शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

शेत रस्ता अडविल्याने सोयाबीन सुडी अद्यापही शेतातच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चिखली : किरकोळ वादातून शेजारील शेतकऱ्याने शेतरस्ता अडवल्याने शेतातील सोयाबीन पिकाची काढणी खोळबंली असून अद्यापही ...

लोकमत न्यूज नेटवर्क

चिखली : किरकोळ वादातून शेजारील शेतकऱ्याने शेतरस्ता अडवल्याने शेतातील सोयाबीन पिकाची काढणी खोळबंली असून अद्यापही सोयाबीनची सुडी शेतात तशीच पडून आहे. या प्रकाराने मानसिक तणावात आलेल्या तालुक्यातील महिमळ येथील शेतकरी तुकाराम नामदेव शेळके यांनी विषारी औषध प्राशन केले आहे.

तालुक्यातील महिमळ येथील शेतकरी तुकाराम शेळके गत चाळीस वर्षांपासून गट क्र.१४९ व १५० च्या पूर्व दक्षिण नंबर धुऱ्याने पूर्व-पश्चिम जाणे-येणे करतात. त्यांना शेतात जाण्यासाठी दुसरा पर्यायी रस्ता सुध्दा नाही. दरम्यान गट नंबर १४४ मध्ये जाण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम १४३ प्रमाणे शेतात जाण्यायेण्यासाठी ट्रॅक्टर, बैलगाडी ने-आण करण्याकरिता रस्ता उपलब्ध व्हावा, यासाठी गेल्या दोन वर्षांपासून ते महसुली कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत. त्यातच त्यांच्या शेजारील इंगळे नामक शेतकऱ्याने नेहमीचा शेत रस्ता सोयाबीन हंगामापासून अडविला आहे. त्यामुळे शेतात सोंगूण ठेवलेली सोयाबीन सुडीची अद्याप मळणी देखील होऊ शकलेली नाही. काही हात उसने घेतलेले तसेच बँक व खाजगी सावकारांकडून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी सोयाबीन काढणे गरजेचे असतांना, शेतात पडलेली सोयाबीन केवळ रस्ता नसल्याने काढता येत नाही. या सर्व प्रकाराच्या मनस्तापाचा अतिरेक झाल्यामुळे शेतकरी तुकाराम शेळके यांनी विषारी औषध प्राशन करून जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केला आहे. विष प्राशन केल्याचे समजताच त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, तुकाराम शेळके यांचा मुलगा नितीन शेळके यांनी तहसीलदार अजितकुमार येळे यांना याबाबत सविस्तर माहिती दिली. तहसीलदारांनी मंडळाधिकारी, तलाठी व अन्य तहसील कर्मचाऱ्यांना शेत रस्ता मोकळा करून देण्यासाठी महिमळ येथे पाठवले. मात्र, महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांसमक्ष इंगळे यांनी शेत रस्ता मोकळा करण्यास नकार दिला.त्यामुळे, उपरोक्त अधिकाऱ्यांनी येवले नामक शेतकऱ्याच्या शेतातून पीडित शेतकऱ्याला सोयाबीन काढण्यासाठी तात्पुरता पर्यायी शेत रस्ता उपलब्ध करून दिला आहे.

शेत रस्त्याच्या प्रकरणांचा निपटारा व्हावा !

काढणीपश्चात अनेक दिवसांपासून सोयाबीनची सुडी शेतातच असल्याने सुडीत उंदरांनी उच्छाद मांडून मोठे नुकसान केले आहे. केवळ शेत रस्त्याअभावी सदर शेतकऱ्याच्या जिवावर हा प्रसंग बेतला असल्याने महसूल विभागाकडे शेत रस्ता संदर्भाने प्रलंबित प्रकरणाचा तातडीने निपटारा व्हावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.