शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

तळपत्या उन्हाच्या झळा पिकांच्या मुळावर!

By admin | Updated: May 10, 2017 07:18 IST

पाण्याची पातळी खालावल्याने सिंचन करणे शक्य होत नसल्यामुळे उन्हाळी पिकांना जगविणे अवघड झाले आहे.

ब्रह्मानंद जाधव। बुलडाणा : जिल्ह्यात यावर्षी उन्हाळी पिकांचे १ हजार ८१० हेक्टर क्षेत्रावर कृषी विभागाने नियोजन केले होते; यामध्ये तीन पट वाढ होऊन २९९ टक्के म्हणजे ५ हजार ४२० हेक्टरवर सूर्यफूल, भुईमूग, मका यांसह इतर उन्हाळी पिकांची पेरणी करण्यात आली आहे; मात्र तळपत्या उन्हाच्या झळा पिकांच्या मुळावर बसत असल्याने या पिकांचे नुकसान होत आहे. पाण्याची पातळी खालावल्याने सिंचन करणे शक्य होत नसल्यामुळे उन्हाळी पिकांना जगविणे अवघड झाले आहे.पाण्याची उपलब्धता पाहूनच यावर्षी उन्हाळी पिकांचे क्षेत्र वाढले. कृषी विभागाने यावर्षी सूर्यफूल, भुईमूग, मका यासह इतर उन्हाळी पिकांचे १ हजार ८१० हेक्टर क्षेत्रावर नियोजन केले होते; मात्र यामध्ये तीन पटीने वाढ होऊन सुमारे ५ हजार ४२० हेक्टर क्षेत्रावर सूर्यफूल, भुईमूग, मका व इतर उन्हाळी पिकांची पेरणी झाली. त्यामध्ये जळगाव तालुक्यात सरासरी क्षेत्र २३० हेक्टर असून, ७२५ हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी पिकांची पेरणी झाली आहे. संग्रामपूर तालुक्यात ४६० हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी ३४० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. चिखली तालुक्यात २० हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी १५१ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. बुलडाणा तालुक्यात १४० हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी ८० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. देऊळगाव राजा तालुक्यात ४० हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी ४०९ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मेहकर तालुक्यात २४० हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी ८३० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सिंदखेडराजा तालुक्यात नियोजन नसतानाही २३५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. लोणार तालुक्यात २२० हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी ३३७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. खामगाव तालुक्यात ३५० हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी १८२० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. शेगाव तालुक्यात ३० हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी कुठेच पेरणी झाली नाही. मलकापूर तालुक्यात ४० हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी १५१ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मोताळा तालुक्यात ४० हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी ३०७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. नांदुरा तालुक्यात नियोजन नसतानाही ३५ हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी पिकांची पेरणी झाली आहे; परंतु मे महिना उजाडताच पाण्याची पातळी झपाट्याने खालावल्याने उन्हाळी पिकांवर जलसंकट निर्माण झाले आहे.सोसाट्याची उष्ण हवा, कोरडे हवामान यामुळे पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे जमिनीतली ओल इतर हंगामापेक्षा उन्हाळ्यात लवकर कमी होते. परिणामी, उन्हाळी पिकांना पाणी लवकर द्यावे लागते, तसेच पाळ्याही जास्त द्याव्या लागतात. म्हणजे दुपटीपेक्षा जास्त पाणी द्यावे लागते; मात्र पाण्याची उपलब्धता कमी झाल्याने व तपत्या उन्हामुळे उन्हाळी पिकांचे नुकसान होत आहे.