अमडापूर(जि. बुलडाणा), दि. २0- उंद्री व परिसरातील प्रलंबित मागण्या प्रशासनदरबारी मांडण्यासाठी भूमिमुक्ती मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्यावतीने येथील मुख्य मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी मागण्यांसंदर्भात स्थानिक प्रशासनाकडे निवेदन देण्यात आले.जलशुद्धीकरण प्रकल्प सुरु करुन उंद्री व परिसरातील १७ गावांमध्ये ग्रामपंचायतीकडे शुद्ध व नियमित पाणीपुरवठा करण्यात यावा, ग्रामीण रुग्णालयाची निर्मिती करावी, डॉक्टरांची निवासाची व्यवस्था करावी, गावासाठी स्वतंत्र्य १0 कोटीची पाणीपुरवठा योजना लागू करावी, बंद पडलेली कृषी उत्पन्न बाजार समिती सुरु करावी, गावाचे सौंदर्यीकरण, टाकरखेड ते अमडापूर हा पांदण रस्ता व टाकरखेड हेलगा गावाला जोडणार्या नाल्यावरील पुलाचे बांधकाम सुरु करण्यात यावे, घरकुल लाभार्थ्यांंना घरकुल बांधून देण्यात यावे, किंवा लाभार्थ्यांना घरकुलाचे धनादेश देण्यात यावे, एसटी बस थांबा सुरु करावा, शेतकर्यासाठी विविध योजना राबवून कर्जमुक्ती करण्यात यावी, आदी मागण्यांचे निवेदन ठाणेदार नीलेश गावंडे यांना देण्यात आले. या आंदोलनात संघटनेचे प्रदीप आंभोरे, आतीश खराटे, रमेश गाडेकर, भीमराव खरात, लक्ष्मणराव ठोसरे, शेषराव चव्हान, मधुकर मिसाळ, प्रकाश वानखेड, अनिसखान पठाण, नीलेश बाभूळकर, शे.लुखमान, गजानन धुरंधर, डॉ.अशोक वानखडे यांच्यासह भूमिमुक्ती मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येत उपस्थित होते.
भूमिमुक्ती मोर्चातर्फे प्रलंबित मागण्यांसाठी ‘रास्ता रोको’
By admin | Updated: March 21, 2017 01:55 IST