शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
3
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
4
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
5
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
6
Panchayat 4 Review : 'वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन..'; दुर्दैवाने 'पंचायत ४'विषयी हेच म्हणावं लागेल
7
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
8
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
9
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
10
दिलजीत दोसांझच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीची भूमिका, टीका झाल्यावर म्हणाला...
11
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
12
अपघाताच्या एक दिवस आधी एअर इंडियाच्या सीईओंचा पगार ४६% वाढवला; आता किती पैसे मिळतात?
13
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
14
प्रेक्षकांची प्रतीक्षा आज संपणार; काही तासात सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो येणार; पाहा झलक
15
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
16
केदारनाथला देवाकडे काय मागितलं? चाहत्याचा प्रश्न, अमृताचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाली- "खरं सांगू..."
17
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...
18
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
19
ज्या कतारवर हल्ला केला, त्याच कतारच्या शेखने फोन केला...; अन् इराण सीझफायरसाठी तयारही झाला...
20
"अमेरिकेला गुडघे टेकायला लावले, इराण बनला मुस्लिम जगताचा नेता’’, महबूबा मुफ्ती यांनी केलं कौतुक  

पावसाविना मृगनक्षत्रास प्रारंभ

By admin | Updated: June 15, 2014 00:44 IST

शेतकर्‍यांना पावसाच्या आगमनाची आस लागली असून मागील वर्षीचा कटु अनुभव पाहता तालुक्यातील शेतकर्‍यांनी या वर्षी धुळ पेरणीची जोखीम पत्करली नाही.

मोताळा : मृगनक्षत्राच्या पूर्वसंध्येला किंवा सुरूवातीला हमखास पडणार्‍या पावसाने यावर्षीही पाठ फिरविल्याने शेतकर्‍यांना पावसाच्या आगमनाची आस लागली असून मागील वर्षीचा कटु अनुभव पाहता तालुक्यातील शेतकर्‍यांनी या वर्षी धुळ पेरणीची जोखीम पत्करली नाही. रोहिणी नक्षत्रानतंर मृगनक्षत्राचे सहा दिवस उलटले तरी पावासाने हजेरी लावली नसल्याने शेतकर्‍यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामे करून आकाशाकडे डोळे लावले आहे. तालुक्यातील शेती निसर्गाच्या पावसावर अवलंबुन असून वर्ष भराच्या नियोजनाबरोबरच सतत अडथळे येत असले तरी तालुक्यातील शेतकरी त्यावर मात करीत आला आहे. निसर्गाच्या लहरीपणाला कोणताही उपाय जरी नसला तरी मागील काही वर्षापर्यंत परिसरातील शेतकरीवर्गाने हतबल न होता शेतीचे नियोजन करून आपली फरफट थांबवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र पावसाच्या दगाबाजीमुळे शेतीचे नियोजन संपूर्ण कोलमडत आहे. या वर्षी तालुक्यातील शेतकरी वर्गाने धुळ पेरणीची जोखीम पत्करली नसून ज्यांच्याकडे सिचंणाची सुविद्या आहे अश्याच शेतकर्‍यांनी ठिबक वर कापसाची लागवड केली. मृगनक्षत्रात आतापर्यंत वेळेवर पावासाचे आगमन झाल्यामुळे धुळ पेरणी साधल्याही गेली, मृगनक्षत्रला सुरूवात होवून सहा दिवस झाले तरी तालुक्यात पावासाचा थेंब पडलेला नाही. उलट कडक उन्हाळा जाणवत आहे. या वर्षी सुरूवात कोरडी झाल्याने शेतकरीवर्गात चिंता व्यक्त होत असून मृगनक्षत्राच्या या कोरडेपणामुळे शेतीकामास उशीर होत आहे. मृगाचा पहिला पाऊस पडल्यानतंरची महत्वपूर्ण कामे पाण्याअभावी कामे थांबली आहेत. तालुक्यात खरीप पेरणीचे क्षेत्र ५0 हजार २00 हेक्टर असून खरीपात सर्वाधिक लागवड कापसाची केली जाते. काळानुरूप अर्थिक संकटावर मात करण्यासाठी शेतकर्‍यांनी पिक लागवडीत मोठे बदल केले आहेत. या वर्षी सर्वाधिक लागवड सोयाबीनची केली जात आहे. कापूस एक व सोयाबीन दोन क्रमांकावर आहे. पावसाचा लहरीपणा व बाजारात नगदी पिकाला मिळणार्‍या भावामुळे शेतकर्‍यांचा कल यावर्षीही सोयाबीन व कापसाकडेच जात आहे.

** शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत उष्णतेची तमा न बाळगता पेरणीपूर्व मशागतीची कामे शेतकर्‍यांनी केली असून मृगाकडे शेतकर्‍यांचे डोळे लागले आहेत. मृगनक्षत्रावरच शेतक र्‍यांची भिस्त असते. मृग नक्षत्राच्या पहिल्या चरणात समाधानकारक पाऊस झाला तर पेरण्या साधतात. यावर्षी देखील असे होईल म्हणून मृगाच्या आशेवर शेतकर्‍यांनी शेतीची कामे आटोपून खत, बियाणे खरेदी करून ठेवले आहे. यावर्षीच्या मृग नक्षत्राचे वाहन हत्ती असल्यामुळे पाऊस जास्त पडेल अशी धारणा आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून आकाशात ढगांचा लपंडाव दिसत आहे. त्यामुळे मृगाचा पाऊस लांबल्याची भावना शेतकरीवर्गात निर्माण झाली असून प्रत्येक जण पावसाच्या प्रतीक्षेत आहे.