित वीजपुरवठ्याने ग्रामस्थ त्रस्त

मलकापूर पांग्रा : येथील महावितरणचे ३३ केव्ही सबस्टेशन असले, तरी खासगी आणि कंत्राटी कामगारच येथील कारभार पाहतात. या गावात कायमस्वरूपी लाईनमन नाही. त्यामुळे येथे वारंवार वीजपुरवठा खंडित होतो.

वर्षभरात ३२ बालविवाह रोखले

बुलडाणा : गेल्या वर्षभरामध्ये जिल्ह्यात ३२ बालविवाह रोखण्यात जिल्हा यंत्रणेला यश आले आहे. बालविवाह हा कायद्याने गुन्हा असला तरी, जिल्ह्यात होणारे बालविवाह चिंताजनक आहेत. प्रशासनाने जनजागृती करण्याची गरज आहे.

पीककर्जाचे पुनर्गठण करण्याची मागणी

किनगाव जट्टू : गतवर्षीपासून अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातच यावर्षी पीककर्ज वाटपात दिरंगाई हाेत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. पीक कर्जाचे पुनर्गठण करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

बियाणे उपलब्ध करून देण्याची मागणी

धामणगाव बढे : परिसरातील शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागले आहेत. अनेक शेतकऱ्यांना बियाणे मिळत नसल्याचे चित्र आहे. पेरणी सुरू हाेण्यापूर्वी प्रशासनाने शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध करून देण्याची मागणी हाेत आहे.

शेणखताकडे वाढला शेतकऱ्यांचा कल

धामणगाव धाड : या वर्षी पाऊस वेळेवर दाखल होण्याचा अंदाज हवामान खात्याने दिल्याने खरीपपूर्व शेतीकामांना वेग आला आहे. मशागतीकरिता बैलांऐवजी ट्रॅक्टरचा वापर यंदाच्या हंगामात वाढल्याचे चित्र आहे. रखरखत्या उन्हातही शेतकऱ्यांनी शेती मशागतीच्या कामांना सुरुवात केली आहे. रासायनिक खतांचे भाव वाढल्याने शेतकरी शेणखताकडे वळल्याचे चित्र आहे़

काेराेनाविषयी जनजागृती करण्याची गरज

बुलडाणा : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक ग्रामीण भागातही झाला हाेता़ लोकांमध्ये कोरोनाबाबत बरेच गैरसमज आहेत, भीती आहे. अनेकजण काेराेनाची लागण झाल्यावरही तपासणी करीत नाहीत. त्यामुळे कोरोनाबाबत योग्य जनजागृती करणे गरजेचे आहे, असे मत शिवराज शिक्षण संस्था, अंत्री तेलीचे अध्यक्ष नरेश शेळके यांनी केले.