शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
2
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
3
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
4
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
5
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
6
Vijay Hazare Trophy: थोरल्या भावाने दिली धाकट्याला पदार्पणाची कॅप; दोघांच्यातील शतकी भागीदारीनंतर जे घडलं ते कमालच!
7
कानातले, मोजे आणि अंडरगारमेंट गायब...; उदयपूर गँगरेपमधील IT मॅनेजर पीडितेची आपबीती
8
मनसेचं ‘नऊ’निर्माण होईल? १६-०१-२०२६ ची ‘बेरीज’ राज ठाकरेंसाठी ठरेल का ‘मंगल’? काय सांगते अंक-ज्योतिषशास्त्राची युती?
9
मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
10
पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?
11
"धुरंधर हा एक भयानक कुत्रा, तो प्रत्येक 'बिग बजेट'...", राम गोपाल वर्मा यांची पोस्ट चर्चेत; नेमकं काय म्हणाले?
12
"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
13
भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
14
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
15
भारतातच फिरायला जायचा विचार करताय? 'या' ४ राज्यांत विनापरवाना गेलात तर होईल ५ वर्षांची जेल!
16
₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
17
Malegaon Municipal Corporation Election : दोन्ही ठाकरे बंधूंची झाली युती; मालेगाव पालिकेत प्रभाव किती? मनोमिलनानंतर शांतता
18
"ते माझं भवितव्य बरबाद करतील...", 'इंडियन आयडल' जिंकल्यानंतर अभिजीत सावंतने केलेला मोठा गौप्यस्फोट
19
"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
20
अरे हे काय! मुंबईच्या संघात दोन-दोन रोहित; व्हायरल फोटो पाहून चाहते थक्क, हिटमॅनचा 'ड्युप्लिकेट' कोण?
Daily Top 2Weekly Top 5

देऊळघाट येथे वादळी पावसाचे तांडव!

By admin | Updated: June 7, 2017 00:34 IST

अनेक घरांची पत्रे उडाली : २० घरे उद्ध्वस्त, ७ जण जखमी

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: वादळी वाऱ्यासह सोमवारी रात्री आलेल्या पावसाने तालुक्यातील देऊळघाट येथे थैमान घातले असून, यामध्ये २०० पेक्षा अधिक घरांची पत्रे उडाली तर २० घर उद्ध्वस्त झाले. पत्रे लागल्याने ७ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. ५ जूनच्या रात्री ९.१५ च्या सुमारास देऊळघाट परिसरात जोरदार विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. त्यातच वादळी वारा सुटल्याने भरपावसात अनेक घरांची पत्रे उडून गेली. संपूर्ण गावात एकच भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या वादळी वाऱ्याने अनेक झाडे कोलमडून पडली व विद्युत खांब पडून तार तुटले. अर्ध्या तासानंतर पाऊस वारा थांबल्यानंतर वादळामध्ये आपआपली उडालेली पत्रे गोळा करण्यासाठी लोकांनी धावपळ केली. उमाळा रोडवरील नवीन वस्तीत राहणारे नसीरोद्दीन काझी यांच्या घरावरील वादळामुळे पत्राचे छत खाली कोसळल्याने त्यांचा पूर्ण परिवार या छताखाली दबला होता. याची माहिती मिळताच सरपंच आरिफ खान, रसुल खान व इतर ग्रामस्थ त्याठिकाणी पोहोचले व सर्व जखमींना तत्काळ सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. या वादळी वाऱ्यात एकूण ७ जण जखमी झाले असून, त्यात नसिरोद्दीन काझी, मुजाहिद नसीरोद्दीन काझी, जावेद नसीरोद्दीन काझी, फातीमा नसीरोद्दीन काझी, शकीला बी नसीरोद्दीन काझी, फरजाना बी शे.जाबीर व शे.रिजवान शे.अब्बास यांचा समावेश होता. ६ जून रोजी सकाळी बुलडाणा तहसीलदार सुरेश बगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी बी. बी. महामुनी, बुलडाणा पंचायत समिती गट विकास अधिकारी चंदनसिंग राजपुत, बुलडाणा ग्रामीणचे ठाणेदार सुनिल जाधव यांनी गावात भेट दिली व चक्रीवादळाने उद्ध्वस्त झालेल्या घर मालकांना जाऊन भेटले व त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांच्यासोबत सरपंच आरीफ खान, ग्रा.पं.सदस्य गजनफर खान, सखाराम पाटील उपस्थित होते. नुकसानाचा पंचनामा सुरुमंगळवारी सकाळी ७ वाजतापासून महसूल विभागाचे मंडळ अधिकारी गणेश राऊत, तलाठी विजय सावळे, विनोद कोळसे, आर.बी.काकडे व ग्रामसेवक संजय बाजड यांनी गावात फिरुन नुकसानाचा पंचनामा केला. २३५ घरांचे टिन चक्रीवादळाने उडाल्याचे समोर आले असून, १५ ते २० घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. चक्रीवादळामुळे देऊळघाट परिसरात असलेले शेतातील अनेक गोठेसुद्धा उद्ध्वस्त झाले आहेत व त्यात ठेवलेला बी-बियाणे, शेती साहित्य बिनकामी झाले आहे. चक्रीवादळामुळे वीज वितरण कंपनीचेसुद्धा फार मोठे नुकसान झाले आहे. देऊळघाट परिसरात अनेक ठिकाणी वीज खांब व तार तुटून पडलेल्या अवस्थेत आहे.