शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

मेहकर तालुक्यात लोकसहभागातून शेतरस्ते

By admin | Updated: July 12, 2014 22:22 IST

सुवर्ण जयंती राजस्व अभियान मंडळाच्यावतीने पांदन शेतरस्त्याचे काम करण्यात आले असून, ठिकाणी लोकवर्गणी व श्रमदानातून पांदन शेतरस्ते उभारण्यात आले आहेत.

मेहकर : तालुक्यातील विविध ठिकाणी सुवर्ण जयंती राजस्व अभियान मंडळाच्यावतीने पांदन शेतरस्त्याचे काम करण्यात आले असून, ठिकाणी लोकवर्गणी व श्रमदानातून पांदन शेतरस्ते उभारण्यात आले आहेत. अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेल्या अशा अनेक पांदन शेतरस्त्यांनी शेतकर्‍यांच्या पुढाकारामुळे मोकळे श्‍वास घेतला आहे. मोठमोठय़ा पांदन शेतरस्त्याच्या भोवती झालेल्या अतिक्रमणामुळे हे रस्त्या गल्या बनत चालल्या आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांना त्या रस्त्याने शेतात जाणे अवघड होऊन बसते. काही शेतकर्‍यांनी पांदन शेतरस्त्यालाच आपली शेती बनविल्याने समोर जाणार्‍या इतर शेतकर्‍यांना त्याचा नाहक त्रास सोसावा लागतो. तसेच शेतकर्‍यांमध्ये यामुळे वाद उद्भवल्याच्या घटनाही घडत आहेत. शेतकर्‍याच्या आर्थिक उन्नतीसाठी व शेतात जाण्यास सोयीचे होण्यासाठी शासनाच्या सुवर्ण जयंती राजस्व अभियान मंडळाच्यावतीने तालुक्यातील अनेक ठिकाणी पांदन शेतरस्त्यांचे काम करण्यात आले आहे. तालुक्यातील ब्रम्हपुरी फाट्यानीकचा रस्ता शेतकर्‍यांना अडचणीचा ठरला होता. त्यासाठी तहसिलदार निर्भय जैन यांना निवेदन देऊन रस्ता तयार करुन देण्याची मागणी केली होती. त्यानंतर शेतकर्‍यांनी लोकवर्गणी जमा करुन सदर शेतरस्ता जेसीबीच्या साहाय्याने तयार केला. सदर रस्ता हा तहसिलदार निर्भय जैन, नायब तहसिलदार डाखे, मंडळ अधिकारी डाखोरे, तलाठी होणे यांच्या उपस्थितीत शेतकर्‍यांना खुला करुन देण्यात आला. यावेळी उपसरपंच मनोज गिर्‍हे, संजय वडतकर, बद्री गिर्‍हे, श्याम मुळे, राजू गुंजकर, रामेश्‍वर धंदर, अरुण गावंडे आदी शेतकरी उपस्थित होते. सुवर्ण जयंती महसुल अभियान अंतर्गत तहसिलदार निर्भय जैन यांच्या मार्गदर्शनाखाली शेंदला ते जानेफळ हा पांदन रस्ता लोकसहभागातून अतिक्रमण मुक्त करण्यात आला. यावेळी वैभव रहाटे, राजाभाऊ रहाटे, मंगळ रहाटे, संजू रहाटे, चंदु रहाटे, देवराव सरदार, दिलीप रहाटे, कचरू रहाटे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. यासह तालुक्यातील अनेक ठिकाणचे शेतरस्ते लोकसहभागातून खुले झाल्याने शेतकर्‍यांसाठी सोयीचे झाले आहे.