शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
2
निवडणूक आयोगाने देशात SIR ची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
3
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
4
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
5
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
6
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
7
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
8
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी
9
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
10
IND vs AUS: भारत की ऑस्ट्रेलिया, टी२० मध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड!
11
VIDEO: 'तारेवरची कसरत'! मांजर विजेच्या तारेवरून चालत होती, अचानक लागली आग अन् पुढे...
12
"या हॉटेलवर डॉक्टर तरुणीला का बोलावलं होतं?"; सुषमा अंधारे रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे नाव घेत काय म्हणाल्या?
13
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
14
Orkla India IPO च्या जीएमपीमध्ये मोठी तेजी; 'या' तारखेपासून लावू शकणार बोली, केव्हा होणार लिस्टिंग?
15
वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईकसाठी बांगलादेशात 'पायघड्या'; भारतात आहे MOST WANTED
16
ढासू परतावा...! ₹100 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, 5 वर्षांती दिला 6455% परतावा; आता रेल्वेकडून मिळाली मोठी ऑर्डर
17
Mumbai Pune Mumbai 4: स्वप्नील-मुक्ताची जोडी पुन्हा एकत्र, 'मुंबई पुणे मुंबई ४'ची घोषणा, बघा व्हिडीओ
18
श्रेयस अय्यरला झालेली दुखापत किती गंभीर, आता कशी आहे प्रकृती? बीसीसीआयने दिली महत्त्वाची माहिती
19
युक्रेनचा रशियावर मोठा ड्रोन हल्ला! १९३ ड्रोनमधून गोळीबार, मॉस्कोतील दोन विमानतळ बंद
20
Mid-Size SUV: २० लाखांपेक्षा कमी बजेटमध्ये घरी आणा 'या' ५ जबरदस्त मिड- साइज एसयूव्ही कार!

बुलडाणा जिल्हय़ातील सूक्ष्म सिंचनाच्या अनुदानाचा प्रश्न सुटता सुटेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 02:05 IST

विदर्भातील प्रश्न मार्गी लागावे म्हणून नागपूर येथे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन घेतले जात असले, तरी त्यात खरेच किती प्रश्न सुटतात, हा अभ्यासाचा विषय झाला आहे. त्यातच प्रश्न बुलडाणा जिल्हय़ाचा असेल आणि त्यासाठी चार-चार आमदारांकडून  लक्षवेधी, तारांकित प्रश्न, अर्धा तास चर्चेचे प्रस्तावाच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित करूनही प्रश्न सुटत नसल्याचे जिल्हय़ातील तब्बल २८ हजार १७६ शेतकर्‍यांच्या सूक्ष्म सिंचनाच्या थकीत व वाढीव अनुदानाच्या प्रश्नाच्या निमित्ताने अधोरेखित झाले आहे.

ठळक मुद्देजिल्हय़ातील २८,१७६ शेतकर्‍यांचे अधिवेशनाकडे लक्ष

सुधीर चेके पाटील। लोकमत न्यूज नेटवर्कचिखली: विदर्भातील प्रश्न मार्गी लागावे म्हणून नागपूर येथे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन घेतले जात असले, तरी त्यात खरेच किती प्रश्न सुटतात, हा अभ्यासाचा विषय झाला आहे. त्यातच प्रश्न बुलडाणा जिल्हय़ाचा असेल आणि त्यासाठी चार-चार आमदारांकडून  लक्षवेधी, तारांकित प्रश्न, अर्धा तास चर्चेचे प्रस्तावाच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित करूनही प्रश्न सुटत नसल्याचे जिल्हय़ातील तब्बल २८ हजार १७६ शेतकर्‍यांच्या सूक्ष्म सिंचनाच्या थकीत व वाढीव अनुदानाच्या प्रश्नाच्या निमित्ताने अधोरेखित झाले आहे.विदर्भ सघन सिंचन विकास कार्यक्रमांतर्गत शेतकर्‍यांना ठिबक व तुषार संच खरेदीसाठी देण्यात येणारे अनुदान तब्बल तीन वर्षांपासून कृषी विभागाच्या लालफीतशाहीत अडकले आहे. या योजनेचे जिल्हय़ात तब्बल २८ हजार १७६ शेतकर्‍यांचे ८७ कोटी ८१ लाख रुपये शासनाकडे थकलेले आहेत. विदर्भ सघन सिंचन कार्यक्रमांतर्गत सन २0१३-१४ या वर्षात बुलडाणा जिल्हय़ातील ११ हजार १८८ शेतकर्‍यांचे ३२ कोटी ७0 लाख तर सन २0१४-१५ या वर्षात १६ हजार ९९२ शेतकर्‍यांचे ५५ कोटी ११ लाख रूपये असे एकूण २८ हजार १७६ शेतकर्‍यांचे तब्बल ८७ कोटी ८१ लाख रुपयांचे अनुदान शासनाकडे थकले आहे. याअंतर्गत एकट्या चिखली तालुक्यातील २३७.४७ हेक्टर जमीन ठिकबमुळे तर २0५0 हेक्टर शेतजमीन तुषार सिंचनामुळे ओलिताखाली आली आहे; परंतु २0१३-१४ मधील या दोन्ही योजनेचे १ हजार १२१ शेतकरी लाभार्थींचे १ कोटी ६२ लाख ४७ हजार रुपये तर सन २0१४-१५ मध्ये २ हजार २५0 शेतकरी लाभार्थींचे ३ कोटी ८0 लाख २२ हजार रुपयांचे अनुदान अद्याप थकीत आहे.  शेतीला कायमस्वरूपी पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी शासनाने राबविलेल्या या योजनेचा जिल्हय़ातील तब्बल २८ हजार १७६ शेतकर्‍यांनी लाभ घेतला. याबाबतचे प्रस्ताव संबंधित कृषी विभागाकडे सादर केले. प्रारंभी अनुदानाचे वाटपही झाले; मात्र त्यापश्‍चात तब्बल तीन वर्षांपासून या योजनेच्या लाभार्थी शेतकर्‍यांना नागविल्या जात आहे. अस्मानी व सुलतानी संकटांचा सातत्याने सामना करणार्‍या शेतकर्‍यांनी शेती फायद्याची ठरावी, यासाठी अनंत अडचणींचा सामना करून या योजनेंतर्गत सूक्ष्म सिंचनाचे साहित्य खरेदी केले आहेत. लाभार्थींपैकी प्रत्येक शेतकर्‍याने यासाठी कर्ज काढले आहे. काहींनी दागदागिने, जमिनी गहाण ठेवल्या आहेत. अशा स्थितीत या योजनेचे अनुदान अद्यापही प्राप्त न झाल्याने शेतकर्‍यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे, तर या योजनेचे प्रस्ताव तब्बल तीन वष्रे उलटूनही कृषी विभागाच्या कार्यालयात धूळ खात पडलेले असताना अधिवेशनातूनही या प्रश्नाला दरवर्षी बगल दिली जात आहे. त्यामुळे सूक्ष्म सिंचनाचे लाभार्थी शेतकरी प्रचंड निराशेच्या गर्तेत आहेत.

जिल्हय़ातील आमदारांचा रेटा आवश्यकसूक्ष्म सिंचनाचे थकीत वा वाढीव अनुदान मिळावे, यासाठी जिल्हय़ातील आमदारांकडून गेल्या तीन वर्षांतील अधिवेशन् ाकाळात सातत्याने लक्षवेधी, तारांकित प्रश्न, चर्चेचे प्रस्ताव मांडून मागणी रेटण्यात येते. मात्र, प्रत्येक अधिवेशनात या मागणीला बगल दिल्या जात असल्याने लाभार्थी शेतकर्‍यांच्या पदरी घोर निराशा येत असून, हा प्रश्न जिल्हय़ातील तब्बल २८ हजार १७६ शेतकर्‍यांचा असल्याने किमान या अधिवेशनातून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी जिल्हय़ातील आमदारांनी जोरकस प्रयत्न करण्याची गरज आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाWaterपाणी