शेगाव : वीज निर्मिती प्रकल्पातील ६६0 मेगावॅटचा संच सोमवारी रात्री तांत्रिक कारणामुळे बंद पडला. पंधरा दिवसांमध्ये दुसर्यांदा संच बंद पडल्याने राज्यात विजेचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे २ ते ५ तास भारनियमन करण्याची वेळ महावितरणवर आली आहे. वाढलेले तापमान आणि लांबलेला पावसाळा यामुळे विजेच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यातच वीज निर्मिती केंद्रातील संच बंद पडत असल्याने राज्यात १५00 ते २000 मेगावॅटचा विजेचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे महावितरणला मंगळवारी राज्यात २ ते ५ तास भारनियमन करण्याची वेळ आली. शेगाव परिसरात मागिल दोन दिवसापासुन रात्री १ ते २ या काळात इर्मजन्सी भारनियमन केल्या जात आहे.पावसाळा लांबणार असल्याने कोयना जलविद्युत प्रकल्पातील वीज निर्मिती बंद आहे. त्यातच केंद्रीय एक्सचेंजमधून ४.५0 रुपये प्रती युनिट दर देऊनही अपेक्षित १ हजार मेगावॅट वीज उपलब्ध झाली नाही. यातून मार्ग काढण्यासाठी महावितरणने आता बुधवारसाठी ४.७0 पैसे प्रती युनिट दराने ८00 मेगावॅट वीज आरक्षित केली आहे. याशिवाय जेएसडब्ल्यूकडून १00 मेगावॅट वीज उपलब्ध होणार आहे. अदानीचा बंद पडलेला संच येत्या दोन ते तीन दिवसांत कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे विजेची तुट भरू निघण्यास मदत होईल, असे महावितरणतर्फे सांगण्यात आले. तोपयर्ंत मात्र जिल्ह्यातिल जनतेला भारनियमनाचा सामना करावाच लागणार आहे.
भारनियमनाचा पुन्हा फटका
By admin | Updated: June 12, 2014 22:44 IST