शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
5
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
6
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
7
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
8
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
9
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
10
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
11
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
12
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
13
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
14
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
15
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
16
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
17
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
18
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
19
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
20
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली

अखाद्य बर्फाचे जीवघेणे ‘गोले’!

By admin | Updated: February 22, 2017 02:34 IST

उन्हाळा सुरू झाल्याने सध्या शहरातील विविध चौकात सर्वत्र बर्फ गोल्याची दुकाने लागली आहेत.

हर्षनंदन वाघ बुलडाणा, दि. २१-उन्हाळा सुरू झाल्याने सध्या शहरातील विविध चौकात सर्वत्र बर्फ गोल्याची दुकाने लागली आहेत. मुलांसह तरुण या बर्फगोल्यांचा आस्वाद घेत आहेत. मात्र, जिल्ह्यात एकही खाद्य बर्फाचा कारखाना नसून, सर्व ठिकाणी अखाद्य बर्फाचा वापर करण्यात येत असून, नागरिकांच्या जीवाशी खेळ करण्यात येत आहे. उन्हाळा सुरू झाल्यामुळे ग्रामीण भागासह शहरी भागात शरीराला गारवा देणार्‍या विविध वस्तूंसह शेकडो बर्फ गोल्याचे ठेले दिसून येत आहेत. या ठेल्यावर बर्फ गोला खाण्यासाठी गरिबांसह श्रीमंताच्याही गाड्या उभ्या राहात असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र, हा बर्फ गोला नसून, विषाचाच गोला आहे. कारण, या गोल्यात वापरला जाणार कुठलाही बर्फ खाण्यायोग्य नसून, तो औद्योगिक वापराचा आहे. खाद्य पदार्थ तपासणीच्या कोणत्याही प्रक्रियेतून न जाता, तो थेट खवय्यांच्याच गळ्याला लागत आहे. बर्फ गोल्यांच्या सर्रास विक्रीचा हा प्रकार आरोग्याच्या दृष्टीने भीतीचा गोळा आणण्याचाच प्रकार आहे. बर्फ गोला हा लहानग्यांपासून प्रौढांपयर्ंत आवडीचा असल्यामुळे उन्हाळा लागला, की गल्लोगल्लीत बर्फ गोलाविक्रेते नजरेस पडतात. नानाविध रंगांचे आइस गोले हे विक्रेते ग्राहकांना विकतात. मात्र, या गोळ्यातील हे रंग खाण्याचे आहेत की, रसायनांचे? तसेच प्रत्येकाच्या तोंडात भरविणार्‍या गोल्यात वापरला जाणारा बर्फ कोणता असतो, याबाबत कोणीही खात्री देऊ शकत नाही. अशुद्ध पाण्यापासून तयार बर्फाचे सेवन झाल्यास गॅस्ट्रो, डायरियासह पाण्यापासून होणारे आजार होण्याची ९0 टक्के भीती असते.रासायनिक रंगामुळे घशाचे विकारबर्फ गोल्यात वापरल्या जाणार्‍या रासायनिक रंग ही निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे व त्याचा खाद्य पदार्थात वापर केल्यामुळे घशाचे विकार होऊ शकतात. रासायनिक रंग, निकृष्ट दर्जाचे पाणी आणि सॅकरीनपासून गोला आणि आइस कँडी तयार केले जाते. दिवसेंदिवस महागाई वाढत असल्याने खाण्याचे प्रमाणित रंग, साखर महागली आहेत. पेप्सी तयार करण्यासाठी त्यांचा वापर केल्यास उत्पादन खर्च वाढतो. त्याच्या तुलनेत रासायनिक रंग आणि सॅकरीनचा वापर केल्यास निम्म्या खर्चात पेप्सी तयार होत असल्यामुळे निर्माते सर्रास रासायनिक रंग आणि सॅकरीनचा वापर करतात. त्याचा वापर आइस गोल्यात सुद्धा करण्यात येतो.अखाद्य बर्फाचा वापरबर्फाचे उत्पादन करणार्‍या कारखान्यांत काही ठिकाणी दर्शनी भागात अखाद्य बर्फ म्हणून उल्लेख केलेला दिसतो. असे अखाद्य बर्फाचे कारखाने जिल्ह्यात जवळपास १३ आहेत. विशेष म्हणजे खाद्य बर्फाचा कारखाना एकही नाही. त्यामुळे अखाद्य बर्फ तयार करण्यासाठी कोणत्या प्रकारचे पाणी वापरले जात असेल, ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. बर्फ मोठय़ा आकाराचा व्हावा व तो जास्त काळ टिकावा, यासाठी त्यावर मोठय़ा प्रमाणावर रासायनिक प्रक्रिया केली जाते. हे आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरू शकते. ज्या बर्फाचे गारेगार गोले करून विकले जातात, त्या बर्फाचा मूळ वापर रुग्णालयांमध्ये औषधांचा अथवा सलाइनचा साठा करण्यासाठी होतो. मच्छीमार याचा वापर मासे ताजे राहण्यासाठी करतात. बर्फाचा सर्वाधिक वापर हा रासायनिक उत्पादने तयार करणार्‍या कंपन्यांमध्ये होतो. हाच बर्फ आपण आपली तहान भागविण्यासाठी वापरतो.