शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

सोयाबीन शेती झाली तोट्याची;  शेतकरी अडचणीत    

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 11:22 IST

 Buldhana, Agriculture, Farmer एकरी उत्पन्नावर नजर टाकली असता सोयाबीनसाठी आतापर्यंत लागलेला खर्चच जास्त आल्याची परिस्थिती आहे.

ठळक मुद्देपिकांचा फेरपालट होत नसल्याने उत्पन्नावर त्याचा परिणाम होत आहे. यावर्षी उत्पन्नापेक्षा खर्चच जास्त आल्याची परिस्थिती आहे.

- ब्रम्हानंद जाधव बुलडाणा: जिल्ह्यात गेल्या १० वर्षामध्ये सोयाबीनचा पेरा झपाट्याने वाढला आहे. अनेक शेतकरी हे त्याच एकाच शेतात वारंवार सोयाबीन पीक घेत आहेत. शेतात पिकांचा फेरपालट होत नसल्याने उत्पन्नावर त्याचा परिणाम होत आहे. कधी ओला, तर कधी कोरड्या दुष्काळाची छाया पिकांसाठी धोक्याची ठरत आहे. यावर्षी उत्पन्नापेक्षा खर्चच जास्त आल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे आता सोयाबीन शेती तोट्याची होत असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.जिल्ह्यात खरीप हंगामातील एकूण क्षेत्राच्या ५० टक्के क्षेत्रावर सोयाबीन पीक घेतल्या जाते. यंदा सात लाख ३६ हजार हेक्टर क्षेत्रापैकी ३ लाख ८४ हजार ७५५ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पेरणी करण्यात आली होती. परंतू  सोयाबीनच्या उत्पादनामध्ये मोठी घट आल्याचे चित्र आहे.  सोयाबीनच्या  एकरी उत्पन्नावर नजर टाकली असता सोयाबीनसाठी आतापर्यंत लागलेला खर्चही निघत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत.

पिकामध्ये फेरपालट होत नसल्याने उत्पान्नामध्ये घट येत आहे. सोयाबीनच्या शेतात दुसऱ्यावर्षी दुसरे पीक घेतले पाहिजे. - सी. पी. जायभाये, कृषी शास्त्रज्ञ.

मला एका एकरामध्ये केवळ तीन पोते सोयाबीन झाली आहे.  एकरी खर्च ११ हजार रुपयांपर्यंत आला आहे. त्यामुळे आतापर्यंत सोयाबीनसाठी लागलेला खर्चही निघाला नाही. मूग, उडीद पीकही पाण्यातच गेले. - संतोष लाटे, शेतकरी.

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेतीFarmerशेतकरी