शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

शेगावच्या नाफेड केंद्रावर पंचनाम्यादरम्यान गोंधळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2017 02:50 IST

संतप्त शेतक-यांचा रास्ता रोको; पोलीसांना पाचारण.

शेगाव : तूर खरेदीनंतर मार्केट यार्डात पडून असलेल्या तुरीचे पंचनामे सनियंत्रण समितीमार्फत शनिवारी करण्यात आले. यावेळी शेतकरी व अधिकार्‍यात झालेल्या बाचाबाचीनंतर संतप्त शेतकर्‍यांनी रास्ता रोको केले. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, पोलीसांना पाचारण करण्यात आल्यानंतर पुन्हा पंचनामे सुरु झाले. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नाफेड केंद्रातर्फे २२ एप्रिल रोजी तूर खरेदी बंद झाल्यानंतरही जवळपास १८ हजार क्विंटल तूर मोजमापासाठी पडून होती. प्रत्यक्ष नोंद झालेल्या तूरीचे सनियंत्रण समितीमार्फत पंचानामे करण्याचे निर्देश जिल्हाधिकार्‍यांनी दिल्यानंतर शनिवारी दुपारी बारा वाजता संनियत्रण समितीचे सदस्य असलेले साहाय्यक निबंधक एस. पी. पोहरे, कृउबास सचिव विलास पुंडकर, खविसंचे अधिकारी मनोहर ताठे, पणन महासंघाचे शिंगणे यांच्या उपस्थितीत तूरीचे पंचनामे करण्यात आले. मात्र तूर खरेदीत घोटाळा झाल्याचा मुद्दा शेतकर्‍यांनी उचलून धरला. यावेळी शेतकरी व अधिकार्‍यात बाचाबाची झाली. अधिकार्‍यांकडून अपेक्षित उत्तरे न मिळाल्यामुळे संतप्त झालेल्या जवळच असलेल्या जगदंबानगर चौकात काहीवेळ रास्ता रोको केला. यावेळी पोलीसांना घटनास्थळी धाव घेतली व संतप्त शेतकर्‍यांची समजूत काढली. त्यानंतर वातावरण निवळले व पुन्हा सुरु करण्यात आले.