धामणगांवबढे (जि. बुलडाणा): येथील विद्यालयाने विद्यार्थ्यांना वाटप करण्यासाठी जादा पुस्तकांची मागणी नोंदवूनसुद्धा शिक्षण विभागाने त्यांची दखल न घेतल्यामुळे अनेक विद्यार्थी पुस्तकांपासून वंचित आहेत. मोताळा तालुक्यातील धा.बढे येथील एम.ई.एस. विद्यालयात पाचव्या वर्गात एकूण ९२ विद्यार्थ्यांचा प्रवेश घेतला. त्यामध्ये धा. बढे, रिधोरा, देऊळगाव गुजरी, सिंदखेड लपाली, खांडवा, ब्राम्हंदा येथील विद्यार्थ्यांचा समावेश आहेत. विद्यार्थ्यांसाठी मोताळा पंचाय समितीच्या शिक्षण विभागाकडून एकूण १३२ संच पाठविण्यात आले. त्यामुळे आजही ६0 विद्यार्थी पुस्तकांपासून वंचित आहेत. त्याचप्रमाणे सातवीसाठी २0 संच, तर १७0 इंग्रजी विषयाच्या स्वाध्यामाला, आठवीसाठी १८0 स्वाध्यायमाला यांची मागणी शाळा प्रशासनाने वारंवार नोंदवूनसुद्धा शिक्षण विभागाने दखल घेतलेली नाही. यासंबंधी शिक्षणाधिकार्यांकडे मागणी करा, असा सल्ला दिला जात आहे. केंद्रप्रमुखांनी जादा पुस्तकांची मागणी नोंदवूनसुद्धा शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभारामुळे विद्यार्थी पुस्तकापासून वंचित आहेत. याची दखल शिक्षण विभागाने घ्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांचे पालक करीत आहेत.
विद्यार्थी पुस्तकांपासून वंचित
By admin | Updated: July 6, 2015 23:59 IST