शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी, मोठं अनुदान देण्याचा निर्णय
5
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
6
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
7
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
8
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
9
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
10
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
11
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
12
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
13
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
14
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
15
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
16
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
17
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
18
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
19
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
20
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!

अंढेरा परिसरात पावसाळ्यात टँकरने पाणी पुरवठा

By ram.deshpande | Updated: July 26, 2017 01:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्कअंढेरा : पावसाळा सुरू होऊन एक महिना उलटला असला, तरी देऊळगाव राजा तालुक्यातील पाच गावांमध्ये पाणीटंचाईचे संकट कायम असून, टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे.परिसरातील अंढेरा, मेंडगाव, बायगाव, शिवणी आरमाळ, धोत्रा नंदई, नागनगाव या गावांना गेल्या २ ते ३ वर्षांपासून दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. यावर्षी अजूनही दमदार ...

ठळक मुद्देधरणे कोरडीच : गावक-यांवर पाणीटंचाईचे संकट

लोकमत न्यूज नेटवर्कअंढेरा : पावसाळा सुरू होऊन एक महिना उलटला असला, तरी देऊळगाव राजा तालुक्यातील पाच गावांमध्ये पाणीटंचाईचे संकट कायम असून, टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे.परिसरातील अंढेरा, मेंडगाव, बायगाव, शिवणी आरमाळ, धोत्रा नंदई, नागनगाव या गावांना गेल्या २ ते ३ वर्षांपासून दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. यावर्षी अजूनही दमदार पाऊस झाला नसल्याने जमिनीतील जलसाठ्यात वाढ झाली नसल्याने पाणीटंचाईचे संकट कायम आहे. अंढेरा, शिवणी आरमाळ, मेंडगाव येथील धरणात आतापर्यंत जलसाठ्यात वाढ झाली नसून, सदर धरणात आतापर्यंत शून्य मृतसाठा आहे, तसेच परिसरातील पाझर तलावसुद्धा कोरडेच आहे.शिवणी आरमाळ येथून परिसरातील अनेक गावांना पाणीपुरवठा होतो; परंतु धरणात पाणी नसल्यामुळे ग्रामपंचायतच्या अनेक योजना ठप्प पडल्या आहेत. अंढेरासह परिसरात पाटाचे पाणी येत असल्याने यावर्षी रब्बी पिकांवर मोठे संकट उभे ठाकले आहे. रब्बी पिकांना नगदी पिके म्हणून पाहिली जातात; परंतु पाणीच नसेल तर शेतकºयांपुढे मोठा प्रश्न उभा राहिला आहे.परिसरातील अनेक गावांत पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. मेंडगाव, बायगाव, शिवणी आरमाळ, पाडळी शिंदे, पिंप्री आंधळे, धोत्रा नंदई, सावखेड नागरे या गावांमध्ये आतापर्यंत सर्वसाधारण पाऊस झाल्याने तूर, सोयाबीन, कापूस, उडीद, मूग ही खरिपाची पिके चांगली आहेत. आतापर्यंत परिसरात दमदार पाऊस झाला नसल्याने दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे.या गावांना होतो टँंकरने पाणी पुरवठाअंढेरा गावासह परिसरातील पाडळी शिंदे, धोत्रा नंदई, नागणगाव या गावांना अजूनही टँकरने पाणीपुरवठा होत आहे. जुलै महिना संपण्याच्या मार्गावर असून, परिसरात आतापर्यंत दमदार पाऊस झाला नसल्याने या भागातील विहिरी, धरण, पाझर तलाव यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. त्यातच परिसरात दमदार पाऊस झाला नसल्याने शिवणी आरमाळ, अंढेरा, मेंडगाव येथील धरणात पाणी नसल्याने हे प्रकल्प कोरडेच आहेत. येथून गावांना पाणीपुरवठा करण्यात योजना पाण्याअभावी बंद आहेत. जनावरांनासुद्धा पाण्यासाठी भटकंती करावी लागते.