शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
5
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
6
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
7
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
8
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
9
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
10
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
11
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
12
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
13
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
14
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
15
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
16
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
17
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
18
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
19
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
20
देश सर्वप्रथम!- नि:स्पृह राष्ट्रसाधनेची १०० वर्षे!

शेतकऱ्यांनी स्वखर्चाने सुरु केले गाळ काढण्याचे काम

By admin | Updated: April 19, 2017 01:01 IST

नांदुरा- शेतकऱ्यांनी पुढाकार घेत स्वखर्चाने २० वर्षापासून साचलेल्या नाला बांधातील गाळ काढण्याचे काम हाती घेतले आहे. यामुळे वाहून जाणारे पाणी साठणार आहे.

संदीप गावंडे - नांदुरा‘गाव करी ते राव न करी’ अशी जुनी म्हण आहे. अगदी असाच प्रत्यय वडनेर भोलजी येथे आला असून पाणी साठवून भुजलसाठ्यात वाढ करण्यासाठी शासनाकडे वारंवार मागणी करून अपेक्षित कामे होत नसल्याने शेवटी येथील शेतकऱ्यांनी पुढाकार घेत स्वखर्चाने २० वर्षापासून साचलेल्या नाला बांधातील गाळ काढण्याचे काम हाती घेतले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहून जाणारे पाणी साठणार असून त्याचा फायदा भुजल पातळीत वाढ होण्यास होणार आहे.दिवसेंदिवस कमी होत चाललेले पावसाचे प्रमाण ही शेती व शेतकरी यांच्यादृष्टीने अतिशय चिंताजनक बाब असून यावर उपाय म्हणजे पावसाचे पडणारे जास्तीत जास्त पाणी हे जमिनीत जिरवल्या गेले पाहिजे त्यामुळे भुजल पातळीत होणारी घट काही प्रमाणात थांबु शकते. शासनस्तरावर सध्या जलयुक्त विार योजनेच्या माध्यमातून शेततळे, नालाबांध, नाला खोलीकरण, सिमेंट बांध इ. विविध उपक्रम राबविल्या जात असले तरी गेल्या वर्षभरात यामुळे कितपत फायदा झाला हा चिंतनाचा भाग आहे.वडनेर गाव सुध्दा जलयुक्त शिवार योजनेत असून येथे शेतकरी वर्गाच्या अपेक्षेप्रमाणे अद्यापही कामे होत नसल्याने शेतकऱ्यांनी स्वत: पुढाकार घेत येथील चमेली नाल्यावरील २० वर्ष जुन्या नाला बांधात साचलेला गाळ काढण्याचे काम हाती घेतले असून यामुळे मोठ्या प्रमाणात पाणीसाठा जमा होणार आहे. याचा फायदा परिसरातील शेतकऱ्यांच्या विहिरींना होणार आहे.प्रगतीशील शेतकरी रविंद्र एंडोले, शंकर हिंगे, शे.बिलाल शे.युसुफ यांनी या कामी पुढाकार घेतला असून सोमवारी जलमित्र सुनिल सातव यांचे हस्ते नारळ फोडून या कामाची सुरूवात करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी हाती घेतलेल्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. सदर ठिकाणचा गाळ काढण्याविषयी कृषी विभागाकडे वेळोवेळी मागणी करूनही काम होत नसल्याने शेवटी शेतकऱ्यांनीच हे काम हाती घेतले. जलयुक्त शिवार योजनेतील गावाबाबतच अशी दप्तर दिरंगाई असेल तर इतर गावांचा विचारच करायला नको.- सुनिल सातव, जलमित्र, वडनेर भोलजी