शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'व्होट क्रॉसिंग'वर सर्वात मोठा दावा
2
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
3
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
4
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
5
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
6
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
7
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
8
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
9
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
10
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
11
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
12
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
13
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!
14
Thane Fraud: पोलिसालाही ‘तो’ शेअर्स महागात, कोट्यवधीचा ऑनलाइन डल्ला
15
IPS Archit Chandak : देशसेवेचं स्वप्न! तब्बल ३५ लाखांचं पॅकेज नाकारलं अन् पहिल्याच प्रयत्नात IPS, पत्नीही आहे IAS
16
iPhone 17 Series:'फोल्ड करून दाखवा', आयफोन १७ सिरीज लाँच होताच सॅमसंगने अ‍ॅपलची खिल्ली उडवली
17
"घाई काय आहे, अजिबात नाही"; भारत-पाक सामन्यावर सुप्रीम कोर्टाने दिला तीन वाक्यात निकाल
18
एफडी विसरा... पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५.५५ लाख रुपयांचा फिक्स परतावा; दरमहा मिळेल व्याज
19
Navya Malik : आधी मैत्री, मग ग्राहक बनवायची; नेत्यांच्या मुलांना केलं वेडं, ड्रग्ज क्वीनने ८५० श्रीमंतांना लावलं व्यसन
20
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या

सातपुड्यातील आदिवासींच्या विकासाचा सूर्योदय थांबला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2020 13:00 IST

सातपुड्यातील आदिवासींच्या विकासाला समस्यांचे ग्रहण लागले असून विकासाचा सूर्योदय जागीच थांबला आहे.

- अझहर अली

संग्रामपूर : निसर्गसाधन संपन्नतेने नटलेला संग्रामपूर तालुका सातपुड्यातील डोंगर दऱ्यात वसलेला आहे. या तालुक्यातील १९ गावांमध्ये आदिवासी लोक राहतात. मात्र सातपुड्यातील आदिवासींच्या विकासाला समस्यांचे ग्रहण लागले असून विकासाचा सूर्योदय जागीच थांबला आहे. सोनाळा लगत सायखेड, आलेवाडी, चिचारी, शेंबा, सालवण गुंमठी, नवी चूनखेडी, हडीयामाल, निमखेडी, शिवाजीनगर, ४० टपरी, दयालनगर, शिवणी, वसाली, जूनी वसाली, पिंगळी बु., पिंगळी जहां, बारखेड इत्यादी गावे वाड्या आहेत. सायखेड येथे शासकीय आश्रम शाळा असून या शाळेची स्थापना सन १९७७ मध्ये झालेली आहे. या आदिवासी आश्रम शाळेत वगर्ग १ ते १० पर्यंत शिक्षणाची सोय आहे. सन २००९ पासून शाळेच्या इमारतीचा २ कोटी रुपये खर्चाच्या अंदाजपत्रकास आदिवासी विभागाने मान्यता दिलेली आहे.  मात्र जागा उपलब्ध नसल्याचे कारण देत इमारत बांधकाम करण्यास चालढकल करण्यात येत आहे. सायखेड येथील सर्व आदिवासींच्या दृष्ष्टीने महत्वाच्या या शाळेची इमारत इतरत्र बांधकामासाठी काहिंनी हालचाली चालविल्या आहेत. तर सायखेड येथे इमारत उभी राहणे गरजेचे आहे. असे आदिवासींचे मत आहे. शेंबा व गुंमठि नवी चूनखेडी या गावांचे पिंगळी गावाजवळ पूनर्वसन झाले आहे. येथे वीज पोहचली नाही. येथील गावठाण योजनेचे काम पूर्ण झाले असून आदिवासींच्या घरात उजेड पाडण्याचे स्वप्न कधी पूर्ण होणार असा सवाल विचारल्या जात आहे. तर सातपुड्यातील वारीहनुमान धरणा लगत २० किमी परिघात वसाली, हडीयामाल, जूनी वसाडी, चिचारी, निमखेडी, शिवाजीनगर, शिवणी, दयालनगर, शेंबा, सालवण, नवी चूनखेडी ही गावे वसलेली आहेत. वाण धरणातून शुध्द पिण्याच्या पाण्याचा पुरवठा अकोला-बुलडाणा जिल्ह्यात सर्वदूर झालेला आहे. मात्र उपरोक्त गावांना धरण उशाला अन कोरड घशाला असे म्हणण्याची वेळ आली आहे. या गावांना शुध्द पाण्याचा पुरवठा १४० गाव योजनेतून होत नाही

टॅग्स :Sangrampurसंग्रामपूरbuldhanaबुलडाणा