शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
3
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
4
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
5
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
6
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
7
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
8
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
9
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
10
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
12
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
13
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
14
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
15
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
16
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
17
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
18
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
19
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
20
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."

सातपुड्यातील आदिवासींच्या विकासाचा सूर्योदय थांबला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2020 13:00 IST

सातपुड्यातील आदिवासींच्या विकासाला समस्यांचे ग्रहण लागले असून विकासाचा सूर्योदय जागीच थांबला आहे.

- अझहर अली

संग्रामपूर : निसर्गसाधन संपन्नतेने नटलेला संग्रामपूर तालुका सातपुड्यातील डोंगर दऱ्यात वसलेला आहे. या तालुक्यातील १९ गावांमध्ये आदिवासी लोक राहतात. मात्र सातपुड्यातील आदिवासींच्या विकासाला समस्यांचे ग्रहण लागले असून विकासाचा सूर्योदय जागीच थांबला आहे. सोनाळा लगत सायखेड, आलेवाडी, चिचारी, शेंबा, सालवण गुंमठी, नवी चूनखेडी, हडीयामाल, निमखेडी, शिवाजीनगर, ४० टपरी, दयालनगर, शिवणी, वसाली, जूनी वसाली, पिंगळी बु., पिंगळी जहां, बारखेड इत्यादी गावे वाड्या आहेत. सायखेड येथे शासकीय आश्रम शाळा असून या शाळेची स्थापना सन १९७७ मध्ये झालेली आहे. या आदिवासी आश्रम शाळेत वगर्ग १ ते १० पर्यंत शिक्षणाची सोय आहे. सन २००९ पासून शाळेच्या इमारतीचा २ कोटी रुपये खर्चाच्या अंदाजपत्रकास आदिवासी विभागाने मान्यता दिलेली आहे.  मात्र जागा उपलब्ध नसल्याचे कारण देत इमारत बांधकाम करण्यास चालढकल करण्यात येत आहे. सायखेड येथील सर्व आदिवासींच्या दृष्ष्टीने महत्वाच्या या शाळेची इमारत इतरत्र बांधकामासाठी काहिंनी हालचाली चालविल्या आहेत. तर सायखेड येथे इमारत उभी राहणे गरजेचे आहे. असे आदिवासींचे मत आहे. शेंबा व गुंमठि नवी चूनखेडी या गावांचे पिंगळी गावाजवळ पूनर्वसन झाले आहे. येथे वीज पोहचली नाही. येथील गावठाण योजनेचे काम पूर्ण झाले असून आदिवासींच्या घरात उजेड पाडण्याचे स्वप्न कधी पूर्ण होणार असा सवाल विचारल्या जात आहे. तर सातपुड्यातील वारीहनुमान धरणा लगत २० किमी परिघात वसाली, हडीयामाल, जूनी वसाडी, चिचारी, निमखेडी, शिवाजीनगर, शिवणी, दयालनगर, शेंबा, सालवण, नवी चूनखेडी ही गावे वसलेली आहेत. वाण धरणातून शुध्द पिण्याच्या पाण्याचा पुरवठा अकोला-बुलडाणा जिल्ह्यात सर्वदूर झालेला आहे. मात्र उपरोक्त गावांना धरण उशाला अन कोरड घशाला असे म्हणण्याची वेळ आली आहे. या गावांना शुध्द पाण्याचा पुरवठा १४० गाव योजनेतून होत नाही

टॅग्स :Sangrampurसंग्रामपूरbuldhanaबुलडाणा