शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
2
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
3
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
4
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
5
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
6
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
7
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
8
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
9
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
10
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
11
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
12
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
13
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
14
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
15
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
16
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
17
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
18
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
19
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
20
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू

शेतकऱ्यांनी स्वखर्चाने सुरु केले गाळ काढण्याचे काम

By admin | Updated: April 19, 2017 01:01 IST

नांदुरा- शेतकऱ्यांनी पुढाकार घेत स्वखर्चाने २० वर्षापासून साचलेल्या नाला बांधातील गाळ काढण्याचे काम हाती घेतले आहे. यामुळे वाहून जाणारे पाणी साठणार आहे.

संदीप गावंडे - नांदुरा‘गाव करी ते राव न करी’ अशी जुनी म्हण आहे. अगदी असाच प्रत्यय वडनेर भोलजी येथे आला असून पाणी साठवून भुजलसाठ्यात वाढ करण्यासाठी शासनाकडे वारंवार मागणी करून अपेक्षित कामे होत नसल्याने शेवटी येथील शेतकऱ्यांनी पुढाकार घेत स्वखर्चाने २० वर्षापासून साचलेल्या नाला बांधातील गाळ काढण्याचे काम हाती घेतले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहून जाणारे पाणी साठणार असून त्याचा फायदा भुजल पातळीत वाढ होण्यास होणार आहे.दिवसेंदिवस कमी होत चाललेले पावसाचे प्रमाण ही शेती व शेतकरी यांच्यादृष्टीने अतिशय चिंताजनक बाब असून यावर उपाय म्हणजे पावसाचे पडणारे जास्तीत जास्त पाणी हे जमिनीत जिरवल्या गेले पाहिजे त्यामुळे भुजल पातळीत होणारी घट काही प्रमाणात थांबु शकते. शासनस्तरावर सध्या जलयुक्त विार योजनेच्या माध्यमातून शेततळे, नालाबांध, नाला खोलीकरण, सिमेंट बांध इ. विविध उपक्रम राबविल्या जात असले तरी गेल्या वर्षभरात यामुळे कितपत फायदा झाला हा चिंतनाचा भाग आहे.वडनेर गाव सुध्दा जलयुक्त शिवार योजनेत असून येथे शेतकरी वर्गाच्या अपेक्षेप्रमाणे अद्यापही कामे होत नसल्याने शेतकऱ्यांनी स्वत: पुढाकार घेत येथील चमेली नाल्यावरील २० वर्ष जुन्या नाला बांधात साचलेला गाळ काढण्याचे काम हाती घेतले असून यामुळे मोठ्या प्रमाणात पाणीसाठा जमा होणार आहे. याचा फायदा परिसरातील शेतकऱ्यांच्या विहिरींना होणार आहे.प्रगतीशील शेतकरी रविंद्र एंडोले, शंकर हिंगे, शे.बिलाल शे.युसुफ यांनी या कामी पुढाकार घेतला असून सोमवारी जलमित्र सुनिल सातव यांचे हस्ते नारळ फोडून या कामाची सुरूवात करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी हाती घेतलेल्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. सदर ठिकाणचा गाळ काढण्याविषयी कृषी विभागाकडे वेळोवेळी मागणी करूनही काम होत नसल्याने शेवटी शेतकऱ्यांनीच हे काम हाती घेतले. जलयुक्त शिवार योजनेतील गावाबाबतच अशी दप्तर दिरंगाई असेल तर इतर गावांचा विचारच करायला नको.- सुनिल सातव, जलमित्र, वडनेर भोलजी