शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

५0 मीटरच्या आत खासगी वाहनांना थांबा

By admin | Updated: September 16, 2014 18:37 IST

मेहकर आगाराचे नुकसान : उच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली

मेहकर : येथील बसस्थानक परिसरात ५0 मीटरच्या आत खासगी वाहने थांबत असल्याने उच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली होत आहे. येथे सुरु असलेल्या अवैध वाहतुकीमुळे स्थानिक आगाराचे आर्थिक नुकसान होत आहे. आर्थिक उत्पन्नाच्या बाबतीत मेहकर आगाराची चांगली प्रगती असताना अवैध वाहतुकीमुळे आगाराच्या उत्पन्नात दररोज फटका बसत आहे. अवैध वाहतुकीवर कारवाई व्हावी, यासाठी आगार व्यवस्थापने ठाणेदाराला लेखी पत्रसुद्धा दिले आहे; मात्र पोलिस विभागाकडून अवैध वाहतुकीवर कुठलीच कारवाई करण्यात येत नाही. तालुक्यात पोलिसांच्या आशीर्वादाने अवैध वाहतूक जोमात सुरु आहे. मेहकरवरुन रिसोड, मालेगाव, जानेफळ, चिखली लोणारसह ग्रामीण भागामध्ये काळीपिवळी, मिनीडोर, अँपे, ऑटो आदी खासगी वाहनाने मोठय़ा प्रमाणावर धावतात. स्थानिक पोलिस कर्मचार्‍यांना तसेच वाहतूक शाखांना यासंदर्भात जाणीव असूनही त्याकडे डोळेझाक केली जात आहे. मेहकर आगाराला अवैध वाहतुकीचे ग्रहणच लागले आहे. आगारापासून अवैध वाहने ही २00 मीटरच्या अंतरावर असली पाहिजेत, असा आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिलेला आहे; परंतु मेहकर आगारापासून सदर खासगी वाहने ५0 मीटरच्या आतच थांबतात. तर लोणार वेस, जानेफळ फाटा व पोलिस स्टेशनसमोर अवैध वाहने उभी राहत असून, प्रवासी क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांना वाहनात कोंबले जात आहे. अवैध वाहने ही, प्रवासी निवार्‍यासमोरच खुलेआम उभी केली जात असल्याने येथे वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. त्यामुळे एस.टी.बसलासुद्धा उभे राहण्यास जागा नसते. याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष असते. आगारापासून २00 मीटरच्या आत थांबणारी व प्रवासी निवार्‍यासमोर थांबणारी अवैध वाहने हटविण्यासंदर्भात आगार व्यवस्थापक चंद्रकांत पाथरकर यांनी जून महिन्यात पोलिस स्टेशनला लेखी पत्र दिले होते; परंतु चार महिन्यांचा कालावधी उलटूनही त्यावर कारवाई झाली नाही. पोलिसांच्या या दुर्लक्षित धोरणामुळे मात्र आगाराला मोठा तोटा सोसावा लागतो. याकडे संबंधितांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.