शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

 शिर्ला प्रकल्पाचे पाणी खामगावकरांना मिळण्याची शक्यता धूसरच!​​​​​​​

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 14:52 IST

‘दहा वर्षात शिर्ला डॅम प्रोजेक्ट होवू शकला नाही, आता दीड महिन्यात कसा होणार?’ असा प्रश्न खामगावकरांना पडला आहे.

- योगेश फरपट लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: शहरवासियांना भिषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. यावर पर्याय म्हणून पालिका प्रशासनाने शिर्ला डॅमवरून पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. वास्तविकत: शिर्ला डॅम हा प्रोजेक्ट २००९ पासून सुरु आहे, मात्र तो पुर्णत्वास आणण्यात पालिका प्रशासनाला अपयश आले आहे. कंत्राटदार व पालिकेत समन्वयाचा अभाव असल्याने हा प्रकल्प होण्यास दिरंगाई होत आहे. अशात पुढील दीड महिन्यात प्रकल्प पुर्ण करून नागरिकांना पाणी देण्याचे दिवास्वप्न दाखवण्याचा प्रताप पालिकेच्या पदाधिकाऱ्यांकडून केला जात आहे. याबाबत शहरात आश्चर्य व्यक्त केले जात असून ‘दहा वर्षात शिर्ला डॅम प्रोजेक्ट होवू शकला नाही, आता दीड महिन्यात कसा होणार?’ असा प्रश्न खामगावकरांना पडला आहे.सध्या खामगाव शहराला गेरू माटरगाव धरणावरून १५ ते २० दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. मात्र धरणातील जलसाठा संपुष्टात येत असल्याने पर्यायी व्यवस्था म्हणून शिर्ला डॅमवरून खामगावकरांसाठी पाणीपुरवठ्याचे नियोजन पालिकेमार्फत सुरु आहे. ३० एप्रिलपर्यंतच शिर्ला डॅमवरून पाणी पुरवठा सुरु होईल अशाप्रकारची वल्गना सत्ताधाऱ्यांनी केली होती. त्यानंतर नागरिकांचा रोष बघता ७ मेपासून पाणी नक्की मिळेल असे सांगण्यात आले. मात्र दोनदा दिलेल्या आश्वासनानंतर पाणीपुरवठा सुरु न झाल्याने पालिका प्रशासना तोंडघशी पडली आहे. कारण शिर्ला डॅमवरून पाणीपुरवठा करण्यासाठी कोणत्याही प्रकारची व्यवस्था नाही. मुळात पालिकेकडून नागरिकांची दिशाभूल केली जात असल्याचे वास्तव आहे. प्राप्त माहितीनुसार शिर्ला डॅम या प्रोजेक्टची सुरवात २००५ पासूनची आहे. तत्कालीन नगराध्यक्ष सुभाष देशपांडे यांनी दुरदृष्टी ठेवून २०२० पर्यंत शहराची लोकसंख्या विचारात घेवून या कायमस्वरुपी पाणी पुरवठा योजनेचा प्लान आखला होता. त्यानंतर सरस्वतीताई खासणे (२००६-२००९) सत्तेत आल्या. २००९ मध्ये अशोकसिंह सानंदा नगराध्यक्ष असतांना वर्क आॅर्डर मिळाली. २००९ ला प्रत्यक्ष काम सुरु झाले. अद्याप हे काम पुर्णत्वास येवू शकले नाही. त्यानंतर सरस्वतीताई खाचणे, गणेश माने, अशोक सानंदा नगराध्यक्ष राहिले. विद्यमान नगराध्यक्षा अनिताताई डवरे यांच्या कार्यकाळात पुन्हा या प्रोजेक्टचे काम हाती घेण्यात आले आहे. आमदार अ‍ॅड. आकाश फुंडकर हे स्वत: शिर्ला डॅमवर ठाण मांडून आहेत. पालिका प्रशासनाचे प्रामाणिक प्रयत्न असले तरी अनेक काम अद्याप प्रलंबीत असल्याने दीड महिन्यात खामगावकरांना पाणी मिळणे कठीण आहे.

टॅग्स :khamgaonखामगावwater scarcityपाणी टंचाई