शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्हय़ात ५५ टक्के क्षेत्रावर हरभर्‍याची पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 02:10 IST

बुलडाणा जिल्ह्यातील अल्प जलसाठा आणि सिंचनाच्या अपुर्‍या सुविधांमुळे शे तकर्‍यांचा गहू पिकांपेक्षा हरभरा पिकाकडे कल वाढला आहे. यावर्षी परतीच्या  पावसामुळे विहिरीच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे निर्धारित उद्दिष्टांच्या ५५ टक्के  क्षेत्रावर हरभर्‍याची पेरणी झाली आहे. 

ठळक मुद्देज्वारी, मका पिकालाही प्राधान्य

हर्षनंदन वाघ। लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा: जिल्ह्यातील अल्प जलसाठा आणि सिंचनाच्या अपुर्‍या सुविधांमुळे शे तकर्‍यांचा गहू पिकांपेक्षा हरभरा पिकाकडे कल वाढला आहे. यावर्षी परतीच्या  पावसामुळे विहिरीच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे निर्धारित उद्दिष्टांच्या ५५ टक्के  क्षेत्रावर हरभर्‍याची पेरणी झाली आहे.  गेल्या महिन्यात परतीचा पाऊस जोरदार बरसला. या पावसामुळे खरीप हंगामातील  सोयाबीन, कापूस पिकांचे नुकसान झाले आहे. त्यातच एकाच वेळी कापूस,  सोयाबीन काढणीस आले होते. त्यामुळे मजुरांना मागणी वाढली होती. अनेक शे तकर्‍यांना वेळेवर मजूर मिळाले नसल्याने पीक जागेवरच पडून राहिले. त्यामुळे शे तकर्‍यांचे नुकसान झाले. परतीच्या पावसाने खरीप हंगामातील पिकांचे नुकसान केले असले तरी हा पाऊस  रब्बी हंगामासाठी आशादायी ठरला आहे. जमिनीमध्ये ओलावा असल्याने व  हरभरा काढण्यासाठी लागणारा कमी खर्च गृहीत धरून शेतकरी हरभरा पिकाकडे  वळले आहेत. काही शेतकर्‍यांकडे पाण्याची उपलब्धता असतानाही ते हरभरा पीक  घेत आहेत. कोरडवाहू व कमी पाण्यात पीक चांगले उत्पादन देते व बाजारातही भाव टिकून  असतात. यामुळेच शेतकर्‍यांचा हरभरा पिकाकडे कल वाढला आहे.

चार्‍यासाठी ज्वारी, मक्याची लागवडकापूस, सोयाबीन काढणीनंतर यापूर्वी मका, ज्वारीचे पीक घेतले जात आहे; परंतु  मका, ज्वारी काढण्यासाठी मजूर नकार देत असल्याने केवळ चार्‍यासाठी ज्वारीची  पेरणी केली जात आहे; मात्र ज्वारी काढणीसाठी मजूर धजावत नसल्याने व उत्पन्ना पेक्षा खर्च अधिक होत असल्याने केवळ चारा उपलब्ध व्हावा म्हणून ज्वारी पीक  घेतले आहे. इतर क्षेत्रावर हरभर्‍याची पेरणी केली आहे, अशी प्रतिक्रिया बुलडाणा  तालुक्यातील दत्तपूर येथील शेतकरी सुहास वानरे यांनी दिली. तर कमी पाण्यात उत् पन्न जास्त मिळत असल्यामुळे दोन वर्षांपासून हरभरा पिकाची लागवड करीत  आहोत. यावर्षी ४0 एकरावर हरभरा पिकाची लागवड केली असल्याची माहिती  बुलडाणा तालुक्यातील खुपगाव येथील शेतकरी नामदेव जाधव यांनी दिली.

७३ हजार ९१0 हेक्टरवर हरभर्‍याची पेरणीरब्बी हंगामात जिल्ह्यासाठी हरभरा पिकाचे १ लाख ३४ हजार ३९४ हेक्टर क्षेत्राचे  नियोजन करण्यात आले होते. यापैकी ७३ हजार ९१0 हेक्टर क्षेत्र हे हरभर्‍यासाठी  राखीव होते. त्यापैकी ११ नोव्हेंबर पर्यंत ४0 हजार ५0२ हेक्टर क्षेत्रावर हरभर्‍याची  पेरणी झाली. जिल्ह्यात आतापर्यंत ५५ टक्के हरभर्‍याची पेरणी पूर्ण झाली आहे. १३  तालुक्यापैकी सर्वात जास्त हरभरा पेरणी चिखली तालुक्यात १३ हजार ११,  बुलडाणा तालुक्यात १0 हजार २१३, त्यानंतर लोणार तालुक्यात ५ हजार ९२४  हेक्टरवर हरभरा पिकाची पेरणी करण्यात आली आहे.

टॅग्स :agricultureशेती