शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

हजारो हेक्टरवरील उन्हाळी भुईमूग धोक्यात!

By admin | Updated: May 14, 2017 02:28 IST

पाण्याची कमतरता: भुईमूग जगविण्यासाठी शेतक-यांची धडपड

बुलडाणा: जिल्ह्यात उन्हाळी भुईमुगाच्या सरासरी ९६0 हेक्टर क्षेत्रापैकी ३ हजार ७१३ हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी भुईमुगाची पेरणी करण्यात आली आहे; मात्र भुईमुगाला पाणी अपुरे पडत असल्यामुळे हजारो हेक्टरवरील भुईमुगाने माना टाकल्या आहेत.उन्हाळी पिकांमध्ये मका, सूर्यफूल, तीळ यापेक्षाही भुईमूग हे पीक सर्वात महत्त्वाचे समजल्या जाते. जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यामध्ये भुईमुगाची पेरणी केल्या जाते. पाण्याची सुविधा असलेल्या शेतकर्‍यांकडून उन्हाळी भुईमूग या पिकाला पसंती आहे. जिल्ह्यात उन्हाळी पिकांमध्ये भुईमूग पिकाचे ९६0 हेक्टर क्षेत्रावर कृषी विभागाने नियोजन केले होते; मात्र यामध्ये ३८६.८ टक्क्याने वाढ झाली आहे. जिल्ह्यात ३ हजार ७१३ हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी भुईमूग पिकाची पेरणी झाली आहे. उन्हाळी भुईमुगाचे जळगाव तालुक्यात सरासरी क्षेत्र १३0 हेक्टर असून, २८६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. संग्रामपूर तालुक्यात २४0 हेक्टर क्षेत्र असून, ३४0 हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी भुईमुगाची पेरणी करण्यात आली आहे. चिखली तालुक्यातील नियोजित क्षेत्र २0 हेक्टर असून, १४६ हेक्टर क्षेत्रावर या पिकाची पेरणी करण्यात आली आहे. बुलडाणा तालुक्यात ३0 हेक्टर क्षेत्र नियोजित व २७ हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी भुईमूग पिकाची पेरणी झाली आहे. देऊळगाव राजा तालुक्यात ४0 हेक्टर नियोजन व १९७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मेहकर तालुक्यात १४0 हेक्टर सरासरी क्षेत्र असून, ६८१ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सिंदखेड राजा तालुक्यात नियोजन नसतानाही ८८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे. लोणार तालुक्यात १२0 हेक्टर क्षेत्र असताना १८४ हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे. खामगाव तालुक्यात १४0 हेक्टर सरासरी क्षेत्र असून, १ हजार ६३0 हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे. शेगाव तालुक्यात २0 हेक्टर नियोजन असून, कुठेच पेरणी करण्यात आली नाही. मलकापूर तालुक्यात ४0 हेक्टर क्षेत्रापैकी ३४ हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे. मोताळा तालुक्यात ४0 हेक्टर क्षेत्रापैकी ६५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे. नांदुरा तालुक्यात नियोजन नसतानाही ३५ हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी भुईमूग पिकाची पेरणी करण्यात आली आहे. यावर्षी भुईमूग पिकाचे क्षेत्र वाढलेले असताना या पिकाला मुबलक प्रमाणात मिळत नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी भुईमूग पिकाचे नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे. शेतकरी जलस्रोतांना पाणी येईल, त्या वेळेला भुईमुगाला पाणी देऊन भुईमूग जगविण्याची धडपड करत आहेत.