शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
5
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
6
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
7
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
8
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
9
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
10
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
11
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
12
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
13
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
14
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
15
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
16
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
17
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
18
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
19
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
20
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

शेतकऱ्यांचे प्रश्न साेडवूनच महामार्गाचे काम सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2021 04:08 IST

मेहकर : समृध्दी महामार्गालगतच्या शेतकऱ्यांचे प्रश्न तात्काळ निकाली निघेपर्यंत महामार्गाचे काम करूच देणार नाही, असा दम आ. ...

मेहकर : समृध्दी महामार्गालगतच्या शेतकऱ्यांचे प्रश्न तात्काळ निकाली निघेपर्यंत महामार्गाचे काम करूच देणार नाही, असा दम आ. डॉ. संजय रायमुलकर यांनी महामार्गाच्या अधिकाऱ्यांना दिला़. रविवारी धानोरा, राजनी, शिवणीपिसा परिसरातील नुकसानग्रस्त शेताची त्यांनी पाहणी केली.

समृध्दी महामार्गाच्या पाण्याचे नियोजन संबंधित ठेकेदाराने वेळेत करून पावसाळ्यापूर्वी या पाण्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घ्यायला पाहिजे होती. मात्र तसे न केल्याने शेतकऱ्यांना शेतात ये-जा करणे कठीण झाले आहे. शेतकऱ्यांनी आम्हास महामार्गाच्या कंपाऊंडला लागून शेतात येण्या-जाण्याकरिता सोडलेल्या रस्त्यामध्ये गिट्टी व मुरूम टाकून द्या, अशी मागणी महामार्गाच्या अधिकाऱ्यांकडे केली हाेती़; मात्र अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. यावेळी वादही झाला हाेता़. याप्रकरणी धानोरा-राजनी येथील सरपंच दत्तात्र्य पडघान यांच्यासह सहा शेतकऱ्यांवर विविध कलमांन्वये शनिवारी गुन्हे दाखल करण्यात आल्याने आ. डॉ. संजय रायमुलकर यांनी रविवारी या भागातील समृध्दी मार्गावर पोहोचून संपूर्ण परिसराची पाहणी केली़. यावेळी जि. प. सदस्य दिलीपराव वाघ, पं. स. मा. उपसभापती डॉ . हेमराज लाहोटी, कृउबासं शिव पाटील-तेजनकर, माजी सरपंच सलीमखा पठाण, हनुमंतराव चव्हाण यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते. दरम्यान, लोणार तहसीलचे नायब तहसीलदार हेमंत पाटील, बिट जमादार प्रभाकर सानप, तलाठी संतोष पनाड, पोकॉ.निवृत्ती सानप हजर होते .

शेतरस्ते झाले बंद

समृध्दी महामार्गाचे काम करत असताना लगतच्या शेतजमिनीचा विचार करण्यात आला नसल्याने शेतातील रस्ते बंद झाले. काही शेतकऱ्यांच्या विहिरी गाळल्या गेल्या व शेतात पाणी साचल्यामुळे शेकडो एकर शेती पाण्यात गेल्याने या शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली़. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या समस्या आमदार रायमुलकर यांच्याकडे मांडल्या़. समृध्दी महामार्गामुळे बाधित झालेल्या शेतजमिनीची नुकसानभरपाई व इतर प्रश्न निकाली निघेपर्यंत येथील महामार्गाचे काम सुरू करू देऊ नका, नंतर मी बघतो, असा विश्वास आ. रायमुलकर यांनी या शेतकऱ्यांना दिला़.

जमिनीचे पडले तुकडे

समृध्दी महामार्गासाठी शेतकऱ्यांकडून घेण्यात आलेल्या जमिनीतील छोटे-छोटे तुकडे शिल्लक राहिल्यामुळे असे तिथे शेतकरी पीक घेऊ शकत नाहीत. याबाबत शासनाने विचार करून शेतकऱ्यांना लाभ दयावा, तसेच महामार्गाच्या कामासाठी लागणारे बांधकाम साहित्य आणण्यासाठी आजूबाजूच्या गावातील रस्त्याचा वाहतुकीसाठी उपयोग करण्यात आल्याने गावरस्ते खराब झाले आहेत. त्यामुळे हे रस्ते पूर्ववत करून देण्यात यावेत, अशी मागणी दिलीपराव वाघ यांनी आ. डॉ . संजय रायमूलकर यांच्या माध्यमातून शासनाकडे केली.

काेट

न्याय्य मागण्या केल्यामुळे आपद्ग्रस्त शेतकऱ्यांवर दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत. अन्यथा समृध्दी महामार्गावर आंदोलन करू - अर्चना दत्तात्रय पडघान, सरपंच धानोरा/राजनी