शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

सुलतानपूर : जलयुक्त शिवारची कामे लोकप्रतिनिधींनी पाडली बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 01:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसुलतानपूर : जलयुक्त शिवार योजनेंतर्गत सुलतानपूर परिसरात सुरू असलेल्या दोन बंधार्‍यांची कामे लोकप्रतिनिधींसह काही नागरिकांनी बंद पाडली आहेत. या कामांमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप करीत ही कामे सोमवारी बंद पाडली.जिल्हा परिषद सिंचन विभागामार्फत कोणतेही स्थळ सर्वेक्षण न करता अंदाजपत्रक बनवून चार साठवण बंधार्‍यांची कामे सुलतानपूर येथे सुरू होती; मात्र ...

ठळक मुद्देकामामध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप 

लोकमत न्यूज नेटवर्कसुलतानपूर : जलयुक्त शिवार योजनेंतर्गत सुलतानपूर परिसरात सुरू असलेल्या दोन बंधार्‍यांची कामे लोकप्रतिनिधींसह काही नागरिकांनी बंद पाडली आहेत. या कामांमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप करीत ही कामे सोमवारी बंद पाडली.जिल्हा परिषद सिंचन विभागामार्फत कोणतेही स्थळ सर्वेक्षण न करता अंदाजपत्रक बनवून चार साठवण बंधार्‍यांची कामे सुलतानपूर येथे सुरू होती; मात्र ही कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याची ओरड होती. कामांमध्ये कमी सिमेंटचा वापर करून कमी गेजच्या लोखंडाचा वापर करण्यात येत असल्याचा आक्षेप आहे. खोदकामामध्ये मुरुमाचा वापर न करता मातीवरच बेड काँक्रीट अंथरल्या गेले आहे. हा प्रकार स्थानिक लोकप्रतिनिधींच्या लक्षात येताच त्यांनी कामाचे अंदाजपत्रक मागून ही कामे गुणवत्तापूर्ण करण्याची मागणी केली होती; मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्या जात होते. परिणामी, जि.प.सदस्य पती दिलीप वाघ, लोणार पंचायत समितीचे गटनेते तथा पं.स.सदस्य डॉ. हेमराज लाहोटी, माजी सरपंच विजय खोलगडे, सामाजिक कार्यकर्ते संतोष रिंढे, रामेश्‍वर मंत्री यांनी प्रत्यक्ष स्थळी जाऊन हे काम बंद पाडले. जोपर्र्यंत दर्जेदार कामाची हमी मिळणार नाही, तो पर्यंत हे काम होणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. १५ जानेवारीला हे काम बंद पाडण्यात आले. यासंदर्भात जिल्हा परिषदेचे सिंचन विभागातील अभियंता काळवाघे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. दरम्यान, शिवणी पिसा परिसरातही जलयुक्तची कामे सुरू असून, तेथेही कामाची योग्य पद्धतीने गुणवत्ता राखल्या जात नसल्याची ओरड आहे. यासंदर्भात आता प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे सध्या लक्ष लागून आहे.

अभियंता ‘नॉट रिचेबल’यासंदर्भात जिल्हा परिषदेचे अभियंता काळवाघे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. त्यांचा भ्रमनध्वनी ‘नॉट रिचेबल’ होता. त्यामुळे त्यांची याबाबत प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

शिवार फेरींतर्गत सुलतानपूरची निवडशासनाच्या शिवार फेरी दरम्यान सुलतानपूर गावाची जलयुक्त शिवार योजनेंतर्गत निवड झाली होती. वेगवेगळ्य़ा विभागाकडे येथील कामे सोपविण्यात आली आहेत; परंतु प्रारंभी कोणत्याच विभागाने कृती, अंदाज पत्रके बनवलीच नसल्याची माहिती समोर येत आहे. आधीच येथील टंचाईचा प्रश्न मोठा आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाJalyukt Shivarजलयुक्त शिवार