शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

सातपुड्यातील आदिवासींच्या विकासाचा सूर्योदय थांबला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2020 13:00 IST

सातपुड्यातील आदिवासींच्या विकासाला समस्यांचे ग्रहण लागले असून विकासाचा सूर्योदय जागीच थांबला आहे.

- अझहर अली

संग्रामपूर : निसर्गसाधन संपन्नतेने नटलेला संग्रामपूर तालुका सातपुड्यातील डोंगर दऱ्यात वसलेला आहे. या तालुक्यातील १९ गावांमध्ये आदिवासी लोक राहतात. मात्र सातपुड्यातील आदिवासींच्या विकासाला समस्यांचे ग्रहण लागले असून विकासाचा सूर्योदय जागीच थांबला आहे. सोनाळा लगत सायखेड, आलेवाडी, चिचारी, शेंबा, सालवण गुंमठी, नवी चूनखेडी, हडीयामाल, निमखेडी, शिवाजीनगर, ४० टपरी, दयालनगर, शिवणी, वसाली, जूनी वसाली, पिंगळी बु., पिंगळी जहां, बारखेड इत्यादी गावे वाड्या आहेत. सायखेड येथे शासकीय आश्रम शाळा असून या शाळेची स्थापना सन १९७७ मध्ये झालेली आहे. या आदिवासी आश्रम शाळेत वगर्ग १ ते १० पर्यंत शिक्षणाची सोय आहे. सन २००९ पासून शाळेच्या इमारतीचा २ कोटी रुपये खर्चाच्या अंदाजपत्रकास आदिवासी विभागाने मान्यता दिलेली आहे.  मात्र जागा उपलब्ध नसल्याचे कारण देत इमारत बांधकाम करण्यास चालढकल करण्यात येत आहे. सायखेड येथील सर्व आदिवासींच्या दृष्ष्टीने महत्वाच्या या शाळेची इमारत इतरत्र बांधकामासाठी काहिंनी हालचाली चालविल्या आहेत. तर सायखेड येथे इमारत उभी राहणे गरजेचे आहे. असे आदिवासींचे मत आहे. शेंबा व गुंमठि नवी चूनखेडी या गावांचे पिंगळी गावाजवळ पूनर्वसन झाले आहे. येथे वीज पोहचली नाही. येथील गावठाण योजनेचे काम पूर्ण झाले असून आदिवासींच्या घरात उजेड पाडण्याचे स्वप्न कधी पूर्ण होणार असा सवाल विचारल्या जात आहे. तर सातपुड्यातील वारीहनुमान धरणा लगत २० किमी परिघात वसाली, हडीयामाल, जूनी वसाडी, चिचारी, निमखेडी, शिवाजीनगर, शिवणी, दयालनगर, शेंबा, सालवण, नवी चूनखेडी ही गावे वसलेली आहेत. वाण धरणातून शुध्द पिण्याच्या पाण्याचा पुरवठा अकोला-बुलडाणा जिल्ह्यात सर्वदूर झालेला आहे. मात्र उपरोक्त गावांना धरण उशाला अन कोरड घशाला असे म्हणण्याची वेळ आली आहे. या गावांना शुध्द पाण्याचा पुरवठा १४० गाव योजनेतून होत नाही

टॅग्स :Sangrampurसंग्रामपूरbuldhanaबुलडाणा