शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
2
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
3
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
4
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
5
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
6
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
7
IPL 2026 Retention Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
8
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
9
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
10
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
11
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
12
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
13
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
14
मासिक पाळी येण्यापूर्वी चिडचिड, रडू येतं, मूड जातो, त्याची ५ कारणं- शरीरातले बदल ओळखा पटकन
15
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
16
सोम प्रदोष २०२५: सोम प्रदोषाने आठवड्याची सुरुवात होणार; 'या' ८ राशींना शिवकृपेचे संकेत मिळणार
17
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
18
कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
19
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
20
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

आरटीई प्रक्रियेत 'एसएमएस'च्या अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 13:17 IST

तांत्रिक अडचणींमुळे अर्ज केलेल्या पालकांना मोबाईलवर एमएमएस जात नसल्याचे दिसून येत आहे. 

पश्चिम विदर्भात १० हजार ३२० जागा: आठ दिवसात १५ हजारावर अर्जबुलडाणा: पश्चिम विदर्भातून आरटीई अंतर्गत १० हजार ३२० विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे. मात्र अमरावती विभागातून गेल्या आठ दिवसातच १५ हजार ७६४ विद्यार्थ्यांचे अर्ज आले आहेत. सध्या तांत्रिक अडचणींमुळे अर्ज केलेल्या पालकांना मोबाईलवर एमएमएस जात नसल्याचे दिसून येत आहे. दुर्बल व वंचित घटकातील बालकांना पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळेचे शिक्षण मोफत मिळावे, यासाठी शासनाच्या वतीने  इयत्ता पहिलीमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. अमरावती विभागामध्ये ९७६ शाळांमध्ये आरटीईअंतर्गत २५ टक्के प्रवेशाची प्रक्रिया राबविण्यात येते. अमरावती विभागातील अकोला, बुलडाणा, वाशिम, अमरावती आणि यवतमाळ या पाचही जिल्ह्यातून एकूण १० हजार ३२० विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिल्या जाणार आहे. त्यासाठी आॅनलाइन प्रवेश अर्जप्रक्रिया १२ फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. ही प्रवेश प्रक्रिया १२ फेब्रुवारी ते २९ फेब्रुवारीपर्यंत राबविली जात आहे. परंतू सुरूवातीपासून या प्रक्रियेला तांत्रिक अडचणींचा सामनाकरावा लागत आह. पाल्याचा अर्ज आरटीईच्या संकेतस्थळावरून भरताना नावे पूर्ण भरली जात नव्हती. अर्ज भरल्यानंतर पालकांना आपल्या अर्जाची माहिती व अर्ज क्रमांक  आणि पासवर्ड आदी बाबींची एसएमएसद्वारे पालकांच्या मोबाईलवर पाइविल्या जातात. परंतू आता तांत्रिक अडचणीमुळे पालकांना मोबाईलवर एसएमएस जात नाहीत. त्यामुळे नविन नोंदणी केल्यावर स्क्रीनवर येणारा अर्ज क्रमांक आणि पासवर्ड जतन करून ठेवण्याच्या सुचना शिक्षण विभागाकडून देण्यात येत आहेत. 

अमरावती जिल्ह्यातून सर्वाधिक अर्जआतापर्यंत अमरावती जिल्ह्यातून आरटीई प्रवेशासाठी सर्वाधिक अर्ज आले आहेत.  अमरावती जिल्ह्यातून ४ हजार ७६२ अर्ज आले आहेत. तापाठोपाठ अकोला जिल्ह्याचा जिल्ह्याचा नंबर लागतो. अकोला जिल्ह्यातन ३ हजार ९०५ विद्यार्थ्यांचे अर्ज आले आहेत. बुलडाणा जिल्ह्यातून ३ हजार १२०, वाशिम जिल्ह्यात ८८४ आणि यवतमाळ जिल्ह्यात ३ हजार ९३ अर्ज आले आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाRight To Educationशिक्षण हक्क कायदा