शहरं
Join us  
Trending Stories
1
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
2
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
3
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
4
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
5
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
6
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
7
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
8
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
9
'लष्कराचा पराक्रम वस्तू असल्यासारखं विकत आहेत', तिकीट दाखवत कुणी केलीये भाजपवर टीका?
10
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
11
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
12
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
13
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?
14
इंडोनेशिया, थायलंड, दुबई... पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबत कोणकोणते देश फिरली Youtuber ज्योती?
15
Viral Video : कांदा कापताना डोळ्यांतून येणार नाही पाणी! सोशल मीडियावरचा व्हायरल देसी जुगाड बघाच
16
'या' अभिनेत्याला डेट करतीये राधिका मदन? रिलेशनशिपवर म्हणाला, "मी खूप चिपकू बॉयफ्रेंड..."
17
रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला! एकाच वेळी २७३ ड्रोन्स सोडले अन्...
18
RR vs PBKS : शशांक सिंहचा परफेक्ट फिनिशिंग टच! पंजाब किंग्जनं उभारली विक्रमी धावसंख्या
19
सोलापूर आग दुर्घटना; मृतांचा आकडा पोहचला आठवर; बेडरूममध्ये सापडले पाच जणांचे मृतदेह 
20
Nehal Wadhera नं फिफ्टीसह सावरला डाव; मग प्रीती झिंटानं संघाच्या हिरोला अशी दिली दाद

स्वामिनाथन आयोगासाठी शक्ती दाखवा- कडू

By admin | Updated: March 7, 2016 02:29 IST

धाड येथे जाहिरसभेत आमदार कडू यांचे शेतक-यांना अवाहन.

धाड (जि. बुलडाणा): विठुरायाचे नामस्मरण करीत दरवर्षी लाखोंच्या संख्येने शेतकरी पंढरीची वारी करतात. जशी मनापासून भक्ती करता, तशी आपली ताकद एकवटून केवळ एकवेळ दिल्ली दरबारी लाखोंच्या संख्येने दिंडी काढा आणि स्वामिनाथन आयोग लागू करण्यासाठी सरकारला भाग पाडा, असे आवाहन आमदार बच्चू कडू यांनी येथे केले. प्रहार संघटनेच्यावतीने ५ मार्च रोजी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आ. बच्चू कडू यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सभेला त्यांनी संबोधित केले. व्यासपीठावर संघटनेचे जिल्हाप्रमुख वैभवराजे माहिते, उपजिल्हाप्रमुख राणा संजय इंगळे, डॉ. दीपक धोटे, साहेबराव मोहिते, सुरेश सोनुने, कलीम जमदार, दीपक मालवे, शिवनारायण पोफळकर, शिवाजी परमेश्‍वर, अपंग सेलचे नामदेव डोंगरदिवे, श्रीमंत राऊत, भगवान जाधव, गुलाबराव गुजर, बबन ठाकरे यांची उपस्थिती होती. मी शेतकर्‍यांच्या हक्कासाठी लढत आहे. या लढाईत प्राण गेले तरी चालेल, मात्र स्वामिनाथन आयोग लागू झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे सांगून आमदार कडू म्हणाले, राज्यात साडेतीन लाख शेतकर्‍यांच्या आत्महत्या झाल्या. या आत्महत्यांना सरकारच जबाबदार आहे. हे शासन सत्तेच्या लायक नाही. वेगवेगळय़ा झेंड्याखाली लोक एकत्र येतात. याचाच अर्थ जात, धर्म पाळला जातो. पूर्वी मुद्दय़ावर निवडणुका लढविल्या जात होत्या; आता जातीपातीवरच लढल्या जात आहेत. पाकिस्तानकडून होणारे हल्ले परवडले; परंतु जात-धर्माच्या नावाने परंपरा सुरू राहणे घातक आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्येचा विषय युवकांनी गांभीर्याने घेतला पाहिजे, असे आवानही त्यांनी केले. यावेळी डॉ. दीपक धोटे, राणा संजय इंगळे यांनीही विचार व्यक्त केले. सूत्रसंचालन सुनील वाघ यांनी केले. आभार साहेबराव मोहिते यांनी मानले.