शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव-बऱ्हाणपूर रस्त्याचे भिजत घोंगडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 11:41 IST

Jalgaon-Barhanpur road : सातपुडा पर्वतातील काम पूर्ण होणे आणि नांदुरा-जळगाव मार्गावरील मध्य रेल्वेच्या क्रॉसिंगवर उड्डाणपूल होणे गरजेचे आहे.

- नानासाहेब कांडलकर   लोकमत न्यूज नेटवर्क   जळगाव जामोद : आडवळणावर असलेल्या जळगाव शहराला व तालुक्याला आंतरराज्य महामार्गावर आणण्यासाठी जळगाव-बऱ्हाणपूर रस्त्याचे सातपुडा पर्वतातील काम पूर्ण होणे आणि नांदुरा-जळगाव मार्गावरील मध्य रेल्वेच्या क्रॉसिंगवर उड्डाणपूल होणे गरजेचे आहे. गत अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारे हे प्रश्न अद्यापही पूर्णत्वाला गेले नाहीत. त्यामुळे आडवळणाच्या जळगाव नगराचे भाग्य केव्हा उजळणार, असा सवाल येथील नागरिक करीत आहेत. केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील काही रस्त्यांना निधी उपलब्ध करून दिला आहे. परंतु काही वर्षांपूर्वी नांदुरा रेल्वे क्रॉसिंगवरील उड्डाणपुलासह नांदुरा नगरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या उड्डाणपुलाचे भूमिपूजन नितीन गडकरी यांनी केले होते. परंतु नंतर तो प्रश्न प्रलंबितच राहिला. जळगावकडे येतांना रेल्वे गेटची मोठी अडचण वाहनधारकांना सहन करावी लागते. चोवीस तासांपैकी किमान १६ ते १७ तास हे रेल्वे गेट बंद असते, अशा प्रवाशांचा अनुभव आहे. त्यामुळे या रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपूल होण्याची गरज आहे. हे काम नितीन गडकरी यांनी लक्ष दिले तरच पूर्ण होण्याची शक्यता आहे. जळगाव-बऱ्हाणपूर आंतरराज्य महामार्गाचा प्रश्नसुद्धा स्वातंत्र्यप्राप्तीपासून आजतागायत प्रलंबित आहेत. जळगाव-बऱ्हाणपूर हे अंतर ५९ किलोमीटरचे आहे. पैकी ते ४३ किलोमीटर रस्त्याचा भाग हा मध्यप्रदेश हद्दीत येतो. मध्यप्रदेश सरकारने ४३ किलोमीटरच्या रस्त्याचे दुपदरीकरण करून डांबरीकरण केले आहे. सातपुडा पर्वतात येणाऱ्या मार्गाचेही दुपदरीकरण केले आहे. त्यामुळे आता या रस्त्यावर नियमित वाहतूक होण्यासाठी सातपुडा पर्वतातील सुमारे सहा किलोमीटर अंतराची अडचण आहे. जळगाव ते बऱ्हाणपूर या ५९ किलोमीटरपैकी सद्यस्थितीतील ५३ किमीच्या रस्त्याचे काम झाले आहे.  अवघ्या सहा किमीच्या अपूर्ण रस्त्यामुळे या मार्गावरील अधिकृत वाहतूक सुरू झाली नाही. बांधकाम विभागाने हा प्रश्न त्वरित सोडविण्याची गरज आहे. 

 ४० किमीचे अंतर होणार कमीजळगाव-बऱ्हाणपूर आंतरराज्य मार्ग सुरू झाल्यास बऱ्हाणपूर, खंडवा, इंदोर, उज्जैनकडे जाण्याचे अंतर सुमारे ४० किमीने कमी होणार आहे. सध्या नागपूर, अमरावती, अकोला, अकोट, शेगाववरून वाहने मलकापूर, मुक्ताईनगर मार्गे बऱ्हाणपूरला जातात. त्यामुळे सध्या आडवळणावर असणारे जळगाव शहर आंतरराज्य महामार्गावर येणार आहे. 

शेगावचे अंतर होणार कमी मध्यप्रदेशात श्री संत गजानन महाराजांचा मोठा भाविक वर्ग आहे. खंडव्यावरून बऱ्हाणपूर, जळगाव, जामोद मार्गे अनेक भक्त शेगावची पायीवारीसुद्धा करतात. हा रस्ता सुरू झाल्यास गजानन भक्तांची कमी अंतराने शेगाव येथे येण्याची सोय होईल. त्यामुळे हा रस्ता त्वरित सुरू होणे महत्त्वाचे आहे.

टॅग्स :Jalgaon Jamodजळगाव जामोदroad transportरस्ते वाहतूकNitin Gadkariनितीन गडकरीbuldhanaबुलडाणा