शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

रात्रीच्या अंधारात ‘एफसीआय’कडून व्यापाऱ्यांची तूर खरेदी

By admin | Updated: April 13, 2017 01:12 IST

नांदुरा- शेतकऱ्यांचा संताप पाहता बाजार समिती कर्मचाऱ्यांनी उशीरा रात्री त्या व्यापाऱ्यांच्या मालाचे एकशे चौदा कट्टे सिल केले व पो.स्टे. ला तक्रार दिली.

नांदुरा : बारदाना नसल्याने आधीच खोळंबलेली शासकीय भारतीय खाद्य निगमची तुर खरेदी चार दिवसांपुर्वी पुर्ववत झाली तोच ११ एप्रिलच्या रात्री अंधारात भारतीय खाद्य निगम चा मार्क असलेल्या पोत्यात तीन, चार दिवसांपुर्वी अचानक येवून पडलेल्या व्यापाऱ्यांच्या तुरीची खरेदी सुरु केली. मात्र महिनाभरापासुन बाजार समितीत तूर विक्रीसाठी हालअपेष्टा सहन करुन त्रासलेल्या शेतकऱ्यांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी संगठीत होवून याबाबत संबंधीत हमाल यांना धारेवर धरले असता त्यांनी पळ काढला. शेतकऱ्यांचा संताप पाहता बाजार समिती कर्मचाऱ्यांनी उशीरा रात्री त्या व्यापाऱ्यांच्या मालाचे एकशे चौदा कट्टे सिल केले व पो.स्टे. ला तक्रार दिली.मागील दोन महिन्यात जेमतेम विस दिवस भारतीय खाद्य निगमकडून तूर खरेदी झाली. त्यामुळे आजही मागील चाळीस दिवसांपासून शेतकरी तूर विकण्यासाठी ठाण मांडून आहेत. सुमारे चार दिवसांपुर्वी बारदाना उपलब्ध झाल्याने खरेदी सुरु झाली. मात्र पुर्वीप्रमाणे यात हेराफेरी होत असल्याचा संशय शेतकऱ्यांना आल्याने त्यांनी पाळत ठेवली असता ११ च्या रात्री दोन ते तीन दिवसांपुर्वी बाजार समितीत येवून पडलेल्या व्यापाऱ्यांच्या तुरीचे मोजमाप सुरु झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. शेतकऱ्यांनी याबाबत सदर हमालांच्या बारदान्याची तपासणी केली असता तो भारतीय खाद्य निगमचा असल्याचे सिध्द झाले. त्यानंतर शेतकऱ्यांनी याबाबत बाजार समिती संचालक व कर्मचारी यांना फोन करुन या सर्व अनागोंदी कारभाराबाबत जाब विचारला असता त्यांनी दाखल होवून तो माल जप्त केला. याबाबत बाजार समितीने १२ एप्रीलच्या दुपारी पोलीस स्टेशन नांदुरा येथे लेखी तक्रार दिली. यामध्ये अफजल नामक हमाल व इतर तिघांनी कोणतीही परवानगी नसतांना तुरीचा शेतमाल मोजल्याचे नमुद केले असून संबधीतांवर कडक कारवाई त्याचबरोबर याप्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. १२ च्या दिवसभर शेतकऱ्यांनी याबाबत सर्व अधिकारी व कर्मचारी यांना धारेवर धरले व तो शासकीय बारदाना त्या हमालांना कसा मिळाला याबाबत जाब विचारुन तिव्र नाराजी बाजार समिती, भारतीय खाद्य निगम व खरेदी विक्री संघाबाबत व्यक्त केली. तसेच यापुर्वी ३ मार्चला खरेदीतील अनागोंदी विरोधात आवाज उठविल्यानंतर जो तुरीचा साठा जप्त झाला होता त्यापैकी काही जप्त माल गायब झाल्याने शेतकरी संतप्त झाले होते. ग्रेडर खर्चे यांचे घुमजावतर शेतकऱ्यांचा निकृष्ठ तुरीचा माल नाकारणाऱ्या ग्रेडर खर्चे यांना रात्री व्यापाऱ्याचा निकृष्ठ माल कसा पोत्यात गेला, हमालांना बारदाना कोणी दिला, पुर्वी जप्त केलेला माल कसा गायब झाला आदी प्रश्न विचारुन धारेवर धरले असता त्यांनी घुमजाव करीत असमाधानकारक उत्तरे दिल्याने शेतकरी संतप्त झाले होते.