शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

स्वामिनाथन आयोगासाठी शक्ती दाखवा- कडू

By admin | Updated: March 7, 2016 02:29 IST

धाड येथे जाहिरसभेत आमदार कडू यांचे शेतक-यांना अवाहन.

धाड (जि. बुलडाणा): विठुरायाचे नामस्मरण करीत दरवर्षी लाखोंच्या संख्येने शेतकरी पंढरीची वारी करतात. जशी मनापासून भक्ती करता, तशी आपली ताकद एकवटून केवळ एकवेळ दिल्ली दरबारी लाखोंच्या संख्येने दिंडी काढा आणि स्वामिनाथन आयोग लागू करण्यासाठी सरकारला भाग पाडा, असे आवाहन आमदार बच्चू कडू यांनी येथे केले. प्रहार संघटनेच्यावतीने ५ मार्च रोजी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आ. बच्चू कडू यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सभेला त्यांनी संबोधित केले. व्यासपीठावर संघटनेचे जिल्हाप्रमुख वैभवराजे माहिते, उपजिल्हाप्रमुख राणा संजय इंगळे, डॉ. दीपक धोटे, साहेबराव मोहिते, सुरेश सोनुने, कलीम जमदार, दीपक मालवे, शिवनारायण पोफळकर, शिवाजी परमेश्‍वर, अपंग सेलचे नामदेव डोंगरदिवे, श्रीमंत राऊत, भगवान जाधव, गुलाबराव गुजर, बबन ठाकरे यांची उपस्थिती होती. मी शेतकर्‍यांच्या हक्कासाठी लढत आहे. या लढाईत प्राण गेले तरी चालेल, मात्र स्वामिनाथन आयोग लागू झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे सांगून आमदार कडू म्हणाले, राज्यात साडेतीन लाख शेतकर्‍यांच्या आत्महत्या झाल्या. या आत्महत्यांना सरकारच जबाबदार आहे. हे शासन सत्तेच्या लायक नाही. वेगवेगळय़ा झेंड्याखाली लोक एकत्र येतात. याचाच अर्थ जात, धर्म पाळला जातो. पूर्वी मुद्दय़ावर निवडणुका लढविल्या जात होत्या; आता जातीपातीवरच लढल्या जात आहेत. पाकिस्तानकडून होणारे हल्ले परवडले; परंतु जात-धर्माच्या नावाने परंपरा सुरू राहणे घातक आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्येचा विषय युवकांनी गांभीर्याने घेतला पाहिजे, असे आवानही त्यांनी केले. यावेळी डॉ. दीपक धोटे, राणा संजय इंगळे यांनीही विचार व्यक्त केले. सूत्रसंचालन सुनील वाघ यांनी केले. आभार साहेबराव मोहिते यांनी मानले.