खामगाव : बाजार समितीमध्ये नाफेड खरेदी केंद्राजवळ रस्त्यावर तूर फेकून सरकारचा निषेध करत पुन्हा नाफेड केंद्र सुरु करून शेतकऱ्यांची तूर खरेदी करा, अन्यथा हातात रुमने घ्यावे लागेल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष कैलास फाटे यांनी दिला आहे.स्वाभिमानी पुन्हा सरकार विरोधात आक्रमक झाली आहे. नाफेडमध्ये पडून असलेली तूर रस्त्यावर फेकत नाफेडने खरेदी पुन्हा सुरु करावी अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सरकारला दिला. नाफेडने अचानक तूर खरेदी बंद केल्याने जिल्ह्यात नाफेड केन्द्रावर हजारो क्विंटल तूर पडली आहे. त्यामुळे आता शेतकरी चांगलाच आक्रमक झाला आहे. एक महिन्यापासून तूर खरेदी होईल, याची वाट पाहत बसलेल्या शेतकऱ्यांवर आता आपली तूर न विकता परत घेऊन जाण्याची वेळ आली आहे. त्यावर शेतकऱ्यांसह स्वाभिमानी शेतकरी संघटना भडकली आहे. त्यांनी तूर घरी परत न नेता रस्त्यावर फेकून या सरकार विरोधात अभिनव आंदोलन केले. जर आमची तूर नाफेड खरेदी करत नसेल तर आता आम्ही ही घरी नेणार नाही अशी भूमिका घेत शेतकऱ्यांनी तूर रस्त्यावर फेकून दिली आहे. आणि स्वाभिमानी ने भाजपा सरकारचा निषेध करत मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणविस यांचा देखील निषेध केला आहे. तसेच नाफेड सुरु करावे अन्यथा आंदोलन तीव्र करू असा इशारा दिला आहे.नाफेडमध्ये आपल्या तुरीचे राखन करत शेतकरी आपली तूर नाफेड खरेदी करेल या आशेपोटी बसला होता पण अचानक नाफेड खरेदी बंद केल्याने शेतकरी आक्रमक झाला आहे त्यामुळे खामगांव कृषी उत्पन्न बाजार समितीमधे एकच खळबळ माजली. या आंदोलन वेळी तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण काकडे, राजू नाकाडे, अमृतराव देशमुख, श्याम अवथळे, शांताराम उनोने, किशोर देशमुख, राजू देशमुख, अभिलाष मुऱ्हे व मोठ्या संख्येने शेतकरी हजर होते.
तूर खरेदीवरून ‘स्वाभिमानी’ आक्रमक
By admin | Updated: April 25, 2017 00:08 IST