चिखली, दि. ११-राज्यात सध्या मालाचे भाव पडले असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. सरकारने त्यांना सरसकट कर्ज माफी द्यावी, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने तालुका प्रमुख कपिल खेडेकर यांच्या नेतृत्वात ११ फेब्रुवारी रोजी नागपूर-जालना महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.राज्यातील शेतकर्यांना सलग चार वष्रे अत्यल्प उत्पन्न व दुष्काळाचा फटका बसला आहे. त्यापश्चात यंदा दिलासादायक उत्पन्न हाती आले असताना बाजारात शेतमालाचे भाव पडले असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे सुमारे अर्धा तास या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, पोलिसांनी आंदोलनकर्त्यांंना स्थानबद्ध केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. या आंदोलनात तालुका प्रमुख कपिल खेडेकर, प्रशांत ढोरे पाटील, सिद्धुसिंग राजपूत, जि.प. सदस्य शरद हाडे, शहरप्रमुख नीलेश अंजनकर, श्रीराम झोरे, नंदू कर्हाडे, न.प. सभापती दत्ता सुसर, राजू सपकाळ, संजय सुरडकर, फकिरा लोखंडे, गजानन भुसारी, गोपीनाथ लहाने, नाशीर मिया, ईब्राहिम शेख, प्रल्हाद पाटील, शिद्धेश्वर ठेंग, सुनील ठेंग, बंडू नेमाने, शिवाजी देशमुख, जितेंद्र पुरोहित, संजय कदम, कृष्णा जाधव, अशोक मोहिते, प्रल्हाद पाटील, बाळू ठेंग, दीपक बाहेकर, दीपक कस्तुरे, डॉ. करवंदे, गजानन इंगळे, शे आयुब, रवी भगत, सर्जेराव गवई, बंटी लोखंडे, भगवान वाळेकर, समाधान जाधव, देवराव कोलते, गणेश धुंदळे, मधुकर चाकोतकर, सुरेश डोंगरदिवे, प्रकाश सुरोशे, मंगेश इंगळे, ढोले, प्रमोद राजपूत, शंकर भुसारी, ध्यानू खेडेकर, अँड. अनिल कर्हाडे, श्रीनाथ पवार, अंकुश शिंदे, शैलेश डोणगावकर आदी सहभागी झाले होते.
कर्जमाफीसाठी शिवसेनेचा रास्ता रोको!
By admin | Updated: March 12, 2017 02:10 IST