शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

टी-१ सी-१ मुळे टायगर कॉरिडॉर निर्मितीला चालना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 10:59 IST

अभयारण्याच्या संवर्धनासोबतच टायगर कॉरिडॉर निर्मितीला चालणा मिळण्याचे संकेत आहेत.

- नीलेश जोशी  लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: गेल्या सात महिन्यापासून ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये स्थिरावलेल्या टी-१ सी-१ वाघामुळे आता बुलडाणा, अकोला आणि जळगाव जिल्ह्यातील अभयारण्याच्या संवर्धनासोबतच टायगर कॉरिडॉर निर्मितीला चालणा मिळण्याचे संकेत आहेत.ज्ञानगंगा अभयारण्यातीलवाघाच्या अधिवासाबद्दल एक समिती नियुक्त करण्यात आलेली असून मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे संचालक एम. एस. रेड्डी अध्यक्ष असलेल्या या समितीची सोमवारी व्हीसी झाली. त्यास वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाचे डॉ. बिलाल हबीव, अकोला विभागीय वन्यजीव अधिकारी एम. एन. खैरनार व अन्य सदस्य या बैठकीस उपस्थित होते. त्यामध्ये ज्ञानगंगा अभयारण्य हे वाघाच्या अधिवासासाठी योग्य असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला असून भविष्यातील वाघाच्या अधिवासाचा विस्तार होण्याची शक्यता पाहता अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा, बुलडाणा जिल्ह्यातील अंबाबरवा आणि जळगाव जिल्ह्यातील मुक्ताई भवानी अभयारण्याचे त्यादृष्टीने संवर्धन करून टायगर कॉरिडॉर निर्मितीच्या दृष्टीने विचार मंथन झाले. या चारही ठिकाणी वाघाच्या अधिवासासाठी स्थिती योग्य असल्याचे मत या व्हीसीमध्ये व्यक्त करण्यात आले आहे. दरम्यान जवळपास १७०० किमीचा प्रवास करून टी-१-सी-१ हा ज्ञानगंगामध्ये आला आहे. येथील अधिवास वाघाच्या अस्तित्वासाठी पुरक असल्यानेच तो येथे थांबला आहे. त्यामुळे येथे या आता प्रोढ झालेल्या वाघासाठी वाघिण आणण्यासंदर्भातही सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानुषंगाने कोवीड संसर्गचा स्थिती व पुढील निधीचा प्रश्न हे मुद्दे अभ्यासून सहा महिन्यांतर अनुषंगीक विषयावर निर्णय घेण्याबाबत चर्चेमध्ये एकमत झाल्याची माहीती सुत्रांनी दिली. पेंच किंवा ताडोबा अभयारण्यातून सहजतेने टी-१ सी-१ ला सहचारीणी मिळण्यात अडचण नसल्याचेही समोर आले आहे.

ज्ञानगंगाचा अधिवास वाघांसाठी योग्यज्ञानगंगा अभयारण्याचा अधिवास हा वाघांसाठी योग्य असल्याचा निष्कर्ष यासंदर्भात नियुक्त करण्यात आलेल्या समितीने काढला असून ज्ञानगंगामध्ये प्रती चौरस किमी १८ प्राणी असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा दर अपेक्षा पेक्षा खूप अधिक आहे. सध्याच १३ पेक्षा अधिक बिबट या अभयारण्यात असल्याने हिंस्त्र प्राण्यांसाठी आवश्यक असणारी अन्न साखळी व त्यातल्या त्यात वाघांसाठी आवश्यक असलेले खाद्य येथे उपलब्ध आहे., चितळ, सांबळ, नील गाय, रानडुक्कर यांचीही संख्या येथे अधिक आहे, त्यामुळेच टी-१सी-१ येथे थांबलेला आहे.

ज्ञानगंगाचा विस्तार आवश्यकज्ञानगंगा अभयारण्याचा विस्तार २०५ चौरस किमी आहे. वाघांसाठी सरासरी ८०० ते एक हजार चौरस किमी विस्तार असलेले जंगल आवश्यक आहे. त्यादृष्टीनेच काटेपूर्णा, अंबाबरवा आणि मुक्ताई भवानी अभयारण्याचा कॉरिडॉर विकसीत करण्याच्या दृष्टीने सध्या मंथन सुरू आहे.

 

टॅग्स :dnyanganga abhayaranyaज्ञानगंगा अभयारण्यbuldhanaबुलडाणाTigerवाघ