शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

सुलतानपूर : जलयुक्त शिवारची कामे लोकप्रतिनिधींनी पाडली बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 01:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसुलतानपूर : जलयुक्त शिवार योजनेंतर्गत सुलतानपूर परिसरात सुरू असलेल्या दोन बंधार्‍यांची कामे लोकप्रतिनिधींसह काही नागरिकांनी बंद पाडली आहेत. या कामांमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप करीत ही कामे सोमवारी बंद पाडली.जिल्हा परिषद सिंचन विभागामार्फत कोणतेही स्थळ सर्वेक्षण न करता अंदाजपत्रक बनवून चार साठवण बंधार्‍यांची कामे सुलतानपूर येथे सुरू होती; मात्र ...

ठळक मुद्देकामामध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप 

लोकमत न्यूज नेटवर्कसुलतानपूर : जलयुक्त शिवार योजनेंतर्गत सुलतानपूर परिसरात सुरू असलेल्या दोन बंधार्‍यांची कामे लोकप्रतिनिधींसह काही नागरिकांनी बंद पाडली आहेत. या कामांमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप करीत ही कामे सोमवारी बंद पाडली.जिल्हा परिषद सिंचन विभागामार्फत कोणतेही स्थळ सर्वेक्षण न करता अंदाजपत्रक बनवून चार साठवण बंधार्‍यांची कामे सुलतानपूर येथे सुरू होती; मात्र ही कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याची ओरड होती. कामांमध्ये कमी सिमेंटचा वापर करून कमी गेजच्या लोखंडाचा वापर करण्यात येत असल्याचा आक्षेप आहे. खोदकामामध्ये मुरुमाचा वापर न करता मातीवरच बेड काँक्रीट अंथरल्या गेले आहे. हा प्रकार स्थानिक लोकप्रतिनिधींच्या लक्षात येताच त्यांनी कामाचे अंदाजपत्रक मागून ही कामे गुणवत्तापूर्ण करण्याची मागणी केली होती; मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्या जात होते. परिणामी, जि.प.सदस्य पती दिलीप वाघ, लोणार पंचायत समितीचे गटनेते तथा पं.स.सदस्य डॉ. हेमराज लाहोटी, माजी सरपंच विजय खोलगडे, सामाजिक कार्यकर्ते संतोष रिंढे, रामेश्‍वर मंत्री यांनी प्रत्यक्ष स्थळी जाऊन हे काम बंद पाडले. जोपर्र्यंत दर्जेदार कामाची हमी मिळणार नाही, तो पर्यंत हे काम होणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. १५ जानेवारीला हे काम बंद पाडण्यात आले. यासंदर्भात जिल्हा परिषदेचे सिंचन विभागातील अभियंता काळवाघे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. दरम्यान, शिवणी पिसा परिसरातही जलयुक्तची कामे सुरू असून, तेथेही कामाची योग्य पद्धतीने गुणवत्ता राखल्या जात नसल्याची ओरड आहे. यासंदर्भात आता प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे सध्या लक्ष लागून आहे.

अभियंता ‘नॉट रिचेबल’यासंदर्भात जिल्हा परिषदेचे अभियंता काळवाघे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. त्यांचा भ्रमनध्वनी ‘नॉट रिचेबल’ होता. त्यामुळे त्यांची याबाबत प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

शिवार फेरींतर्गत सुलतानपूरची निवडशासनाच्या शिवार फेरी दरम्यान सुलतानपूर गावाची जलयुक्त शिवार योजनेंतर्गत निवड झाली होती. वेगवेगळ्य़ा विभागाकडे येथील कामे सोपविण्यात आली आहेत; परंतु प्रारंभी कोणत्याच विभागाने कृती, अंदाज पत्रके बनवलीच नसल्याची माहिती समोर येत आहे. आधीच येथील टंचाईचा प्रश्न मोठा आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाJalyukt Shivarजलयुक्त शिवार