शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

एसटी बरबटली घाणीने

By admin | Updated: November 6, 2014 23:19 IST

बुलडाणा जिल्ह्यातील प्रकार, दुर्गंधीमुळे प्रवास झाला नकोसा; स्वच्छतेकडे दुर्लक्ष.

बुलडाणा : राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेसमध्ये होणार्‍या अस्वच्छतेकडे एसटी प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे एसटीतून प्रवास करणार्‍या प्रवाशांना याचा कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामीण भागासह महानगरामध्ये जाण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे महामंडळाच्या गाड्यांवरच प्रवासाचे गणित अवलंबून असते. सातत्याने तिकिटाचे दर वाढले तरी केवळ महामंडळाच्या नावाने कुरकुर करीत सर्वसामान्य माणूस नेहमीच प्रवास करण्यासाठी एसटी बसलाच प्राधान्य देतो; मात्न बरेचदा त्याचाही येथील गैरसोयीमुळे नाइलाज होतो. ग्रामीण भागात धावणार्‍या एसटी बसकडे तर कोणाचेही लक्ष नसते. या बसमधून प्रवास करताना अनेक असुविधा दिसून येता त. ग्रामीण भागात जाणार्‍या बसेसची नियमित स्वच्छताच केली जात नाही. गाडीमध्ये साचलेल्या घाणीमुळे प्रवाशांना अगदी जीव नकोसा होतो. अनेकांना तर हा वास सहन होत नसल्याने एसटीत उलट्या होतात. याला ग्रामीण भागात प्रवाशांनीच एक पर्यायी शब्द शोधून काढला आहे. एसटीत उलट्या होणे म्हणजे एसटी लागण असे म्हटल्या जाते. महामंडळाच्या नाकर्तेपणावर पांघरूण घालण्यासाठी प्रवाशांनीच आपली समजूत काढल्याचे यावरून दिसते.बसमध्ये चढताक्षणीच दाराचा कोपरा पानांच्या पिचकार्‍यांनी रंगलेला दिसतो. तेथून घाणीला सुरुवात होते. खिडक्या उलटीने माखलेल्या असतात. व्हेपर्स, चिप्स तसेच गुटख्याच्या पुड्या खाऊन त्याचे पॅकेट संपूर्ण बसमध्ये उडत असतात. बसमध्ये मोठय़ा प्रमाणात धूळ साचलेली असते. एखादी व्यक्ती चालू गाडीतच विडी-सिगारेटचे मनसोक्त झुरके घेताना दिसतो. गर्दीने खचाखच भरलेल्या अशा गाड्यांमध्ये येणार्‍या विशिष्ट दर्पाने जीव घुसमटून जातो. याकडे एसटी प्रशासनाचे नेहमीच दुर्लक्ष होते. त्यामुळेच गरिबांची लोकवाहिनी असलेली एसटी बस आज घाणीच्या विळख्यात सापडलेली आहे. देशभरात स्वच्छता मिशन सुरू झाले असून, एसटीनेसुद्धा मिशन स्वच्छता सुरू करण्याची गरज आहे.