शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
6
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
7
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
9
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
10
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
11
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
12
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
13
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
14
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
15
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
16
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
17
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
18
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
19
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
20
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा

तळपत्या उन्हाच्या झळा पिकांच्या मुळावर!

By admin | Updated: May 10, 2017 07:18 IST

पाण्याची पातळी खालावल्याने सिंचन करणे शक्य होत नसल्यामुळे उन्हाळी पिकांना जगविणे अवघड झाले आहे.

ब्रह्मानंद जाधव। बुलडाणा : जिल्ह्यात यावर्षी उन्हाळी पिकांचे १ हजार ८१० हेक्टर क्षेत्रावर कृषी विभागाने नियोजन केले होते; यामध्ये तीन पट वाढ होऊन २९९ टक्के म्हणजे ५ हजार ४२० हेक्टरवर सूर्यफूल, भुईमूग, मका यांसह इतर उन्हाळी पिकांची पेरणी करण्यात आली आहे; मात्र तळपत्या उन्हाच्या झळा पिकांच्या मुळावर बसत असल्याने या पिकांचे नुकसान होत आहे. पाण्याची पातळी खालावल्याने सिंचन करणे शक्य होत नसल्यामुळे उन्हाळी पिकांना जगविणे अवघड झाले आहे.पाण्याची उपलब्धता पाहूनच यावर्षी उन्हाळी पिकांचे क्षेत्र वाढले. कृषी विभागाने यावर्षी सूर्यफूल, भुईमूग, मका यासह इतर उन्हाळी पिकांचे १ हजार ८१० हेक्टर क्षेत्रावर नियोजन केले होते; मात्र यामध्ये तीन पटीने वाढ होऊन सुमारे ५ हजार ४२० हेक्टर क्षेत्रावर सूर्यफूल, भुईमूग, मका व इतर उन्हाळी पिकांची पेरणी झाली. त्यामध्ये जळगाव तालुक्यात सरासरी क्षेत्र २३० हेक्टर असून, ७२५ हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी पिकांची पेरणी झाली आहे. संग्रामपूर तालुक्यात ४६० हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी ३४० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. चिखली तालुक्यात २० हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी १५१ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. बुलडाणा तालुक्यात १४० हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी ८० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. देऊळगाव राजा तालुक्यात ४० हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी ४०९ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मेहकर तालुक्यात २४० हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी ८३० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सिंदखेडराजा तालुक्यात नियोजन नसतानाही २३५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. लोणार तालुक्यात २२० हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी ३३७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. खामगाव तालुक्यात ३५० हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी १८२० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. शेगाव तालुक्यात ३० हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी कुठेच पेरणी झाली नाही. मलकापूर तालुक्यात ४० हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी १५१ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मोताळा तालुक्यात ४० हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी ३०७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. नांदुरा तालुक्यात नियोजन नसतानाही ३५ हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी पिकांची पेरणी झाली आहे; परंतु मे महिना उजाडताच पाण्याची पातळी झपाट्याने खालावल्याने उन्हाळी पिकांवर जलसंकट निर्माण झाले आहे.सोसाट्याची उष्ण हवा, कोरडे हवामान यामुळे पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे जमिनीतली ओल इतर हंगामापेक्षा उन्हाळ्यात लवकर कमी होते. परिणामी, उन्हाळी पिकांना पाणी लवकर द्यावे लागते, तसेच पाळ्याही जास्त द्याव्या लागतात. म्हणजे दुपटीपेक्षा जास्त पाणी द्यावे लागते; मात्र पाण्याची उपलब्धता कमी झाल्याने व तपत्या उन्हामुळे उन्हाळी पिकांचे नुकसान होत आहे.