शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
6
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
7
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
8
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
9
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
10
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
11
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
12
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
13
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
14
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
15
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
16
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
17
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
18
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
19
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
20
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या

शेतकऱ्यांनी स्वखर्चाने सुरु केले गाळ काढण्याचे काम

By admin | Updated: April 19, 2017 01:01 IST

नांदुरा- शेतकऱ्यांनी पुढाकार घेत स्वखर्चाने २० वर्षापासून साचलेल्या नाला बांधातील गाळ काढण्याचे काम हाती घेतले आहे. यामुळे वाहून जाणारे पाणी साठणार आहे.

संदीप गावंडे - नांदुरा‘गाव करी ते राव न करी’ अशी जुनी म्हण आहे. अगदी असाच प्रत्यय वडनेर भोलजी येथे आला असून पाणी साठवून भुजलसाठ्यात वाढ करण्यासाठी शासनाकडे वारंवार मागणी करून अपेक्षित कामे होत नसल्याने शेवटी येथील शेतकऱ्यांनी पुढाकार घेत स्वखर्चाने २० वर्षापासून साचलेल्या नाला बांधातील गाळ काढण्याचे काम हाती घेतले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहून जाणारे पाणी साठणार असून त्याचा फायदा भुजल पातळीत वाढ होण्यास होणार आहे.दिवसेंदिवस कमी होत चाललेले पावसाचे प्रमाण ही शेती व शेतकरी यांच्यादृष्टीने अतिशय चिंताजनक बाब असून यावर उपाय म्हणजे पावसाचे पडणारे जास्तीत जास्त पाणी हे जमिनीत जिरवल्या गेले पाहिजे त्यामुळे भुजल पातळीत होणारी घट काही प्रमाणात थांबु शकते. शासनस्तरावर सध्या जलयुक्त विार योजनेच्या माध्यमातून शेततळे, नालाबांध, नाला खोलीकरण, सिमेंट बांध इ. विविध उपक्रम राबविल्या जात असले तरी गेल्या वर्षभरात यामुळे कितपत फायदा झाला हा चिंतनाचा भाग आहे.वडनेर गाव सुध्दा जलयुक्त शिवार योजनेत असून येथे शेतकरी वर्गाच्या अपेक्षेप्रमाणे अद्यापही कामे होत नसल्याने शेतकऱ्यांनी स्वत: पुढाकार घेत येथील चमेली नाल्यावरील २० वर्ष जुन्या नाला बांधात साचलेला गाळ काढण्याचे काम हाती घेतले असून यामुळे मोठ्या प्रमाणात पाणीसाठा जमा होणार आहे. याचा फायदा परिसरातील शेतकऱ्यांच्या विहिरींना होणार आहे.प्रगतीशील शेतकरी रविंद्र एंडोले, शंकर हिंगे, शे.बिलाल शे.युसुफ यांनी या कामी पुढाकार घेतला असून सोमवारी जलमित्र सुनिल सातव यांचे हस्ते नारळ फोडून या कामाची सुरूवात करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी हाती घेतलेल्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. सदर ठिकाणचा गाळ काढण्याविषयी कृषी विभागाकडे वेळोवेळी मागणी करूनही काम होत नसल्याने शेवटी शेतकऱ्यांनीच हे काम हाती घेतले. जलयुक्त शिवार योजनेतील गावाबाबतच अशी दप्तर दिरंगाई असेल तर इतर गावांचा विचारच करायला नको.- सुनिल सातव, जलमित्र, वडनेर भोलजी