शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
8
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
9
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
12
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
13
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
14
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
15
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
16
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
17
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
18
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
19
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
20
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

समाज भक्ती संप्रदायाकडे वळला- डहाकेवसंतराव डहाके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 00:21 IST

बुलडाणा : संतांनी संस्कृत भाषेऐवजी प्रादेशिक भाषेतूनच संत साहित्याची निर्मिती केली. यामुळे सर्व समाजाला संताची भाषा समजून समाज भक्ती संप्रदायाकडे वळला, असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक तथा मराठी साहित्य संमेलनाचे माझी अध्यक्ष वसंतराव डहाके यांनी केले.

ठळक मुद्देमॉडेल डिग्री कॉलेजमध्ये रंगले संत साहित्यावर चर्चासत्र

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : संतांनी संस्कृत भाषेऐवजी प्रादेशिक भाषेतूनच संत साहित्याची निर्मिती केली. यामुळे सर्व समाजाला संताची भाषा समजून समाज भक्ती संप्रदायाकडे वळला, असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक तथा मराठी साहित्य संमेलनाचे माझी अध्यक्ष वसंतराव डहाके यांनी केले.बुलडाणा येथील मॉडेल डिग्री कॉलेज येथे आयोजित भक्ती संप्रदायाचा मराठी साहित्यावर प्रभाव, या विषयावर आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. या चर्चासत्राचे उद्घाटक म्हणून डॉ.सदानंद देशमुख, प्राचार्य डी.एम.अंभोरे, प्राचार्य नीळकंठ भुसारी, प्राचार्य राजाभाऊ हावरे, प्रा.प्रभाकर वारे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात वसंतराव डहाके  म्हणाले की, संतांचा मराठी साहित्यावर अंतरंगी आणि बाहय़रंगी प्रभाव आहे. यामुळेच संतांची ३00 वर्षांची परंपरा आजही टिकून आहे आणि पुढेही ही परंपरा टिकून राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी असलेले प्रा.सदानंद देशमुख आपल्या भाषणात म्हणाले भक्तीसंप्रदायाचा मराठी साहित्यावर प्रभाव, या गोष्टीचा विचार करताना लक्षात येते. आधीच्या बंदिस्त वेदकालीन संस्कृतीत सामान्य माणसांना लिहिण्या, वाचण्याची भक्तीची वाट मोकळी नव्हती. ज्ञानेश्‍वरांनी हा आत्मविश्‍वास पहिल्यांदा निर्माण केला. त्याचप्रमाणे महानुभाव वाड्मयाने सर्व जाती, धर्मातील स्त्री -पुरुषांना भक्तीच्या माध्यमातून लिहिण्या, वाचण्याचा अभिव्यक्त होण्याचा मार्ग मोकळा करून दिला. त्यामुळे नंतर काळात मराठी साहित्यामध्ये कृषी साहित्य आणि विद्रोही साहित्य निर्माण झाले. परंपरेतील भालचंद्र नेमाडे, महांतरे यासारख्या लेखकांनी असले अनुभव आणि निष्ठा यांच्याशी प्रामाणिक राहून केले.  संत साहित्यातील वेदक अभिव्यक्तीमुळे दलित, पददलित समाजातील लेखक, कवींना विद्रोहाची वाट सापडली आणि नंतरच्या काळात प्रभावी साहित्य निर्मिती होत गेली. या चर्चासत्राचे प्रास्ताविक प्राचार्य गोविंद गायकी यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी मराठी साहित्याची गंगोत्री ही बुलडाणा जिल्हय़ातून झाली आहे. संत चोखामेळा, चक्रधर स्वामी, महदंबा या संतांची या जिल्हय़ाला मोठी परंपरा लाभली आहे. हीच परंपरा आजही टिकून असल्याचे गायकी यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अनंत सिरसाट यांनी केले. तर आभार प्रा.विनकर यांनी मानले.