शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

राष्ट्रवादीत खांदेपालटाचे संकेत

By admin | Updated: June 2, 2015 02:19 IST

खामगाव तालुक्यासह जिल्ह्यातील नवीन चेह-यांना व तरुणांना मिळणार नेतृत्वाची संधी.

अनिल गवई /खामगाव : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू असून, जिल्ह्यातील तालुका आणि शहर अध्यक्ष पदासाठी नवीन चेहर्‍यांना संधी दिल्या जाणार असल्याचे संकेत आहे. काही ठिकाणी फेरबदल तर काही पदांवर थेट नवीन चेहर्‍यांना संधी देत, राष्ट्रवादीच्या घड्याळाची गती वाढविण्याचे वरिष्ठांचे प्रयत्न आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील पक्षाची पकड मजबूत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश पातळीवरून प्रयत्न केल्या जात आहेत. यासाठी राष्ट्रवादीचे नेते डॉ. राजेंद्र शिंगणे यांची प्रदेश उपाध्यक्षपदी वर्णी लावण्यात आली आहे. तर जिल्हाध्यक्षपदी पुन्हा अँड. नाझेर काजी यांना संधी देण्यात आली आहे. दरम्यान, उपरोक्त दोन्ही नियुक्तीमुळे एप्रिल महिन्यात पार पडलेल्या संघटनात्मक निवडणुकीच्या अहवालाचा प्रश्न ऐरणीवर आला असून, जिल्हाध्यक्षापदाच्या नियुक्तीनंतर जिल्ह्यातील शहर आणि तालुकाध्यक्षपदाच्या नियुक्त्यांकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा धडा घेत, आगामी ग्रामपंचायत, नगर परिषद आणि जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नव्या दमाने कामाला लागा असे स्पष्ट निर्देश वरिष्ठ पातळीवरून स्थानिक नेत्यांना देण्यात आले आहेत. तळागाळातील लोकांपर्यंत पक्ष पोहोचविण्यासाठी नवीन चेहर्‍यांना संधी देण्याचे सुतोवाच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केले. त्यानंतर जिल्ह्यात संघटनात्मक बांधणीसाठी निवडणूका घेण्यात आल्या. या निवडणुकीत गटातटाचे राजकारण शिगेला पोहोचले असतानाच, वस्तुनिष्ठ अहवाल तयार करण्याचे निर्देश निवडणूक पक्ष निरीक्षकांना देण्यात आले. शहर आणि तालुकाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या पक्ष निरीक्षकांनी आपले अहवाल ९ एप्रिलनंतर वरिष्ठांकडे सादर केले. या अहवालानुसार आता जिल्हय़ातील सर्वच तालुक्यात तालुकाध्यक्ष आणि शहर अध्यक्षांच्या नियुक्त्या केल्या जाणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे.