शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
3
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
4
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
5
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
6
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
7
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
8
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
9
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
10
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
11
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
12
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
13
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
14
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
15
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
16
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
17
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
18
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
19
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
20
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS

बाहय अंतरंगाचा विकासासोबत तंत्रज्ञानाचे शिक्षण महत्वाचे - मानकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 13:32 IST

आधुनिकतेशी नाड जोडण्यासाठी त्यांना संगणकाचे तंत्रज्ञान शिकवणेही आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण द्यावे, असे आवाहन महात्मा जोतिबा फुले मंडळाचे अध्यक्ष सुभाष मानकर यांनी केले.

ठळक मुद्देयेथील महात्मा जोतिबा उच्च प्राथमिक शाळेमध्ये २८ जुलै रोजी सायंकाळी पालकसभेचे आयोजन करण्यात आले होते. लोकशाही पध्दतीने शालेय विद्यार्थ्यांची निवडणूक घेऊन शालेय मंत्री मंडळाची स्थापना करण्यात आली.

बुलडाणा : शाळेत शिक्षण घेत असताना शैक्षणिक ज्ञान विद्यार्थी घेत असतात. हे ज्ञान मिळविण्यासोबतच त्यांच्या बाहय व अंतरंगाचा विकास होणे व त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे आवश्यक आहे. या सोबतच आजच्या आधुनिकतेशी नाड जोडण्यासाठी त्यांना संगणकाचे तंत्रज्ञान शिकवणेही आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण द्यावे, असे आवाहन महात्मा जोतिबा फुले मंडळाचे अध्यक्ष सुभाष मानकर यांनी केले. येथील महात्मा जोतिबा उच्च प्राथमिक शाळेमध्ये २८ जुलै रोजी सायंकाळी पालकसभेचे आयोजन करण्यात आले होते, या वेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिक स्नेहलता मानकर या होत्या. महात्मा फुले मंडळाचे सचिव इंजि.सुरेश चौधरी, शाळा समितीचे अध्यक्ष प्रकाश वानेरे, पालक प्रतिनिधी कावेरी अपार यांची विचारमंचावर उपस्थिती होती. यावेळी लोकशाही पध्दतीने शालेय विद्यार्थ्यांची निवडणूक घेऊन शालेय मंत्री मंडळाची स्थापना करण्यात आली. यावेळी नियुक्त मंत्रीमंडळाचा शपथविधी पार पडला. अक्षय सुसर सभापती, उपसभापती राणी विनोद जाधव व त्यांच्या मंत्री मंडळाला मुख्याध्यापिका स्नेहलता मानकर यांनी साक्षी लोखंडे मुख्यमंत्री, वैष्णवी मिसाळ, धीरज वाघ, निखील कोठाळे, गौरी खिरोडकर, राजनंदिनी सुरडकर यांना गोपनियतेची शपथ दिली. या पालक शिक्षक सभेत काशीराम वाघमारे,जीवन पालकर, गौरव जाधव, राधा उबरहंडे, संजय भराड, गजानन वाघ, शारदा मुठ्ठे या पालकांनी सुचना करत आपले मत मांडत मनोगत व्यक्त केले. सभेचे संचलन सुवर्णा खिल्लारे यांनी तर आभार प्रदर्शन दिनेश बस्सी यांनी केले.

विद्यार्थ्यांशी संवाद साधावा

पालकांनी आपल्या पाल्याशी शैक्षणिक संवाद दररोज साधावा व विद्यार्थ्यांच्या परीक्षा, स्पर्धा, चित्रकला, क्रीडा व इतर स्पर्धेत सहभागी होऊ द्यावे, असे आवाहन मुख्याध्यापिका स्नेहलता मानकर यांनी केले. प्रकाश वानेरे यांनी आपल्या पाल्यांचा दररोज अक्षर सुधारक्रम घ्यावा, अशी सूचना पालकांना दिली. तर अभ्यासक्रम, खेळ व शारीरिक व्यायाम यात विद्यार्थ्यांचा समन्वय शिक्षक व पालकांनी साधावा, असे मत व्यक्त केले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाSchoolशाळा