शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

स्वामिनाथन आयोगासाठी शक्ती दाखवा- कडू

By admin | Updated: March 7, 2016 02:29 IST

धाड येथे जाहिरसभेत आमदार कडू यांचे शेतक-यांना अवाहन.

धाड (जि. बुलडाणा): विठुरायाचे नामस्मरण करीत दरवर्षी लाखोंच्या संख्येने शेतकरी पंढरीची वारी करतात. जशी मनापासून भक्ती करता, तशी आपली ताकद एकवटून केवळ एकवेळ दिल्ली दरबारी लाखोंच्या संख्येने दिंडी काढा आणि स्वामिनाथन आयोग लागू करण्यासाठी सरकारला भाग पाडा, असे आवाहन आमदार बच्चू कडू यांनी येथे केले. प्रहार संघटनेच्यावतीने ५ मार्च रोजी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आ. बच्चू कडू यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सभेला त्यांनी संबोधित केले. व्यासपीठावर संघटनेचे जिल्हाप्रमुख वैभवराजे माहिते, उपजिल्हाप्रमुख राणा संजय इंगळे, डॉ. दीपक धोटे, साहेबराव मोहिते, सुरेश सोनुने, कलीम जमदार, दीपक मालवे, शिवनारायण पोफळकर, शिवाजी परमेश्‍वर, अपंग सेलचे नामदेव डोंगरदिवे, श्रीमंत राऊत, भगवान जाधव, गुलाबराव गुजर, बबन ठाकरे यांची उपस्थिती होती. मी शेतकर्‍यांच्या हक्कासाठी लढत आहे. या लढाईत प्राण गेले तरी चालेल, मात्र स्वामिनाथन आयोग लागू झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे सांगून आमदार कडू म्हणाले, राज्यात साडेतीन लाख शेतकर्‍यांच्या आत्महत्या झाल्या. या आत्महत्यांना सरकारच जबाबदार आहे. हे शासन सत्तेच्या लायक नाही. वेगवेगळय़ा झेंड्याखाली लोक एकत्र येतात. याचाच अर्थ जात, धर्म पाळला जातो. पूर्वी मुद्दय़ावर निवडणुका लढविल्या जात होत्या; आता जातीपातीवरच लढल्या जात आहेत. पाकिस्तानकडून होणारे हल्ले परवडले; परंतु जात-धर्माच्या नावाने परंपरा सुरू राहणे घातक आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्येचा विषय युवकांनी गांभीर्याने घेतला पाहिजे, असे आवानही त्यांनी केले. यावेळी डॉ. दीपक धोटे, राणा संजय इंगळे यांनीही विचार व्यक्त केले. सूत्रसंचालन सुनील वाघ यांनी केले. आभार साहेबराव मोहिते यांनी मानले.