शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
5
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
6
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
7
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
8
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
9
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
10
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
11
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
12
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
13
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
14
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
15
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
16
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
17
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
18
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
19
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
20
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!

शेगाव-पंढरपूर पालखी मार्गाला जाताहेत तडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:29 IST

शेगाव-पंढरपूर पालखी मार्गाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या रस्त्याचा दर्जा पाहण्यासाठी इंजिनिअर नेमलेले आहेत. रस्ता खराब झाल्यास ठेकेदाराला ...

शेगाव-पंढरपूर पालखी मार्गाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या रस्त्याचा दर्जा पाहण्यासाठी इंजिनिअर नेमलेले आहेत. रस्ता खराब झाल्यास ठेकेदाराला चार वर्षे दुरुस्ती करणे बंधनकारक आहे. विशेष म्हणजे रस्ताकाम अजून पूर्ण झाले नाही. ८ ते १० महिन्यांचा कालावधी झाला नाही, तर या रस्त्यावर तडे जाण्यास सुरुवात झाली आहे. सुलतानपूर, वडगाव तेजन, शारा, लोणार, अजीसपूर गावाजवळील रस्त्यावर जागोजागी तडे गेल्याने दुरुस्ती सुरू झाली आहे. यामुळे एमएसआरडीसीचे अधिकारी रस्ता काम सुरू असतानाच याकडे लक्ष देत नाहीत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सुमारे ४३० किलोमीटरच्या शेगाव-पंढरपूर या महामार्गावर सुमारे दोन हजार कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत. सुलतानपूर ते मंठा या महामार्गावर काँक्रिटीकरण झालेल्या रस्त्याला जागोजागी तडे गेले आहेत. तत्कालीन पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते परतूर येथे मोठा गाजावाजा करून या रस्ताकामाचा प्रारंभ करण्यात आला होता. तेव्हा त्यांनी हा महामार्ग राज्यात माॅडेल ठरेल, असा विश्वास व्यक्त केला होता. हा पालखी मार्ग मंजूर केल्याचे श्रेय विदर्भ व मराठवाड्यातील लोकप्रतिनिधी घेत होते. पण आता असे निकृष्ट दर्जाचे काम होत असेल तर संबंधित ठेकेदारावर कारवाईसाठी लोकप्रतीनिधी पुढे येतील का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

महामार्ग राज्यात मॉडेल ठरणार का?

रस्त्यावर जागोजागी थीगळ लावल्याने हा महामार्ग राज्यात माॅडेल ठरेल काय ? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. या महामार्गावरच्या कामांकडे वरिष्ठ पातळीवरून लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे.