शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

तब्येत सांभाळा; पाऊस थांबला, उन्हाचा चटकादेखील वाढला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:36 IST

बुलडाणा : गत चार दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे तापमानात वाढ झाली असून, उन्हाचा चटका जाणवू लागला आहे. ...

बुलडाणा : गत चार दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे तापमानात वाढ झाली असून, उन्हाचा चटका जाणवू लागला आहे. यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता वाढली आहे. जिल्ह्यात जवळपास २० दिवसांच्या खंडानंतर पावसाचे आगमन झाले. यामुळे कोमेजलेल्या पिकांना जीवनदान मिळाले.

सलग पाच दिवस पाऊस बरसल्यानंतर सहाव्या दिवशी पावसाने उघडीप दिली. मागील तीन दिवसांपासून पावसाची दडी आहे. त्यामुळे तापमानात वाढ झाली आहे. रिपरिप पावसाच्या वातावरणानंतर एकाएक कडाक्याचे ऊन तापायला लागल्याने उकाडा जाणवू लागला आहे. नागरिकही हैराण झाले आहेत. त्यातच पिकांवर किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. वारंवार बदलत्या वातावरणाने आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.

ऑगस्टमध्ये सर्वांत कमी पाऊस

जिल्ह्यात जून महिन्यात सुरुवातीलाच चांगला दमदार पाऊस पडला होता. तर जुलै महिन्यात दुसऱ्या आठवड्यापासून पावसाला सुरुवात झाली होती.

या महिन्यात २१ जुलै रोजी अतिवृष्टी झाल्याने सर्वाधिक पावसाची नोंद झाली; मात्र ऑगस्ट महिन्यात सर्वांत कमी पावसाची नोंद झाली. तीन दिवस कोरडे गेले.

वातावरण बदलले; काळजी घ्या...

गत तीन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने वातावरणात बदल झाला आहे. त्यामुळे सर्दी, ताप, खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ होत असून, काळजी घेण्याची गरज आहे. त्यातच डेंग्यूच्या रुग्णांमध्येही वाढ होत असल्याने आणखी सतर्कता बाळगावी. अनेक साथीचे आजार बळावत असून, गरज पडल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा.

कोठे किती पाणीसाठा?

प्रकल्प पाणीसाठा

(दलघमी) (टक्क्यांत)

खडकपूर्णा ५१८़ १९ ३६.२८

नळगंगा २८७.८५ २७.७७

पेनटाकळी ५५४.२० ३६.३०