शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचे प्रश्न साेडवूनच महामार्गाचे काम सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2021 04:08 IST

मेहकर : समृध्दी महामार्गालगतच्या शेतकऱ्यांचे प्रश्न तात्काळ निकाली निघेपर्यंत महामार्गाचे काम करूच देणार नाही, असा दम आ. ...

मेहकर : समृध्दी महामार्गालगतच्या शेतकऱ्यांचे प्रश्न तात्काळ निकाली निघेपर्यंत महामार्गाचे काम करूच देणार नाही, असा दम आ. डॉ. संजय रायमुलकर यांनी महामार्गाच्या अधिकाऱ्यांना दिला़. रविवारी धानोरा, राजनी, शिवणीपिसा परिसरातील नुकसानग्रस्त शेताची त्यांनी पाहणी केली.

समृध्दी महामार्गाच्या पाण्याचे नियोजन संबंधित ठेकेदाराने वेळेत करून पावसाळ्यापूर्वी या पाण्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घ्यायला पाहिजे होती. मात्र तसे न केल्याने शेतकऱ्यांना शेतात ये-जा करणे कठीण झाले आहे. शेतकऱ्यांनी आम्हास महामार्गाच्या कंपाऊंडला लागून शेतात येण्या-जाण्याकरिता सोडलेल्या रस्त्यामध्ये गिट्टी व मुरूम टाकून द्या, अशी मागणी महामार्गाच्या अधिकाऱ्यांकडे केली हाेती़; मात्र अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. यावेळी वादही झाला हाेता़. याप्रकरणी धानोरा-राजनी येथील सरपंच दत्तात्र्य पडघान यांच्यासह सहा शेतकऱ्यांवर विविध कलमांन्वये शनिवारी गुन्हे दाखल करण्यात आल्याने आ. डॉ. संजय रायमुलकर यांनी रविवारी या भागातील समृध्दी मार्गावर पोहोचून संपूर्ण परिसराची पाहणी केली़. यावेळी जि. प. सदस्य दिलीपराव वाघ, पं. स. मा. उपसभापती डॉ . हेमराज लाहोटी, कृउबासं शिव पाटील-तेजनकर, माजी सरपंच सलीमखा पठाण, हनुमंतराव चव्हाण यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते. दरम्यान, लोणार तहसीलचे नायब तहसीलदार हेमंत पाटील, बिट जमादार प्रभाकर सानप, तलाठी संतोष पनाड, पोकॉ.निवृत्ती सानप हजर होते .

शेतरस्ते झाले बंद

समृध्दी महामार्गाचे काम करत असताना लगतच्या शेतजमिनीचा विचार करण्यात आला नसल्याने शेतातील रस्ते बंद झाले. काही शेतकऱ्यांच्या विहिरी गाळल्या गेल्या व शेतात पाणी साचल्यामुळे शेकडो एकर शेती पाण्यात गेल्याने या शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली़. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या समस्या आमदार रायमुलकर यांच्याकडे मांडल्या़. समृध्दी महामार्गामुळे बाधित झालेल्या शेतजमिनीची नुकसानभरपाई व इतर प्रश्न निकाली निघेपर्यंत येथील महामार्गाचे काम सुरू करू देऊ नका, नंतर मी बघतो, असा विश्वास आ. रायमुलकर यांनी या शेतकऱ्यांना दिला़.

जमिनीचे पडले तुकडे

समृध्दी महामार्गासाठी शेतकऱ्यांकडून घेण्यात आलेल्या जमिनीतील छोटे-छोटे तुकडे शिल्लक राहिल्यामुळे असे तिथे शेतकरी पीक घेऊ शकत नाहीत. याबाबत शासनाने विचार करून शेतकऱ्यांना लाभ दयावा, तसेच महामार्गाच्या कामासाठी लागणारे बांधकाम साहित्य आणण्यासाठी आजूबाजूच्या गावातील रस्त्याचा वाहतुकीसाठी उपयोग करण्यात आल्याने गावरस्ते खराब झाले आहेत. त्यामुळे हे रस्ते पूर्ववत करून देण्यात यावेत, अशी मागणी दिलीपराव वाघ यांनी आ. डॉ . संजय रायमूलकर यांच्या माध्यमातून शासनाकडे केली.

काेट

न्याय्य मागण्या केल्यामुळे आपद्ग्रस्त शेतकऱ्यांवर दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत. अन्यथा समृध्दी महामार्गावर आंदोलन करू - अर्चना दत्तात्रय पडघान, सरपंच धानोरा/राजनी