शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

सोयाबीन तेल १२२, सूर्यफूल १४० रुपये किलो !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : बाजारात सर्वाधिक विकले जाणारे सोयाबीन तेल दोन महिन्यांपासून किरकोळमध्ये प्रतिकिलो २० ते २२ रुपयांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बुलडाणा : बाजारात सर्वाधिक विकले जाणारे सोयाबीन तेल दोन महिन्यांपासून किरकोळमध्ये प्रतिकिलो २० ते २२ रुपयांनी वाढून १२२ तर शेंगदाणा तेल १४८ रुपयांवर पोहोचले आहे. या दरवाढीने सर्वसामान्य ग्राहकांना चांगलाच फटका बसत आहे.

सर्वच तेलाच्या किमती २० ते २५ रुपये किलोने वाढल्या आहेत. किमती आणखी किती वाढतील, असे सांगणे कठीण असल्याचे किरकोळ विक्रेत्यांचे मत आहे. गेल्या दोन महिन्यांत सोयाबीन तेलाचे दर प्रतिकिलो २२ रुपये, तर सूर्यफूल तेल २५ रुपयांनी वाढले आहे. दुसरीकडे सोयाबीनला जास्त भाव मिळत नसताना तेलाचे भाव का वाढत आहेत, अशी ओरड सुरू आहे. १०० किलो सोयाबीनपासून १७ ते २२ किलो तेल निघते आणि उर्वरित ढेप तयार होते. पण यंदा ढेपेला देशविदेशात मागणी नाही.त्यामुळे एक क्विंटल सोयाबीनला चार हजारांच्या आसपास भाव मिळत आहे. विदर्भात ८० टक्के सोयाबीन तेल विकले जाते. उर्वरित टक्केवारीत सर्व तेलांचा समावेश आहे.

सोयाबीनचे दर वाढल्याने सर्वच क्षेत्रातून ओरड सुरू आहे. शिवाय दर नियंत्रणात आणा आणि साठेबाजांवर कारवाई करा, अशी मागणी ग्राहक संघटनांकडून केली जात आहे.

सोयाबीन उत्पादनात घट

चालू वर्षात कमी आलेले सोयाबीनचे पीक, आयात व निर्यातीत तफावत आणि जागतिक बाजारात चीनकडून होणारी भरमसाट खरेदी ही दरवाढीची मुख्य कारणे असल्याचे सांगितले जात आहे. भारतात केंद्र सरकारने पामतेलावर १० टक्के आयात शुल्क कमी केले, पण मलेशियाने निर्यातीवर ८ टक्के निर्यात शुल्क वाढविल्याने देशात आयात महाग झाली आहे. त्याचा फटका पामतेलाला बसला आहे.

गेल्या काही दिवसात सोयाबीनच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने सर्वसाधारण गृहिणींना स्वयंपाकातील वापरात काटकसर करावी लागत आहे. तसेच कुटुंबांच्या गरजांवरही परिणाम होत आहेत.

- प्रांजली वानखडे, गृहिणी, बुलडाणा

सोयाबीन तेलाची किंमत वाढत आहे. ती आणखी किती वाढेल, याचा अंदाज नाही.

- संताेष इंगळे, किराणा दुकानदार,बुलडाणा