शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

तळपत्या उन्हाच्या झळा पिकांच्या मुळावर!

By admin | Updated: May 10, 2017 07:18 IST

पाण्याची पातळी खालावल्याने सिंचन करणे शक्य होत नसल्यामुळे उन्हाळी पिकांना जगविणे अवघड झाले आहे.

ब्रह्मानंद जाधव। बुलडाणा : जिल्ह्यात यावर्षी उन्हाळी पिकांचे १ हजार ८१० हेक्टर क्षेत्रावर कृषी विभागाने नियोजन केले होते; यामध्ये तीन पट वाढ होऊन २९९ टक्के म्हणजे ५ हजार ४२० हेक्टरवर सूर्यफूल, भुईमूग, मका यांसह इतर उन्हाळी पिकांची पेरणी करण्यात आली आहे; मात्र तळपत्या उन्हाच्या झळा पिकांच्या मुळावर बसत असल्याने या पिकांचे नुकसान होत आहे. पाण्याची पातळी खालावल्याने सिंचन करणे शक्य होत नसल्यामुळे उन्हाळी पिकांना जगविणे अवघड झाले आहे.पाण्याची उपलब्धता पाहूनच यावर्षी उन्हाळी पिकांचे क्षेत्र वाढले. कृषी विभागाने यावर्षी सूर्यफूल, भुईमूग, मका यासह इतर उन्हाळी पिकांचे १ हजार ८१० हेक्टर क्षेत्रावर नियोजन केले होते; मात्र यामध्ये तीन पटीने वाढ होऊन सुमारे ५ हजार ४२० हेक्टर क्षेत्रावर सूर्यफूल, भुईमूग, मका व इतर उन्हाळी पिकांची पेरणी झाली. त्यामध्ये जळगाव तालुक्यात सरासरी क्षेत्र २३० हेक्टर असून, ७२५ हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी पिकांची पेरणी झाली आहे. संग्रामपूर तालुक्यात ४६० हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी ३४० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. चिखली तालुक्यात २० हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी १५१ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. बुलडाणा तालुक्यात १४० हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी ८० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. देऊळगाव राजा तालुक्यात ४० हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी ४०९ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मेहकर तालुक्यात २४० हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी ८३० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सिंदखेडराजा तालुक्यात नियोजन नसतानाही २३५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. लोणार तालुक्यात २२० हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी ३३७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. खामगाव तालुक्यात ३५० हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी १८२० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. शेगाव तालुक्यात ३० हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी कुठेच पेरणी झाली नाही. मलकापूर तालुक्यात ४० हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी १५१ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मोताळा तालुक्यात ४० हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी ३०७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. नांदुरा तालुक्यात नियोजन नसतानाही ३५ हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी पिकांची पेरणी झाली आहे; परंतु मे महिना उजाडताच पाण्याची पातळी झपाट्याने खालावल्याने उन्हाळी पिकांवर जलसंकट निर्माण झाले आहे.सोसाट्याची उष्ण हवा, कोरडे हवामान यामुळे पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे जमिनीतली ओल इतर हंगामापेक्षा उन्हाळ्यात लवकर कमी होते. परिणामी, उन्हाळी पिकांना पाणी लवकर द्यावे लागते, तसेच पाळ्याही जास्त द्याव्या लागतात. म्हणजे दुपटीपेक्षा जास्त पाणी द्यावे लागते; मात्र पाण्याची उपलब्धता कमी झाल्याने व तपत्या उन्हामुळे उन्हाळी पिकांचे नुकसान होत आहे.