शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
2
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
3
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
4
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
5
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
6
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
7
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
8
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
9
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
10
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
11
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
12
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
13
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
14
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
15
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
16
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
17
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
18
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
19
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान
20
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर

गेले दिगंबर ईश्वर विभूती...राहिल्या त्या कीर्ती जगामाजी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2021 10:54 AM

Shivshankarbhau Patil funeral in Shegaon : श्री गजानन महाराज की जय’ या श्लोकाचा गजर करीत भाऊंना अखेरचा निरोप दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : ‘गेले दिगंबर ईश्वर विभूती...राहिल्या त्या कीर्ती’ या अंभगाचे स्वर कानावर पडताच बुधवारी अवघी विदर्भ पंढरी शोकसागरात बुडाली. भरत खंडाला व्यवस्थापनाचे धडे देणारा व्यवस्थापन गुरू ब्रम्हात सामावल्याचे समजताच, बुलडाणा जिल्ह्यातील अनेकांची पावलं, शेगावकडे धावली. भाऊंना कृतीशीलतेतून श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी कमालिच्या शिस्तीत शेगावकर एकवटले. व्यावसायिकांनी लागलीच आपली प्रतिष्ठाने बंद केलीत. क्षर्णाधात अवघे शेगाव शांत झाले. अनेकांच्या डोळ्यांना अश्रृधारा लागल्या... निमित्त होते ते कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांच्या अंत्यसंस्काराचे.कर्मयोगी शिवशंकर भाऊ पाटील यांचे निधन झाल्याचे सायंकाळी ५ वाजता जाहीर झाले. त्यानंतर बुलडाणा जिल्ह्यातील विविध संस्थानचे पीठाधीश, वारकरी, किर्तनकार ताबडतोब संत नगरीत दाखल झाले. श्री गजानन महाराज संस्थान सोबतच नागझरी येथील गोमाजी महाराज संस्थान, संत भोजने महाराज संस्थान अटाळी, जागृती आश्रम, दत्तुजी महाराज संस्थान, सखाराम महाराज संस्थान इलोरा, हनुमान संस्थान वारी हनुमान, बर्डेश्वर संस्थान तरवाडीचे पदाधिकारी आणि विश्वस्त शेगावकडे धावले. पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, शेगावचे प्रभारी तहसिलदार डॉ. सागर भागवत, यांच्यासह श्री गजानन महाराज संस्थानचे विश्वस्त, श्रीराम पुंडे आणि रफीकसेठ भाऊंच्या निवासस्थानी पोहोचले. ना.डॉ. शिंगणे, आ.अ‍ॅड. आकाश फुंडकर, आ. डॉ. संजय कुटे, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या.

‘अनंत कोटी ब्रम्हाड नायक’चा गजर!हरिपाठानंतर ‘आपुल्या माहेरा जाईन मी आता’... या अभंगासोबतच गेले दिगंबर ईश्वर विभूती...राहिल्या त्या कीर्ती जगामाजी...या अभंगांनी भाऊंच्या अंत्ययात्रेला सुरूवात झाली. तोच संत नगरीतील आबाल वृध्दांनी ‘अनंत कोटी ब्रम्हाड नायक...महाराजाधिराज योगीराज परब्रम्ह सचितानंद भक्तप्रतीपालक शेगाव निवासी समर्थ सदगुरू श्री गजानन महाराज की जय’ या श्लोकाचा गजर करीत भाऊंना अखेरचा निरोप दिला.

मोहन भागवतांची शोकसंवेदना!राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर संघचालक मोहन भागवत यांनी भ्रमणदूरध्वनीद्वारे आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्यात. आ. निळकंठदादा पाटील यांच्याशी संवाद साधून सरसंघचालकांनी ‘भाऊं’प्रती कृतज्ञता व्यक्त केली.

दीडतासात अंत्यसंस्काराचे नियोजनभरत खंडातील व्यवस्थापनाचे गुरू असलेल्या शिवशंकर भाऊ पाटील यांच्या अंत्यसंस्काराचे नियोजन अवघ्या दीड तासात श्री गजानन महाराज संस्थानने केले. कोरोना काळात गर्दी होणार नाही, याची संपूर्ण खबरदारी श्री गजानन महाराज संस्थानने भाऊंच्या अंत्यसंस्काराप्रसंगी प्रामुख्याने पाळली.

सर्व धर्मियांची हजेरी!शिवशंकरभाऊंच्या निधनाची वार्ता वाºयासारखी शेगावात पसरताच, अनेकांची पाऊले भांऊच्या घराच्या दिशेने वळली. गर्दी टाळत काहींनी बाळापूर रोडपरिसरातील इमारतींचा आसरा घेतला. सर्वच धर्मातील गणमान्य आणि मान्यवरांनी भाऊंना श्रध्दांजली अर्पण केली.

गर्दी टाळण्याचे आवाहनव्यवस्थापन गुरूंच्या अंत्यविधीला अजिबात गर्दी होणार नाही, शासनाने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे व मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत अंत्यविधी करण्याचे जाहीर करीत निळकंठदादा पाटील, श्रीकांतदादा पाटील यांनी गर्दी टाळण्याचे आवाहन केले. ‘आपण आमच्या दु:खात सहभागी आहातच...घरुनच श्रध्दांजली अर्पण करावी’ अशी भावनिक सादही भाऊंच्या निधनानंतर पाटील परिवाराच्यावतीने घालण्यात आली. शेगावकरांनीही या आवाहनाला प्रतिसाद देत, भाऊंच्या निवासस्थानाऐवजी परिसरातील इमारतींवरूनच भाऊंचे अखेरचे दर्शन घेतले. 

टॅग्स :Shegaonशेगावkhamgaonखामगाव