शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

बिबट्याच्या हल्ल्यात सात बकऱ्या ठार

By विवेक चांदुरकर | Updated: March 3, 2024 17:21 IST

तालुक्यातील कव्हळा येथील अत्यल्प भूधारक शेतकरी राजेंद्र लालसिंग महाले यांनी गोठ्यात बांधून ठेवलेल्या सात बकऱ्या बिबट्याने ठार केल्याची घटना घडली.

विवेक चांदूरकर, खामगाव जि. बुलढाणा, लोकमत न्यूज नेटवर्क, चिखली: तालुक्यातील कव्हळा येथील अत्यल्प भूधारक शेतकरी राजेंद्र लालसिंग महाले यांनी गोठ्यात बांधून ठेवलेल्या सात बकऱ्या बिबट्याने ठार केल्याची घटना घडली.

तालुक्यातील कव्हळा येथील राजेंद्र महाले यांची आर्थिक स्थिती अत्यंत बेताची आहे. कुटुंबात केवळ अडीच एकर शेती असून, तीसुद्धा त्यांच्या वडिलांच्या नावावर आहे. अशास्थितीत घर चालविण्यासाठी राजेंद्र महाले यांनी मोलमजुरीसह शेळीपालनाचा पर्याय निवडला. मोठ्या मेहनतीने व कष्टाने त्यांनी दहा बकऱ्या वाढविल्या. यासाठी गावापासून साधारण अर्धा किमी अंतरावर गट नंबर १५० मधील डोंगरपांधी रस्त्यावर त्यांनी गोठा बांधला आहे. त्यामध्ये सायंकाळी या सर्व बकऱ्या त्यांनी बांधून ठेवल्या होत्या. दरम्यान, रात्रीच्या सुमारास या गोठ्यावर बिबट्याने हल्ला चढवून दहा पैकी ७ बकऱ्या ठार केल्याने महाले यांच्यावर मोठे संकट ओढावले आहे. बिबट्याच्या या हल्ल्यात ४ बोकड व गाभण असलेल्या ३ बकऱ्या, अशा एकूण ७ बकऱ्या ठार झाल्या असल्याने महालेंच्या उदरनिर्वाहावर देखील गदा आली आहे. सकाळी सहा वाजेच्या सुमारास बकऱ्यांना चारापाणी देण्यासाठी गेले असता ही बाब उघडकीस आली. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाचे मोरे व संबंधित कर्मचाऱ्यांनी दाखल होऊन पंचनामा केला. तर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. पडोळ यांनी मृत बकऱ्यांच्या शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण केली आहे.

यावेळी सरपंच रवींद्र डाळीमकर, तंटामुक्ती अध्यक्ष पंडितराव इंगळे आदी उपस्थित होते.

तार कुंपणाची गरज

तालुक्यातील कव्हळा व परिसरातील गावे ज्ञानगंगा अभयारण्याला लागून आहे. अभयारण्यातील बिबट्या, अस्वल आदी वन्यजीवांमुळे या भागातील शेती व शेतकरी कायम जोखमीत असतात. याच आठवड्यात डोंगरशेवली येथील सोमनाथ मंदिरात अस्वलांचा धुमाकूळ घातल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, वन्यजीवांची वाढती संख्या पाहता धोका वाढलेला असून, यापूर्वी अनेकांना जीव देखील गमवावा लागला असतानाही वनपरिक्षेत्राला तार कुंपणाची मागणी अद्यापही प्रलंबित आहे.

टॅग्स :leopardबिबट्या