शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
2
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
3
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
4
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
5
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
6
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
7
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
8
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
9
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
10
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
11
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
12
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
13
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
14
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
15
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
16
Tulsi Vivah 2025 Wishes: तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
17
दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढायचे; राज ठाकरे यांचा घणाघात, पडदा हटवला, पुरावे दाखवले
18
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार
19
Crime: घरात एकटीच होती प्रेयसी, प्रियकर भेटायला गेला, तेवढ्यात आला भाऊ अन्...शेवट भयंकर!
20
प्रीमियम लूक, ड्युअल स्क्रीन, ५००किमी रेंज; तयार रहा मारुतीची पहिली इलेक्ट्रिक एसयुव्ही येतेय!

बुलडाणा जिल्हय़ात ५५ टक्के क्षेत्रावर हरभर्‍याची पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 02:10 IST

बुलडाणा जिल्ह्यातील अल्प जलसाठा आणि सिंचनाच्या अपुर्‍या सुविधांमुळे शे तकर्‍यांचा गहू पिकांपेक्षा हरभरा पिकाकडे कल वाढला आहे. यावर्षी परतीच्या  पावसामुळे विहिरीच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे निर्धारित उद्दिष्टांच्या ५५ टक्के  क्षेत्रावर हरभर्‍याची पेरणी झाली आहे. 

ठळक मुद्देज्वारी, मका पिकालाही प्राधान्य

हर्षनंदन वाघ। लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा: जिल्ह्यातील अल्प जलसाठा आणि सिंचनाच्या अपुर्‍या सुविधांमुळे शे तकर्‍यांचा गहू पिकांपेक्षा हरभरा पिकाकडे कल वाढला आहे. यावर्षी परतीच्या  पावसामुळे विहिरीच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे निर्धारित उद्दिष्टांच्या ५५ टक्के  क्षेत्रावर हरभर्‍याची पेरणी झाली आहे.  गेल्या महिन्यात परतीचा पाऊस जोरदार बरसला. या पावसामुळे खरीप हंगामातील  सोयाबीन, कापूस पिकांचे नुकसान झाले आहे. त्यातच एकाच वेळी कापूस,  सोयाबीन काढणीस आले होते. त्यामुळे मजुरांना मागणी वाढली होती. अनेक शे तकर्‍यांना वेळेवर मजूर मिळाले नसल्याने पीक जागेवरच पडून राहिले. त्यामुळे शे तकर्‍यांचे नुकसान झाले. परतीच्या पावसाने खरीप हंगामातील पिकांचे नुकसान केले असले तरी हा पाऊस  रब्बी हंगामासाठी आशादायी ठरला आहे. जमिनीमध्ये ओलावा असल्याने व  हरभरा काढण्यासाठी लागणारा कमी खर्च गृहीत धरून शेतकरी हरभरा पिकाकडे  वळले आहेत. काही शेतकर्‍यांकडे पाण्याची उपलब्धता असतानाही ते हरभरा पीक  घेत आहेत. कोरडवाहू व कमी पाण्यात पीक चांगले उत्पादन देते व बाजारातही भाव टिकून  असतात. यामुळेच शेतकर्‍यांचा हरभरा पिकाकडे कल वाढला आहे.

चार्‍यासाठी ज्वारी, मक्याची लागवडकापूस, सोयाबीन काढणीनंतर यापूर्वी मका, ज्वारीचे पीक घेतले जात आहे; परंतु  मका, ज्वारी काढण्यासाठी मजूर नकार देत असल्याने केवळ चार्‍यासाठी ज्वारीची  पेरणी केली जात आहे; मात्र ज्वारी काढणीसाठी मजूर धजावत नसल्याने व उत्पन्ना पेक्षा खर्च अधिक होत असल्याने केवळ चारा उपलब्ध व्हावा म्हणून ज्वारी पीक  घेतले आहे. इतर क्षेत्रावर हरभर्‍याची पेरणी केली आहे, अशी प्रतिक्रिया बुलडाणा  तालुक्यातील दत्तपूर येथील शेतकरी सुहास वानरे यांनी दिली. तर कमी पाण्यात उत् पन्न जास्त मिळत असल्यामुळे दोन वर्षांपासून हरभरा पिकाची लागवड करीत  आहोत. यावर्षी ४0 एकरावर हरभरा पिकाची लागवड केली असल्याची माहिती  बुलडाणा तालुक्यातील खुपगाव येथील शेतकरी नामदेव जाधव यांनी दिली.

७३ हजार ९१0 हेक्टरवर हरभर्‍याची पेरणीरब्बी हंगामात जिल्ह्यासाठी हरभरा पिकाचे १ लाख ३४ हजार ३९४ हेक्टर क्षेत्राचे  नियोजन करण्यात आले होते. यापैकी ७३ हजार ९१0 हेक्टर क्षेत्र हे हरभर्‍यासाठी  राखीव होते. त्यापैकी ११ नोव्हेंबर पर्यंत ४0 हजार ५0२ हेक्टर क्षेत्रावर हरभर्‍याची  पेरणी झाली. जिल्ह्यात आतापर्यंत ५५ टक्के हरभर्‍याची पेरणी पूर्ण झाली आहे. १३  तालुक्यापैकी सर्वात जास्त हरभरा पेरणी चिखली तालुक्यात १३ हजार ११,  बुलडाणा तालुक्यात १0 हजार २१३, त्यानंतर लोणार तालुक्यात ५ हजार ९२४  हेक्टरवर हरभरा पिकाची पेरणी करण्यात आली आहे.

टॅग्स :agricultureशेती