शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

सिंदखेडराजा तालुक्यात विहिरींनी तळ गाठला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 19:20 IST

साखरखेर्डासह परिसरात यावर्षी पावसाचे अत्यल्प प्रमाण राहिल्याने तलाव कोरडेच असून विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे जवळपास १५ गावात पाण्याची भिषण टंचाई निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देसाखरखेर्डासह अनेक गावात पाणी टंचाई पाईप लाईनसाठी पाणी पुरवठा मंत्र्यांकडे प्रस्ताव

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा : साखरखेर्डासह परिसरात यावर्षी पावसाचे अत्यल्प प्रमाण राहिल्याने तलाव कोरडेच असून विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे जवळपास १५ गावात पाण्याची भिषण टंचाई निर्माण झाली आहे. विहिर अधिग्रहणासह टँकरचे प्रस्ताव ग्राम पंचायतीनी सादर केले असून यावर अद्याप कोणताही ठोस निर्णय प्रशासनाने घेतला नाही. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.  कोराडी प्रकल्प ते गावापर्यंत नविन पाईप टाकावे, यासाठी ग्राम पंचायतीने पाणी पुरवठामंत्री ना.बबनराव लोणीकर यांना आ.डॉ.शशिकांत खेडेकर यांच्या मार्फत प्रस्ताव सादर केला आहे. साखरखेर्डा येथे महालक्ष्मी तलावावरुन पाणी पुरवठा केल्या जातो. त्याच प्रमाणे कोराडी प्रकल्पावरुन सुध्दा पाणी पुरवठा होतो. यावर्षी पाऊस अत्यल्प झाल्याने महालक्ष्मी तलावात जेमतेम २५ टक्के पाणीसाठा जमा झाला. नोव्हेंबर महिन्यात तलावात मृत साठ्यापेक्षा कमी पाणी असल्याने गावाला पाणी पुरवठा करणे कठीण झाले आहे. कोराडी प्रकल्पावरुन पाणी पुरवठा करण्यासाठी ग्राम पंचायतीसाठी किरकोळ दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. परंतु पाईप लाईन ही निकृष्ट दर्जाची असल्याने गावापर्यंत पाणी पोहचण्यासाठी खुपच प्रयत्न करावे लागणार आहे. कोराडी प्रकल्प ते गावापर्यंत नविन पाईप टाकावे, यासाठी ग्राम पंचायतीने पाणी पुरवठामंत्री ना.बबनराव लोणीकर यांना आ.डॉ.शशिकांत खेडेकर यांच्या मार्फत प्रस्ताव सादर केला आहे. पिंपळगांव सोनारा येथेही यावर्षी भिषण पाणी टंचाई निर्माण झाली असून, महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. येथील नळयोजनेला किमान ४० वर्ष पूर्ण झाले असून पाणी पुरवठा विहिरीत पाणी नाही जवळपास एकही तलाव नाही. त्यामुळे या गावाला टँकरने पाणी पुरवठा करावा, असा प्रस्ताव सरपंच तोताराम ठोसरे यांनी तहसिलदार आणि पंचायत समितीकडे पाठविला आहे. त्याच बरोबर गावात नविन नळयोजना प्रस्तावित करुन पाणी पुरवठा सुरळीत कसा होईल यासाठी प्रस्ताव आ.डॉ.शशिकांत खेडेकर यांचेकडे सादर केला आहे. या गावात आहे पाणी समस्यासिंदखेडराजा तालुक्यातील गोरेगाव, शिंदी, राताळी, उमनगाव, दरेगाव, मोहाडी, तांदुळवाडी, काटेपांग्री, सावंगीभगत या गावातही पाणी टंचाई निर्माण झाली आहे. काही गावात टँकरची मागणी करण्यात आली असून विहिर अधिग्रहणाचे प्रस्तावही पाठविले आहेत. प्रशासन यावर काय निर्णय घेते याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागून आहे.

टॅग्स :sindhaked raja rajwadaसिंदखेडराजा राजवाडा