शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
4
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
5
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
6
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
7
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
8
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
9
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
10
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
11
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
12
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
13
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
14
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
15
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
16
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
17
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
18
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
19
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
20
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

सोयाबीनला भाव, शेतकऱ्यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:36 IST

पान उत्पादक शेतकरी संकटात धाड : बुलडाणा तालुक्यातील काही भागांत अनेक शेतकरी पानमळ्यांची शेती करतात. त्यामध्ये मासरूळ, धामणगाव या ...

पान उत्पादक शेतकरी संकटात

धाड : बुलडाणा तालुक्यातील काही भागांत अनेक शेतकरी पानमळ्यांची शेती करतात. त्यामध्ये मासरूळ, धामणगाव या परिसरांत पानमळे आहेत; परंतु सध्या लॉकडाऊनमुळे विक्री घटल्याने पान उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत.

कर्जमुक्तीची प्रतीक्षा कायमच

बुलडाणा : सध्या खरीप हंगामाच्या पेरणीसाठी जुळवाजुळव सुरू झाली आहे. पीक कर्जासाठी बँकेत गेल्यानंतर शेतकऱ्यांना वेळेवर पीक कर्ज मिळत नाही. अनेक शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची प्रतीक्षा कायमच आहे.

किराणा दुकानावर सुरक्षेकडे दुर्लक्ष

बीबी : शासनाने जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ११ वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. असे असताना नागरिक नाहक दुकानांवर गर्दी करताना दिसून येत आहेत. फिजिकल डिस्टन्सिंग पाळले जात नसल्याचे दिसून येते.

घरपोच बियाणे उपलब्ध करून द्या!

दुसरबीड : येणाऱ्या हंगामासाठी खते, बियाणे यांची सोय करून पुन्हा जोमाने कामाला लागण्यासाठी येथील शेतकरी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे मागील वर्षीप्रमाणे यंदाही घरपोच बियाणे मिळावे, अशी अपेक्षा शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

शेती मशागतीच्या कामांना वेग

साखरखेर्डा : येत्या लवकरच रोहिणी नक्षत्रास सुरुवात होणार आहे. त्यामुळे परिसरात शेती मशागतीला वेग आला आहे. साखरखेर्डा गावातील शेतकरी मान्सूनपूर्व शेतीच्या कामाला लागले आहे. नागरणी, वखरणी, शेतातील काडी कचरा वेचणी आदी कामे करण्यात येत आहेत.

बांधकाम कामगार मदतीच्या प्रतीक्षेत

बुलडाणा : लॉकडाऊनच्या काळात परिसरातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना आर्थिक मदतीची प्रतीक्षा आहे. कोरोना आजारामुळे लॉकडाऊन सुरू असून कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. बांधकाम मजुरांना रोजगार उपलब्ध नाही. त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे.

जंतुनाशक फवारणीसाठी रासेयोचा पुढाकार

बुलडाणा : जिल्ह्यातील काही महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी गाव परिसरात सॅनिटायझर फवारणी केली. परिसर निर्जंतुक करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच त्यांच्याकडून वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजनांची जनजागृती करण्यात आली आहे.

उन्हाळी भुईमुगाचे क्षेत्र वाढले

डोणगाव : परिसरात उन्हाळी भुईमुगाचे क्षेत्र वाढले आहे. मागील वर्षी बेलगाव येथील शेतकऱ्याच्या शेतातील भुईमुगाच्या एका झाडाला १८० शेंगा लागल्याने आश्चर्य व्यक्त होत होते. दरम्यान, या परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी यंदा भुईमुगाची लागवड केली आहे.

विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त

रायपूर : दिवसभरात कित्येकदा वीज गुल होत असल्याने रायपूरसह परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. वातावरणातील उकाड्यामुळे कुलर, पंख्यांची गरज भासते. मात्र वीज पुरवठा खंडित होत असल्याने जिवाची तगमग होते. महावितरण कंपनीने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

ग्रामपंचायतमध्ये विलगीकरण कक्ष

बुलडाणा : काेरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता कोविड सेंटर वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. तसेच जिल्हा प्रशासनाकडून प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये विलगीकरण कक्ष उभारण्याच्या हालचाली सध्या सुरू आहेत. नागरिकांना या कक्षात ठेवून उपचार करण्यात येणार आहेत.